शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

बालविवाहात धडकली यंत्रणा, लग्न वऱ्हाडाची पळापळ; जिल्हा बाल संरक्षण कक्षाची धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 11:52 IST

जिल्ह्यात रोखले दोन बालविवाह

यवतमाळ : अक्षय तृतीयेच्या दिवशी बालविवाहांचे प्रमाण वाढते, ही बाब लक्षात घेऊन प्रशासन अलर्ट असतानाही जिल्ह्यात चक्क दोन बालविवाह समारंभपूर्वक आयोजित करण्यात आले. मात्र याची माहिती मिळताच बाल संरक्षण कक्षाचे पथक थेट एका लग्नमंडपात धडकले, तर दुसऱ्या बालवधूच्या घरी धडकले. यावेळी लग्नमंडपात जमलेल्या वऱ्हाडी मंडळींची चांगलीच पळापळ झाली.

रविवारी २३ एप्रिल रोजी पांढरकवडा तालुक्यातील पाथरी गावात सकाळी ११ वाजता एका मुलीचा बालविवाह लावून दिला जात असल्याची गोपनीय माहिती जिल्हा बालसंरक्षण कक्षाला मिळाली. सकाळी ९ वाजता हा फोन येताच बाल संरक्षण कक्षाच्या संरक्षण अधिकारी माधुरी पावडे तातडीने पांढरकवड्यात पोहचल्या. पांढरकवड्याचे पोलिस निरीक्षक जगदीश मंडलवार, पोलिस जमादार सुनील कुंटावार तसेच गावपातळीवरील कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन हे पथक थेट लग्नमंडपातच धडकले. त्यावेळी मुलीच्या लग्नाची खातरजमा केली असता तिचे वय केवळ १६ वर्षे आढळले. त्यामुळे हा विवाह थांबविण्यात आला व अल्पवयीन वधूला सोमवारी बालकल्याण समितीपुढे हजर केले जाणार आहे.

तर दुसरा बालविवाह यवतमाळ तालुक्यातील एका गावात ठरला होता. या घरातील दोन बहिणींचे एकाच दिवशी म्हणजे २४ एप्रिल रोजी आर्णी मार्गावरील ख्यातनाम मंगल कार्यालयात लग्न लावून दिले जाणार होते. त्यातील एक मुलगी अल्पवयीन असल्याची गोपनीय माहिती जिल्हा बालसंरक्षण कक्षाला मिळताच संबंधित वधूपित्याच्या घरी धडक देण्यात आली. यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, संरक्षण अधिकारी अविनाश पिसुर्डे, माधुरी पावडे यांनी पालकांना समज दिली.

मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत तिचे लग्न न करण्याच्या सूचना पालकांना देण्यात आल्या. त्यामुळे केवळ साडेसतरा वर्षे वय असलेल्या मुलीचे लग्न रद्द करण्यात आले. तिला बालकल्याण समितीपुढे हजर करण्यात आले. तर दुसऱ्या बहिणीचे वय योग्य असल्याने तिचे नियोजित लग्न सोमवारी पार पडणार आहे. या दोन्ही कारवाया जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रशांत थोरात यांच्या मार्गदर्शनात करण्यात आल्या.

तिसऱ्या बालविवाहावरही वाॅच

रविवारी दोन बालविवाह रोखल्यानंतरही आणखी एका बालविवाहाची गोपनीय माहिती महिला व बाल विकास विभागाकडे पोहोचली आहे. पुढील आठवड्यात हा बालविवाह नियोजित आहे. मात्र तत्पूर्वीच संबंधितांकडे पोहोचून तो रोखला जाईल, अशी माहिती जिल्हा बालसंरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील व सामाजिक संस्था कर्मचाऱ्यांना सतत प्रशिक्षण देणे सुरू आहे. बालविवाह या अनिष्ट प्रथेस प्रतिबंध करण्याकरिता समाजातील सर्व घटकांची महत्त्वाची भूमिका असल्याचेही राजूरकर म्हणाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळ