शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

बालविवाहात धडकली यंत्रणा, लग्न वऱ्हाडाची पळापळ; जिल्हा बाल संरक्षण कक्षाची धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 11:52 IST

जिल्ह्यात रोखले दोन बालविवाह

यवतमाळ : अक्षय तृतीयेच्या दिवशी बालविवाहांचे प्रमाण वाढते, ही बाब लक्षात घेऊन प्रशासन अलर्ट असतानाही जिल्ह्यात चक्क दोन बालविवाह समारंभपूर्वक आयोजित करण्यात आले. मात्र याची माहिती मिळताच बाल संरक्षण कक्षाचे पथक थेट एका लग्नमंडपात धडकले, तर दुसऱ्या बालवधूच्या घरी धडकले. यावेळी लग्नमंडपात जमलेल्या वऱ्हाडी मंडळींची चांगलीच पळापळ झाली.

रविवारी २३ एप्रिल रोजी पांढरकवडा तालुक्यातील पाथरी गावात सकाळी ११ वाजता एका मुलीचा बालविवाह लावून दिला जात असल्याची गोपनीय माहिती जिल्हा बालसंरक्षण कक्षाला मिळाली. सकाळी ९ वाजता हा फोन येताच बाल संरक्षण कक्षाच्या संरक्षण अधिकारी माधुरी पावडे तातडीने पांढरकवड्यात पोहचल्या. पांढरकवड्याचे पोलिस निरीक्षक जगदीश मंडलवार, पोलिस जमादार सुनील कुंटावार तसेच गावपातळीवरील कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन हे पथक थेट लग्नमंडपातच धडकले. त्यावेळी मुलीच्या लग्नाची खातरजमा केली असता तिचे वय केवळ १६ वर्षे आढळले. त्यामुळे हा विवाह थांबविण्यात आला व अल्पवयीन वधूला सोमवारी बालकल्याण समितीपुढे हजर केले जाणार आहे.

तर दुसरा बालविवाह यवतमाळ तालुक्यातील एका गावात ठरला होता. या घरातील दोन बहिणींचे एकाच दिवशी म्हणजे २४ एप्रिल रोजी आर्णी मार्गावरील ख्यातनाम मंगल कार्यालयात लग्न लावून दिले जाणार होते. त्यातील एक मुलगी अल्पवयीन असल्याची गोपनीय माहिती जिल्हा बालसंरक्षण कक्षाला मिळताच संबंधित वधूपित्याच्या घरी धडक देण्यात आली. यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, संरक्षण अधिकारी अविनाश पिसुर्डे, माधुरी पावडे यांनी पालकांना समज दिली.

मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत तिचे लग्न न करण्याच्या सूचना पालकांना देण्यात आल्या. त्यामुळे केवळ साडेसतरा वर्षे वय असलेल्या मुलीचे लग्न रद्द करण्यात आले. तिला बालकल्याण समितीपुढे हजर करण्यात आले. तर दुसऱ्या बहिणीचे वय योग्य असल्याने तिचे नियोजित लग्न सोमवारी पार पडणार आहे. या दोन्ही कारवाया जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रशांत थोरात यांच्या मार्गदर्शनात करण्यात आल्या.

तिसऱ्या बालविवाहावरही वाॅच

रविवारी दोन बालविवाह रोखल्यानंतरही आणखी एका बालविवाहाची गोपनीय माहिती महिला व बाल विकास विभागाकडे पोहोचली आहे. पुढील आठवड्यात हा बालविवाह नियोजित आहे. मात्र तत्पूर्वीच संबंधितांकडे पोहोचून तो रोखला जाईल, अशी माहिती जिल्हा बालसंरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील व सामाजिक संस्था कर्मचाऱ्यांना सतत प्रशिक्षण देणे सुरू आहे. बालविवाह या अनिष्ट प्रथेस प्रतिबंध करण्याकरिता समाजातील सर्व घटकांची महत्त्वाची भूमिका असल्याचेही राजूरकर म्हणाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळ