शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

उपविभागावर तिबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 22:25 IST

१२ जूननंतर झालेल्या खंडित पावसामुळे वणी उपविभागातील कोरडवाहू शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. उपविभागात कपाशी, तूर व सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. मात्र पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकऱ्यांना या पिकाची लागवड दोनदा करावी लागली.

ठळक मुद्देखंडित पावसाचा परिणाम : हवामान खात्याचे अंदाज खोटे, शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : १२ जूननंतर झालेल्या खंडित पावसामुळे वणी उपविभागातील कोरडवाहू शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. उपविभागात कपाशी, तूर व सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. मात्र पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकऱ्यांना या पिकाची लागवड दोनदा करावी लागली. अद्याप जोरदार पाऊस येण्याची कोणतीही चिन्हे नसल्याने या शेतकºयांना आता तिसऱ्यांदा पेरणी करावी लागणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.यावर्षी मृग नक्षत्रावर पहिल्यांदाच जोरदार पावसाने हजेरी लावली. तत्पूर्वी यावर्षी हवामान खात्याने चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यातच मृग नक्षत्रावर पावसाने हजेरी लावल्यामुळे हवामान खात्यावरील विश्वास दुनावला. त्यामुळे उपविभागातील अनेक शेतकऱ्यांनी ८ ते १० जून या दरम्यान शेतात कपाशी, तूर व सोयाबीनची लागवड केली. वातावरण पावसाळीच असल्याने ११ जूननंतरही अनेक शेतकऱ्यांनी पेरणीची कामे आटोपली. मात्र इथेच घात झाला. १० जूननंतर पावसाने चांगलीच दडी मारली. या भागात गेल्या १५ दिवसांपासून अद्याप सार्वत्रिक पावसाने हजेरी लावली नाही. काही भागात पाऊस, तर काही भागात पावसाची दडी, अशी परिस्थिती निर्माण झाली. परिणामी ७ ते १० जूनपर्यंत पेरण्या करणाऱ्या शेतकऱ्यांची पिके अद्यापही तग धरून आहेत. जमिनीत काहीसा ओलावा असल्याने ही पिके वाढत आहे. मात्र ११ जूननंतर पेरण्या झालेली पिके उगवलीच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्याहीउपरांत जोमदार पाऊस न झाल्याने आता ही दुबार पेरणीही धोक्यात आली असून तिबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. आजपर्यंत वणी तालुक्यात केवळ १८६ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे.पावसाअभावी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भावखंडित पावसामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. वणी, झरी व मारेगाव या तीन तालुक्यात काही ठिकाणी कपाशीवर लष्करी अळीच प्रादूर्भाव दिसून आला. जवळपास प्रत्येकच शेतांमध्ये देवगायींचा (तेलण्या) प्रकोप वाढला असून य देवगायी तूरी व कपाशीची पाने कुरतडून खात आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी शेतांमध्ये थिमेटचा वापर करीत आहे. मात्र तरीही तेलण्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी