शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
4
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
5
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
6
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
7
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
8
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
9
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
10
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
11
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
12
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
13
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
14
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
15
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
16
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
17
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
18
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
19
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
20
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

एससी, एसटी, ओबीसीचं शिक्षण थांबविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 23:48 IST

एससी, एसटी, ओबीसी हा अशिक्षित राहील तेवढं राज्य पुढ चालत राहील. शिक्षण वाढल्यास स्पर्धा वाढेल व सहज मिळणारी सत्ता हाती येणार नाही. यामुळे राज्यकर्त्यांनी शिक्षण थांबविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा घाणाघात भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी यवतमाळातील महासभेत केला.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : वंचित बहुजन आघाडीची सत्तासंपादन महासभा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एससी, एसटी, ओबीसी हा अशिक्षित राहील तेवढं राज्य पुढ चालत राहील. शिक्षण वाढल्यास स्पर्धा वाढेल व सहज मिळणारी सत्ता हाती येणार नाही. यामुळे राज्यकर्त्यांनी शिक्षण थांबविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा घाणाघात भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी यवतमाळातील महासभेत केला.येथील समता मैदानावर बहुजन वंचित आघाडीची सत्ता संपादन महासभा बुधवारी सायंकाळी झाली. यावेळी अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी भाजपा व विरोधी काँग्रेसवर सडकून टिका केली. राज्यातील एससी, एसटी व ओबीसी या तिन्ही वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचं बजेट हे केवळ ५०० कोटी इतकच आहे. मात्र सरकारची दानत नाही. या वर्गाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न हे सरकार करतंय. शिक्षण सर्वांना आणि शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे, ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे. आज मेडिकल व अभियांत्रिकीच्या ओबीसींच्या १५ टक्के जागा केवळ ऐपत नसल्यामुळे रिक्त राहतात. हे महागड शिक्षण सर्वसामान्यांच्या ऐपतीत आलं पाहिजे, असे त्यांनी सांगितले.सभेला एमआयएमचे संस्थापक अध्यक्ष खासदार असुद्दूद्दीन ओवैसी येणार होते. मात्र त्यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाला. तसेच एमआयएमचे आमदारही सभेला उपस्थित नव्हते. एमआयएमच्यावतीने स्थानिक पदाधिकाऱ्यांनी संबोधित केले.८५० कोटी घोषणा म्हणजे फसवणूकआता निवडणुका डोळ्यापुढे पाहून भाजपा ओबीसींच्या हिताची भाषा बोलतंय ही भूमिका त्यांनी यापूर्वी का घेतली नाही, याचा खुलासा करावा. लोकसभेतील आरक्षणाच्या जागा सोडून इतर मतदारसंघातून ओबीसीतील अलुतेदार, बलुतेदारांना संधी का दिली नाही. आज राज्य सरकारने ओबीसीसाठी ८५० कोटींच्या आर्थिक तरतूदीची घोषणा केली. मात्र ही चक्क फसवणूक आहे. आधी हे बिल विधानसभेत मंजूर करावं लागतं. त्याशिवाय सर्वसामान्यांना लाभ मिळणार नाही. खऱ्याअर्थानं लोकशाहीचं सामाजिकरण करण्याची गरज आहे. राज्यातील केवळ १६९ कुटुंबांकडेच आलटून पालटून सत्ता राहिली आहे. सत्तेला घातलेले बांध फोडल्याशिवाय तिचं सामाजिकरण होणार नाही. यासाठीच वंचित बहुजन आघाडी स्थापन केल्याचे बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर