शहरं
Join us  
Trending Stories
1
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
2
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
3
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
4
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
5
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
6
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
7
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
8
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
9
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
10
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
11
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
12
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
13
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
14
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
15
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
16
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
17
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
18
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
19
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
20
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
Daily Top 2Weekly Top 5

एससी, एसटी, ओबीसीचं शिक्षण थांबविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 23:48 IST

एससी, एसटी, ओबीसी हा अशिक्षित राहील तेवढं राज्य पुढ चालत राहील. शिक्षण वाढल्यास स्पर्धा वाढेल व सहज मिळणारी सत्ता हाती येणार नाही. यामुळे राज्यकर्त्यांनी शिक्षण थांबविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा घाणाघात भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी यवतमाळातील महासभेत केला.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : वंचित बहुजन आघाडीची सत्तासंपादन महासभा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एससी, एसटी, ओबीसी हा अशिक्षित राहील तेवढं राज्य पुढ चालत राहील. शिक्षण वाढल्यास स्पर्धा वाढेल व सहज मिळणारी सत्ता हाती येणार नाही. यामुळे राज्यकर्त्यांनी शिक्षण थांबविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा घाणाघात भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी यवतमाळातील महासभेत केला.येथील समता मैदानावर बहुजन वंचित आघाडीची सत्ता संपादन महासभा बुधवारी सायंकाळी झाली. यावेळी अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी भाजपा व विरोधी काँग्रेसवर सडकून टिका केली. राज्यातील एससी, एसटी व ओबीसी या तिन्ही वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचं बजेट हे केवळ ५०० कोटी इतकच आहे. मात्र सरकारची दानत नाही. या वर्गाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न हे सरकार करतंय. शिक्षण सर्वांना आणि शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे, ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे. आज मेडिकल व अभियांत्रिकीच्या ओबीसींच्या १५ टक्के जागा केवळ ऐपत नसल्यामुळे रिक्त राहतात. हे महागड शिक्षण सर्वसामान्यांच्या ऐपतीत आलं पाहिजे, असे त्यांनी सांगितले.सभेला एमआयएमचे संस्थापक अध्यक्ष खासदार असुद्दूद्दीन ओवैसी येणार होते. मात्र त्यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाला. तसेच एमआयएमचे आमदारही सभेला उपस्थित नव्हते. एमआयएमच्यावतीने स्थानिक पदाधिकाऱ्यांनी संबोधित केले.८५० कोटी घोषणा म्हणजे फसवणूकआता निवडणुका डोळ्यापुढे पाहून भाजपा ओबीसींच्या हिताची भाषा बोलतंय ही भूमिका त्यांनी यापूर्वी का घेतली नाही, याचा खुलासा करावा. लोकसभेतील आरक्षणाच्या जागा सोडून इतर मतदारसंघातून ओबीसीतील अलुतेदार, बलुतेदारांना संधी का दिली नाही. आज राज्य सरकारने ओबीसीसाठी ८५० कोटींच्या आर्थिक तरतूदीची घोषणा केली. मात्र ही चक्क फसवणूक आहे. आधी हे बिल विधानसभेत मंजूर करावं लागतं. त्याशिवाय सर्वसामान्यांना लाभ मिळणार नाही. खऱ्याअर्थानं लोकशाहीचं सामाजिकरण करण्याची गरज आहे. राज्यातील केवळ १६९ कुटुंबांकडेच आलटून पालटून सत्ता राहिली आहे. सत्तेला घातलेले बांध फोडल्याशिवाय तिचं सामाजिकरण होणार नाही. यासाठीच वंचित बहुजन आघाडी स्थापन केल्याचे बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर