शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वृक्ष लागवड मोहिमेत पारंपरिक वृक्ष वनविभागाकडून बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 21:45 IST

शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत विदेशी वृक्ष लागवडीवरच भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. वड, उंबर, पिंपळ, बेल, कदंब, आपटा, मोहा, टेंभूर्णी, बिबा, शेवगा, सागरगोटा, हिरडा, रिठा, चारोळी, या वृक्षांच्या लागवडीबाबत वनविभाग अनास्था बाळगून आहे.

ठळक मुद्देविदेशी झाडांना स्थान । स्थानिक प्रजातींच्या वृक्ष लागवडीबाबत अनास्था

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत विदेशी वृक्ष लागवडीवरच भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. वड, उंबर, पिंपळ, बेल, कदंब, आपटा, मोहा, टेंभूर्णी, बिबा, शेवगा, सागरगोटा, हिरडा, रिठा, चारोळी, या वृक्षांच्या लागवडीबाबत वनविभाग अनास्था बाळगून आहे.वणी, पांढरकवडा व झरी या तालुक्यातील वनविभागाच्या नर्सरीमध्ये कडूनिंब, साग, बांबू या वृक्षांची रोपसंख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. काही ठिकाणी जांभूळ, खैर, आवळा, बोर, आजण, चिंच या वृक्षांची रोपेदेखील आढळून आली. मात्र यात जास्त प्रमाणात कडूनिंबाच्या रोपांची लागवड होताना दिसून येत आहे. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी वृक्ष लागवडीमध्ये स्थानिक प्रजातींना प्राधान्य द्या, असे सांगितले आहे. तथापि त्या दिशेने अद्यापही फारसे प्रयत्न होताना दिसत नाही. यवतमाळ जिल्ह्यात बेहाडा या वृक्षासाठी अतिशय पोषक वातावरण आहे. पण त्यासाठी ती रोपे उपलब्ध नाही. बेल, कदंब, रिठा, बिबा, शेवगा या जातीच्या वृक्षांना अतिशय कमी पाणी लागते. पण त्याचीही रोपे उपलब्ध नाही. वनविभागात ही कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याबाबत चांगली माहिती असली तरी उच्चपदस्थ अधिकाºयांमध्ये मात्र याबाबत अनास्था आहे.यालट सुईबाभूळ, सप्तपर्णी, गुलमोहर या विदेशी झाडांच्या लागवडीवर जास्त भर दिला जात आहे. विशेष म्हणजे या झाडांवर पाखरे बसत नाही. या झाडांची पाणी शोषण्याची क्षमताही अधिक आहे. असे असतानाही लागवडीसाठी याच वृक्षांना प्राधान्य दिले जात आहे. गुलमोहराचे झाड मादागास्कर येथून भारतात आणले आहे. याची लालभडक फुले कुणालाही आकर्षित करून घेणारी असली तरी त्या फुलांना सुगंध नाही. निलगीरीचे झाड आॅस्ट्रेलियातून १९५२ साली आयात केलेल्या गव्हासोबत आले आहे. हे झाड जमिनीतील पाणी इतर झाडांच्या १५ टक्क्यांपेक्षा जास्त स्वत:कडे ओढून घेते. परिणामी जलस्त्रोत सुष्क होतो.लागवडीनंतरही वृक्षांचे अस्तित्व नाहीवृक्ष लागवडीच्या नावाखाली दरवर्षी हजारो झाडे लावली जातात. पिंपळ, कडूनिंब, चिंच, आवळा, बोर या वृक्षांचीही लागवड दरवर्षी करण्यात येते. परंतु चार वर्षानंतरही टिपेश्वर अभयारण्यात या झाडांचे अस्तित्व दिसून येत नाही.

टॅग्स :forest departmentवनविभाग