शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवड मोहिमेत पारंपरिक वृक्ष वनविभागाकडून बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 21:45 IST

शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत विदेशी वृक्ष लागवडीवरच भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. वड, उंबर, पिंपळ, बेल, कदंब, आपटा, मोहा, टेंभूर्णी, बिबा, शेवगा, सागरगोटा, हिरडा, रिठा, चारोळी, या वृक्षांच्या लागवडीबाबत वनविभाग अनास्था बाळगून आहे.

ठळक मुद्देविदेशी झाडांना स्थान । स्थानिक प्रजातींच्या वृक्ष लागवडीबाबत अनास्था

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत विदेशी वृक्ष लागवडीवरच भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. वड, उंबर, पिंपळ, बेल, कदंब, आपटा, मोहा, टेंभूर्णी, बिबा, शेवगा, सागरगोटा, हिरडा, रिठा, चारोळी, या वृक्षांच्या लागवडीबाबत वनविभाग अनास्था बाळगून आहे.वणी, पांढरकवडा व झरी या तालुक्यातील वनविभागाच्या नर्सरीमध्ये कडूनिंब, साग, बांबू या वृक्षांची रोपसंख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. काही ठिकाणी जांभूळ, खैर, आवळा, बोर, आजण, चिंच या वृक्षांची रोपेदेखील आढळून आली. मात्र यात जास्त प्रमाणात कडूनिंबाच्या रोपांची लागवड होताना दिसून येत आहे. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी वृक्ष लागवडीमध्ये स्थानिक प्रजातींना प्राधान्य द्या, असे सांगितले आहे. तथापि त्या दिशेने अद्यापही फारसे प्रयत्न होताना दिसत नाही. यवतमाळ जिल्ह्यात बेहाडा या वृक्षासाठी अतिशय पोषक वातावरण आहे. पण त्यासाठी ती रोपे उपलब्ध नाही. बेल, कदंब, रिठा, बिबा, शेवगा या जातीच्या वृक्षांना अतिशय कमी पाणी लागते. पण त्याचीही रोपे उपलब्ध नाही. वनविभागात ही कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याबाबत चांगली माहिती असली तरी उच्चपदस्थ अधिकाºयांमध्ये मात्र याबाबत अनास्था आहे.यालट सुईबाभूळ, सप्तपर्णी, गुलमोहर या विदेशी झाडांच्या लागवडीवर जास्त भर दिला जात आहे. विशेष म्हणजे या झाडांवर पाखरे बसत नाही. या झाडांची पाणी शोषण्याची क्षमताही अधिक आहे. असे असतानाही लागवडीसाठी याच वृक्षांना प्राधान्य दिले जात आहे. गुलमोहराचे झाड मादागास्कर येथून भारतात आणले आहे. याची लालभडक फुले कुणालाही आकर्षित करून घेणारी असली तरी त्या फुलांना सुगंध नाही. निलगीरीचे झाड आॅस्ट्रेलियातून १९५२ साली आयात केलेल्या गव्हासोबत आले आहे. हे झाड जमिनीतील पाणी इतर झाडांच्या १५ टक्क्यांपेक्षा जास्त स्वत:कडे ओढून घेते. परिणामी जलस्त्रोत सुष्क होतो.लागवडीनंतरही वृक्षांचे अस्तित्व नाहीवृक्ष लागवडीच्या नावाखाली दरवर्षी हजारो झाडे लावली जातात. पिंपळ, कडूनिंब, चिंच, आवळा, बोर या वृक्षांचीही लागवड दरवर्षी करण्यात येते. परंतु चार वर्षानंतरही टिपेश्वर अभयारण्यात या झाडांचे अस्तित्व दिसून येत नाही.

टॅग्स :forest departmentवनविभाग