शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

वृक्ष लागवड मोहिमेत पारंपरिक वृक्ष वनविभागाकडून बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 21:45 IST

शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत विदेशी वृक्ष लागवडीवरच भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. वड, उंबर, पिंपळ, बेल, कदंब, आपटा, मोहा, टेंभूर्णी, बिबा, शेवगा, सागरगोटा, हिरडा, रिठा, चारोळी, या वृक्षांच्या लागवडीबाबत वनविभाग अनास्था बाळगून आहे.

ठळक मुद्देविदेशी झाडांना स्थान । स्थानिक प्रजातींच्या वृक्ष लागवडीबाबत अनास्था

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत विदेशी वृक्ष लागवडीवरच भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. वड, उंबर, पिंपळ, बेल, कदंब, आपटा, मोहा, टेंभूर्णी, बिबा, शेवगा, सागरगोटा, हिरडा, रिठा, चारोळी, या वृक्षांच्या लागवडीबाबत वनविभाग अनास्था बाळगून आहे.वणी, पांढरकवडा व झरी या तालुक्यातील वनविभागाच्या नर्सरीमध्ये कडूनिंब, साग, बांबू या वृक्षांची रोपसंख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. काही ठिकाणी जांभूळ, खैर, आवळा, बोर, आजण, चिंच या वृक्षांची रोपेदेखील आढळून आली. मात्र यात जास्त प्रमाणात कडूनिंबाच्या रोपांची लागवड होताना दिसून येत आहे. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी वृक्ष लागवडीमध्ये स्थानिक प्रजातींना प्राधान्य द्या, असे सांगितले आहे. तथापि त्या दिशेने अद्यापही फारसे प्रयत्न होताना दिसत नाही. यवतमाळ जिल्ह्यात बेहाडा या वृक्षासाठी अतिशय पोषक वातावरण आहे. पण त्यासाठी ती रोपे उपलब्ध नाही. बेल, कदंब, रिठा, बिबा, शेवगा या जातीच्या वृक्षांना अतिशय कमी पाणी लागते. पण त्याचीही रोपे उपलब्ध नाही. वनविभागात ही कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याबाबत चांगली माहिती असली तरी उच्चपदस्थ अधिकाºयांमध्ये मात्र याबाबत अनास्था आहे.यालट सुईबाभूळ, सप्तपर्णी, गुलमोहर या विदेशी झाडांच्या लागवडीवर जास्त भर दिला जात आहे. विशेष म्हणजे या झाडांवर पाखरे बसत नाही. या झाडांची पाणी शोषण्याची क्षमताही अधिक आहे. असे असतानाही लागवडीसाठी याच वृक्षांना प्राधान्य दिले जात आहे. गुलमोहराचे झाड मादागास्कर येथून भारतात आणले आहे. याची लालभडक फुले कुणालाही आकर्षित करून घेणारी असली तरी त्या फुलांना सुगंध नाही. निलगीरीचे झाड आॅस्ट्रेलियातून १९५२ साली आयात केलेल्या गव्हासोबत आले आहे. हे झाड जमिनीतील पाणी इतर झाडांच्या १५ टक्क्यांपेक्षा जास्त स्वत:कडे ओढून घेते. परिणामी जलस्त्रोत सुष्क होतो.लागवडीनंतरही वृक्षांचे अस्तित्व नाहीवृक्ष लागवडीच्या नावाखाली दरवर्षी हजारो झाडे लावली जातात. पिंपळ, कडूनिंब, चिंच, आवळा, बोर या वृक्षांचीही लागवड दरवर्षी करण्यात येते. परंतु चार वर्षानंतरही टिपेश्वर अभयारण्यात या झाडांचे अस्तित्व दिसून येत नाही.

टॅग्स :forest departmentवनविभाग