शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वणीतील टोलनाक्याकडून नियमांची पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:11 IST

येथील टोल वसुली नाक्यावर नियमांची सर्रास पायमल्ली केली जात असून त्यामुळे शासनाच्या दिशाभूलीसोबतच वाहनधारकांचीदेखिल लुट केली जात आहे. एकाही कराराचे पालन या टोलनाक्याकडून होत नसल्याने हा नाका वादग्रस्त ठरला आहे.

ठळक मुद्देशासनाची दिशाभूल : वाहनधारकांची लूट, वृक्षारोपणाकडे दुर्लक्ष, रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : येथील टोल वसुली नाक्यावर नियमांची सर्रास पायमल्ली केली जात असून त्यामुळे शासनाच्या दिशाभूलीसोबतच वाहनधारकांचीदेखिल लुट केली जात आहे. एकाही कराराचे पालन या टोलनाक्याकडून होत नसल्याने हा नाका वादग्रस्त ठरला आहे.३० वर्षाच्या मुदतीसाठी हा टोल नाका उभारण्यात आला आहे. आयव्हीआरसीएल या कंपनीच्या अखत्यारीतील या टोलनाक्यावर मात्र सावळागोंधळ सुरू आहे. करंजी-वणी-घुग्गूस-ताडाळी या चौपदरी राज्य महामार्गाचे काम आयव्हीआरसीएल या कंपनीने केले. त्यानंतर करंजी, वणी व घुग्गूस अशा तीन ठिकाणी टोलनाके तीन वर्षापूर्वी सुरू करण्यात आले. मात्र वणी येथील टोलनाका सुरू होताच तो वादग्रस्त ठरला. रस्त्याच्या देखभाल, दुरूस्ती व इतर रस्ता विकासाच्या कामाची जबाबदारी या कंपनीवर आहे. पुढील ३० वर्ष टोलवसुली करून या कंपनीला या मार्गाची देखभाल करावयाची आहे. परंतु करार करताना ज्या नियम व अटी घालून देण्यात आल्या. त्या सर्व नियम व अटी या कंपनीकडून पायदळी तुडविल्या जात असल्याचा आरोप होत आहे. प्रवाशांची सोय व्हावी म्हणून या मार्गावर ठिकठिकाणी सुसज्ज प्रसाधनगृहे बांधणे बंधनकारक होते. परंतु या कंपनीने थातुरमातूर प्रसाधनगृहे उभारली खरी. परंतु यातील अनेक प्रसाधनगृहाला टाळे लावून असल्याचे दिसून येत आहे. तर जे प्रसाधनगृह सुरू आहे, त्याच्या स्वच्छतेकडे कायम दुर्लक्ष करण्यात येत आहे. राज्य महामार्गाचे काम करताना अनेक ठिकाणची पुरातन वृक्षे तोडण्यात आली. त्याबदल्यात दुप्पट वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी या कंपनीवर टाकण्यात आली होती. परंतु या कंपनीने त्या तुलनेत फारशी वृक्ष लागवड केल्याचे दिसून येत नाही. रस्ता स्वच्छतेच्या बाबतीतही टाळाटाळ केली जात आहे. करारात ही अट टाकण्यात आली आहे. परंतु रस्त्याची स्वच्छता कुठेही दिसत नाही. वरोरा बायपासवर कायम धुळीचे साम्राज्य असते. गंभीर बाब ही की, टोलनाक्याच्या अवतीभवतीच कोळशाच्या धुळीचे ढिगारे उभे आहेत. वाहनांच्या अवागमनाने ही धूळ वातावरणात उडत असते. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्यावर नियंत्रणासाठी या कंपनीकडून कोणतेही पाऊल उचलले जात नाही. असा सारा सावळागोंधळ सुरू असताना बांधकाम विभाग गप्प का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.-तर वाहनांची अवैध टोल वसुली बंद पाडू-राजू उंबरकरमुळात वणी येथे उभारण्यात आलेला टोलनाकाच गैरकायदेशीर असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी केला आहे. आयव्हीआरसीएल या कंपनीने शासनाशी टोल नाक्यासंदर्भात केलेले करार मोडण्याचा एककलमी कार्यक्रम या कंपनीकडून सुरू आहे. त्यातून वाहनधारकांची सर्रास लुट केली जात असल्याचा आरोप उंबरकर यांनी केला आहे. या राज्य महामार्गाच्या दुतर्फा केलेल्या नाल्या संपूर्णत: बुजल्या आहे. त्यामुळे रस्त्यावरील पावसाचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात शिरले. त्यामुळे पिकांची अतोनात हानी झाली. त्याचा मोबदलाही या कंपनीने अदा केला नाही. या कंपनीने अधिकाºयांना हाताशी धरून मनमानी सुरू केली असून येत्या आठ दिवसात धोरणात सुधारणा न केल्यास वाहनांची अवैध टोलवसुली बंद पाडू, असा इशाराही राजू उंबरकर यांनी दिला आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाका