शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

उपाययोजनेची माहिती मिळवितानाच दमछाक

By admin | Updated: April 4, 2015 23:56 IST

जिल्ह्यातील पाणीटंचाई उपाययोजनांची माहिती मिळवितानाच जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाची दमछाक होत आहे...

पाणीटंचाई : बीडीओंचा नो रिस्पॉन्स, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाची कसरतयवतमाळ : जिल्ह्यातील पाणीटंचाई उपाययोजनांची माहिती मिळवितानाच जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाची दमछाक होत आहे. संबधित पंचायत समितींचे गटविकास अधिकाऱ्यांकडूनही कोणताच प्रतिसाद मिळत नाही. पाणीटंचाईची महिती वरिष्ठांना देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी नऊ कोटी ९९ लाखांचा आराखडा तयार केला आहे. यातील बहुतांश उपाययोजना तातडीने व्हाव्या, यासाठी तहसीलदार आणि पंचायत समितीस्तरावरच अधिकार देण्यात आले आहे. विहीर अधिग्रहण, टँकर लावणे, तात्पुरती पूरक नळयोजना घेणे, नळयोजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, विहीर खोल करणे यासारख्या उपाययोजना टंचाईग्रस्त गावात केल्या जातात. जिल्हास्तरावरून पाणीटंचाई उपाययोजनेचा आराखडा तयार होत असला तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी पंचायत समितीस्तरावरून केली जाते. पाणीटंचाई उपाययोजनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून तीन टँकरचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. ६९ विंधन विहिरींचे प्रस्ताव मंजूर झाले. तात्पुरत्या दुरुस्तीचे १२ पैकी ८ प्रस्ताव मंजुरीकरिता पाठविले. त्यापैकी ४ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. याच पद्धतीने विशेष नळयोजना दुरुस्तीचे १२४ प्रस्ताव प्राप्त झाले असून तपासणी करण्याची कार्यवाही सुरू आहे. ८५ अंदाजपत्रक मंजुरीसाठी दिले आहे. त्यातील ८७ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. ७१ खासगी विहीर अधिग्रहण करून पर्यायी पाणीपुरवठा केला जात आहे. यात उमरखेड ४१, वणी ३, दिग्रस ११, आर्णी १०, मारेगाव ४, कळंब २ अशी स्थिती आहे. या व्यतिरिक्त पुसद तालुक्यातील बाळूवाडी, अनसिंग उल्हासवाडी, कारला आणि उपवनवाडी येथे टँकर मंजूर झाले आहे. एका टँकरद्वारे बाळवाडी पाणीपुरवठा सुरू आहे. या उपाययोजनांची माहिती मिळविताना जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा विभागाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. गटविकास अधिकाऱ्यांकडून कुठलीही उपाययोजना अंमलात आणली जात आहे याची माहितीच दिली जात नाही. दुसरीकडे टंचाई आराखड्यावर सचिवस्तरावरून घेतल्या जाणाऱ्या बैठकांमध्ये पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना उत्तरे द्यावी लागतात. त्यांच्याकडे अपडेट स्थितीची आकडेवारी उपलब्ध नसल्याने बोलणी खावी लागते. पाणीपुरवठा विभागातील एका लिपिकावर माहिती गोळा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. रोज सकाळी १६ ही पंचायत समिती कार्यालयात फोनवरून पाणीटंचाई उपाययोजनांचा अहवाल मागितला जातो. मात्र प्रतिसाद नसल्याने हे काम नित्याचेच झाले आहे. टंचाई आराखडा राबविण्यावरून जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येते. त्यामुळेच बरेचवेळा अद्यायावत स्वरूपाची माहिती जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाला उपलब्ध होत नाही. (कार्यालय प्रतिनिधी)