शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
4
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
5
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
6
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
7
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
8
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
9
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
10
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
11
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
12
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
13
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
14
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
15
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
16
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
17
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
18
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
19
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
20
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...

उपाययोजनेची माहिती मिळवितानाच दमछाक

By admin | Updated: April 4, 2015 23:56 IST

जिल्ह्यातील पाणीटंचाई उपाययोजनांची माहिती मिळवितानाच जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाची दमछाक होत आहे...

पाणीटंचाई : बीडीओंचा नो रिस्पॉन्स, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाची कसरतयवतमाळ : जिल्ह्यातील पाणीटंचाई उपाययोजनांची माहिती मिळवितानाच जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाची दमछाक होत आहे. संबधित पंचायत समितींचे गटविकास अधिकाऱ्यांकडूनही कोणताच प्रतिसाद मिळत नाही. पाणीटंचाईची महिती वरिष्ठांना देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी नऊ कोटी ९९ लाखांचा आराखडा तयार केला आहे. यातील बहुतांश उपाययोजना तातडीने व्हाव्या, यासाठी तहसीलदार आणि पंचायत समितीस्तरावरच अधिकार देण्यात आले आहे. विहीर अधिग्रहण, टँकर लावणे, तात्पुरती पूरक नळयोजना घेणे, नळयोजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, विहीर खोल करणे यासारख्या उपाययोजना टंचाईग्रस्त गावात केल्या जातात. जिल्हास्तरावरून पाणीटंचाई उपाययोजनेचा आराखडा तयार होत असला तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी पंचायत समितीस्तरावरून केली जाते. पाणीटंचाई उपाययोजनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून तीन टँकरचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. ६९ विंधन विहिरींचे प्रस्ताव मंजूर झाले. तात्पुरत्या दुरुस्तीचे १२ पैकी ८ प्रस्ताव मंजुरीकरिता पाठविले. त्यापैकी ४ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. याच पद्धतीने विशेष नळयोजना दुरुस्तीचे १२४ प्रस्ताव प्राप्त झाले असून तपासणी करण्याची कार्यवाही सुरू आहे. ८५ अंदाजपत्रक मंजुरीसाठी दिले आहे. त्यातील ८७ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. ७१ खासगी विहीर अधिग्रहण करून पर्यायी पाणीपुरवठा केला जात आहे. यात उमरखेड ४१, वणी ३, दिग्रस ११, आर्णी १०, मारेगाव ४, कळंब २ अशी स्थिती आहे. या व्यतिरिक्त पुसद तालुक्यातील बाळूवाडी, अनसिंग उल्हासवाडी, कारला आणि उपवनवाडी येथे टँकर मंजूर झाले आहे. एका टँकरद्वारे बाळवाडी पाणीपुरवठा सुरू आहे. या उपाययोजनांची माहिती मिळविताना जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा विभागाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. गटविकास अधिकाऱ्यांकडून कुठलीही उपाययोजना अंमलात आणली जात आहे याची माहितीच दिली जात नाही. दुसरीकडे टंचाई आराखड्यावर सचिवस्तरावरून घेतल्या जाणाऱ्या बैठकांमध्ये पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना उत्तरे द्यावी लागतात. त्यांच्याकडे अपडेट स्थितीची आकडेवारी उपलब्ध नसल्याने बोलणी खावी लागते. पाणीपुरवठा विभागातील एका लिपिकावर माहिती गोळा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. रोज सकाळी १६ ही पंचायत समिती कार्यालयात फोनवरून पाणीटंचाई उपाययोजनांचा अहवाल मागितला जातो. मात्र प्रतिसाद नसल्याने हे काम नित्याचेच झाले आहे. टंचाई आराखडा राबविण्यावरून जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येते. त्यामुळेच बरेचवेळा अद्यायावत स्वरूपाची माहिती जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाला उपलब्ध होत नाही. (कार्यालय प्रतिनिधी)