शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

टिपेश्वर अभयारण्यातील प्राणी संकटात$$्रिपांढरकवडा तालुका : वाघाच्या शिकारीचे प्रमाण वाढले, वन विभागाची उदासीनता

By admin | Updated: March 6, 2017 01:29 IST

टिपेश्वर अभयारण्यात व परिसरात सतत घडत असलेल्या वाघांच्या मृत्यूचे व फाशात अडकण्याचे प्रमाण सतत वाढत असल्याने तेथील वन्यप्राणी संकटात सापडले आहे.

पांढरकवडा : टिपेश्वर अभयारण्यात व परिसरात सतत घडत असलेल्या वाघांच्या मृत्यूचे व फाशात अडकण्याचे प्रमाण सतत वाढत असल्याने तेथील वन्यप्राणी संकटात सापडले आहे.पट्टेदार वाघीणीच्या शिकारीचा प्रयत्न झाल्यानंतर जखमी झालेली वाघीण पर्यटकांच्या तसेच खुद्द वन्यजीव विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यांच्या दृष्टीस पडल्यामुळे वन्यप्राण्यांची शिकार होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. गेल्या पाच वर्षात चार पट्टेदार वाघांचा मृत्यू झाल्यानंतरही वन विभागाचे अधिकारी गंभीर नाही. चार वाघांच्या मृत्यूची दप्तरी नोंद असली तरी टिपेश्वर अभयारण्यातील अनेक प्राण्यांची आत्तापर्यंत शिकार झाली असल्याचे वन मजुरांनीच नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. बोथ (बहात्तर) येथे फाशात अडकून पट्टेदार वाघाचा बळी गेला होता. त्यानंतर अभयारण्यातील प्रवेशद्वारापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तिलखान नर्सरीजवळ वाघाचा कुजलेला मृतदेह आढळून आला होता. तसेच सुन्ना व मुकुटबन शिवारातसुद्धा वाघांचा मृतदेह आढळून आला होता. पाटणबोरी वन परीक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पिवरडोलच्या जंगलात नायलॉन दोरीच्या फाशात वाघ अडकला होता. परंतु त्या वाघाने स्वत:ची सुटका करून घेतली होती. त्यानंतर आता पाच दिवसांपूर्वी गळ्याला फास अडकलेल्या व जखमी झालेल्या स्थितीत असलेली वाघीण टिपेश्वर अभयारण्याच्या जवळच असलेल्या हापशी पॉर्इंटजवळ खुद्द वन अधिकाऱ्यांनी पाहिली. विशेष म्हणजे गळ्यामध्ये फासे अडकलेल्या स्थितीत जखमी असलेली ही वाघीण काही पर्यटकांना १५ ते २० दिवसापूर्वीच दिसली. या वाघणीच्या मानेला दोन ते अडीच इंच खोलीची जखम असून गळ्याला फासा लटकलेला आहे, अशी माहिती त्यांनी संबंधित वन अधिकाऱ्यांनासुद्धा दिली. परंतु याकडे कोणीही लक्ष दिले नसल्याचे अनेकजण सांगतात. अभयारण्यात नेमके किती पट्टेदार वाघ आहेत, याबाबत अधिकारी वेगवेगळे उत्तर देत असल्याने वाघांची संख्या नेमकी किती, याबाबत अधिकृत माहिती नाही. कमीत कमी आठ ते दहा वाघ या अभयारण्यात असावे, असे परिसरातील जनतेचे म्हणणे आहे. (तालुका प्रतिनिधी)तेलंगणातील टोळीवर वनाधिकाऱ्यांचा संशयआंध्र प्रदेशाची सीमा अभयारण्याला लागूनच असल्यामुळे तेथील शिकारी वन्यप्राण्यांची शिकार करण्याकतिरा टिपेश्वर अभयारण्यात येतात. यापूर्वी आंध्र प्रदेशातील काही व्यक्तींना जंगली प्राण्यांची शिकार करून चारचाकी वाहनातून नेताना अभयारण्याच्या सिमेजवळ अटकसुद्धा करण्यात आली होती. जंगलामध्ये शिकार करण्यासाठी आलेल्या तेलंगणातील शिकाऱ्यांनी गोळीबारसुद्धा केला होता. शिकारदारांच्या टोळीने या भागात त्यावेळी धुमाकूळ घातला होता. आता हीच टोळी पुन्हा सक्रिय झाली असल्याची माहिती एका जबाबदार सुत्राने दिली. पट्टेदार वाघीणीची शिकार करण्यामागे याच टोळीचा हात असावा, असा संशयसुद्धा त्यांनी व्यक्त केला.