शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

वाघाच्या दहशतीने शेतीकामे थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 22:00 IST

ऑनलाईन लोकमतमोहदा : वाघाच्या दहशतीमुळे परिसरातील शेतीकामे थांबली आहे. कामेच नसल्याने मजुरांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतातील उभी पिके काढण्याचा प्रश्न असल्याने शेतकरीही अडचणीत सापडले आहे. वाघाच्या बंदोबस्तासाठी परिसरात मागील पाच महिन्यांपासून वनविभागाचे पथक तैनात होते. मात्र या पथकाला यश आलेले नाही. परिसराशी संबंधित लोकप्रतिनिधीही हा प्रश्न गांभीर्याने घेत ...

ठळक मुद्देमजूरही अडचणीत : पाच महिने लोटूनही पथक अपयशी, नागरिकात वाढतोय असंतोष

ऑनलाईन लोकमतमोहदा : वाघाच्या दहशतीमुळे परिसरातील शेतीकामे थांबली आहे. कामेच नसल्याने मजुरांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतातील उभी पिके काढण्याचा प्रश्न असल्याने शेतकरीही अडचणीत सापडले आहे. वाघाच्या बंदोबस्तासाठी परिसरात मागील पाच महिन्यांपासून वनविभागाचे पथक तैनात होते. मात्र या पथकाला यश आलेले नाही. परिसराशी संबंधित लोकप्रतिनिधीही हा प्रश्न गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे.राळेगाव, पांढरकवडा तालुक्यात येत असलेल्या वनक्षेत्रात वाघाचे १२ बळी ठरले आहेत. शेतकरी, शेतमजूर, गुराखी यांचा फडशा पाडला आहे. दोन दिवसांपूर्वी राळेगाव तालुक्याच्या लोणी येथील शेतकºयाचा बळी या वाघाने घेतला. आठवडा-पंधरा दिवसात वाघबळी ठरत असतानाही बंदोबस्त मात्र होत नाही. दरम्यानच्या काळात वनविभागातील अधिकारी, कर्मचारी अशा जवळपास ३०० जणांचा ताफा या परिसरात होता. शूटर, स्निपर डॉग, ड्रोन, नाईट व्हिजन कॅमेरे, ट्रॅप कॅमेरे सज्ज होते. ६०० मीटर जाळीही लावण्यात आली होती. शेळी, म्हशीचे बछडे वाघाचे भक्ष्य म्हणून जंगलात सोडले होते. या सर्व उपाययोजना फेल ठरल्या.शेतकरी, शेतमजूर अडचणीत आलेले असताना परिसराशी संबंधित लोकप्रतिनिधी, मंत्री यांचे दुर्लक्ष सुरू आहे. मदतीच्या वितरणापुरती त्यांची हजेरी दिसत आहे. उपाययोजना गांभीर्याने राबविण्यासाठी त्यांच्याकडून कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही. मागील दोन वर्षांपासून वाघाच्या दहशतीमुळे पिकांचे नुकसान होत आहे. गरजा भागविणे शेतकरी, शेतमजुरांना कठीण झाले आहे. आता तरी कठोर उपाययोजना व्हाव्या, अशी नागरिकांची मागणी आहे.

टॅग्स :Tigerवाघ