शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
3
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
4
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
5
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
6
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
7
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
8
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
9
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
10
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
11
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
12
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
13
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
14
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
15
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
16
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
17
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
18
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
19
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
20
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष

वाघाच्या दहशतीने शेतीकामे थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 22:00 IST

ऑनलाईन लोकमतमोहदा : वाघाच्या दहशतीमुळे परिसरातील शेतीकामे थांबली आहे. कामेच नसल्याने मजुरांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतातील उभी पिके काढण्याचा प्रश्न असल्याने शेतकरीही अडचणीत सापडले आहे. वाघाच्या बंदोबस्तासाठी परिसरात मागील पाच महिन्यांपासून वनविभागाचे पथक तैनात होते. मात्र या पथकाला यश आलेले नाही. परिसराशी संबंधित लोकप्रतिनिधीही हा प्रश्न गांभीर्याने घेत ...

ठळक मुद्देमजूरही अडचणीत : पाच महिने लोटूनही पथक अपयशी, नागरिकात वाढतोय असंतोष

ऑनलाईन लोकमतमोहदा : वाघाच्या दहशतीमुळे परिसरातील शेतीकामे थांबली आहे. कामेच नसल्याने मजुरांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतातील उभी पिके काढण्याचा प्रश्न असल्याने शेतकरीही अडचणीत सापडले आहे. वाघाच्या बंदोबस्तासाठी परिसरात मागील पाच महिन्यांपासून वनविभागाचे पथक तैनात होते. मात्र या पथकाला यश आलेले नाही. परिसराशी संबंधित लोकप्रतिनिधीही हा प्रश्न गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे.राळेगाव, पांढरकवडा तालुक्यात येत असलेल्या वनक्षेत्रात वाघाचे १२ बळी ठरले आहेत. शेतकरी, शेतमजूर, गुराखी यांचा फडशा पाडला आहे. दोन दिवसांपूर्वी राळेगाव तालुक्याच्या लोणी येथील शेतकºयाचा बळी या वाघाने घेतला. आठवडा-पंधरा दिवसात वाघबळी ठरत असतानाही बंदोबस्त मात्र होत नाही. दरम्यानच्या काळात वनविभागातील अधिकारी, कर्मचारी अशा जवळपास ३०० जणांचा ताफा या परिसरात होता. शूटर, स्निपर डॉग, ड्रोन, नाईट व्हिजन कॅमेरे, ट्रॅप कॅमेरे सज्ज होते. ६०० मीटर जाळीही लावण्यात आली होती. शेळी, म्हशीचे बछडे वाघाचे भक्ष्य म्हणून जंगलात सोडले होते. या सर्व उपाययोजना फेल ठरल्या.शेतकरी, शेतमजूर अडचणीत आलेले असताना परिसराशी संबंधित लोकप्रतिनिधी, मंत्री यांचे दुर्लक्ष सुरू आहे. मदतीच्या वितरणापुरती त्यांची हजेरी दिसत आहे. उपाययोजना गांभीर्याने राबविण्यासाठी त्यांच्याकडून कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही. मागील दोन वर्षांपासून वाघाच्या दहशतीमुळे पिकांचे नुकसान होत आहे. गरजा भागविणे शेतकरी, शेतमजुरांना कठीण झाले आहे. आता तरी कठोर उपाययोजना व्हाव्या, अशी नागरिकांची मागणी आहे.

टॅग्स :Tigerवाघ