शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
2
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
3
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
4
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
5
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
6
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
7
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
8
नवीन वर्षात गुंतवणुकीचा श्रीगणेशा! 'या' आहेत श्रीमंत करणाऱ्या टॉप ५ योजना; सुरक्षा आणि दमदार परतावा
9
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
10
Vijay Hazare Trophy : कोण आहे Devendra Bora? ज्याच्यासमोर हिटमॅन रोहित 'गोल्डन डक'सह ठरला फ्लॉप
11
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
12
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
13
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
14
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
15
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
16
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
17
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
18
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
19
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
20
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषद विस्ताराच्या उंबरठ्यावर

By admin | Updated: December 25, 2014 23:38 IST

नगरपरिषदेवर लगतच्या दहा ग्रामपंचायतीमध्ये वाढणाऱ्या नागरिकरणाचा दाब वाढत आहे. त्यामुळे नगरपरिषद आणि ग्रामपंचायत क्षेत्रात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर कायमस्वरूपी तोडगा

नागरिकरणाचा वाढतोय दाब : दहा ग्रामपंचायतींच्या विलीनीकरणाने मिळणार वाट सुरेंद्र राऊत - यवतमाळ नगरपरिषदेवर लगतच्या दहा ग्रामपंचायतीमध्ये वाढणाऱ्या नागरिकरणाचा दाब वाढत आहे. त्यामुळे नगरपरिषद आणि ग्रामपंचायत क्षेत्रात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगरपरिषद क्षेत्राचा विस्तार करणे हाच एकमेव उपाय पुढे आला आहे. शहराच्या लोकसंख्येइतकीच संख्या ग्रामीण भागात आहे. त्यामुळे यवतमाळ नगरपरिषद ही विस्तारच्या उंबरठ्यावर उभी ठाकली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार यवतमाळ शहराच्या लोकसंख्येत चार हजाराने घट झाली. शहराची लोकसंख्या एक लाख २० हजार इतकी होती. आता ती १ लाख १६ हजार इतकी झाली आहे. त्यात नुकत्याच समाविष्ठ झालेल्या यवतमाळ ग्रामीण क्षेत्राच्या १४ हजार ७८० लोकसंख्येची आणखी भर पडली आहे. प्रत्यक्षात इतकीच लोकसंख्या लगतच्या दहा ग्रामपंचायतींची आहे. येथे एक लाख २३ हजार ६११ जणांचे वास्तव्य आहे. विशेष असे, हे सर्व नागरिक दिवसभर नगरपरिषद क्षेत्रातच राहतात. केवळ त्यांचे वास्तव्य ग्रामीण भागात आहे. त्यामुळेच नगरपरिषदेने एक लाख ३० हजार लोकसंख्या गृहीत धरून केलेले नियोजन कोलमडते. शहरातील रस्त्यावर मोठ्याप्रमाणात वाहनांची वाढलेली गर्दी याचा पुरावा आहे. नियोजन एक लाख ३० हजाराचे आणि प्रत्यक्ष वापर करणारे दोन लाख ५४ हजार ३९१ नागरिक असा, असमतोल निर्माण झाला आहे. त्यामुळेच नागरी सुविधांचा बोजवारा उडतो आहे. नगरपरिषद क्षेत्रातून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाल्याने लोकसंख्येत घट दिसत असलीतरी प्रत्यक्ष येथील साधनांचा वापर करणारी लोकसंख्या दुपट आहे. याचा ताळमेळ बसविण्यासाठी नगरपरिषदेचा विस्तार करणे हाच एकमेव पर्याय पुढे आला आहे. यातून नगरपरिषदेच्या उत्पन्नातही दुपटीने वाढ होणार आहे. शहरात सुमारे ३१ हजार मालमत्ता असून तेवढीच वाढ विस्तारानंतर अपेक्षित आहे. सध्या पाच कोटींच्या घरात वसूल होणार कर विस्तारानंतर दहा कोटींवर पोहोचणार आहे. शिवाय नगरविकास विभागाच्या नियमाप्रमाणे नगरपरिषद क्षेत्रात पाच किलोमीटरच्या परिघात येणाऱ्या ग्रामपंचायतींचे विलिनीकरण करणे आवश्यक आहे. येथे सर्वच ग्रामपंचायत पाची किलोमीटर तर सोडाच थेट नगरपरिषद क्षेत्रातच मिसळलेल्या आहे. अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीची हद्द कोणती आणि नगर परिषदेची कोणती हेच लक्षात येत नाही. त्यामुळे सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडते. या समस्येवर हद्द वाढ हेच औषध असून त्यावर शुक्रवार नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे.