शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

वणी तालुक्यात पुरात तिघे वाहून गेले; महिलेचा मृत्यू, दोघे बेपत्ता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 21:26 IST

गुरूवारी सायंकाळी अचानक डोर्ली परिसरात धुव्वादार पाऊस बरसला. त्यामुळे डोर्ली गावालगत असलेल्या नाल्याला प्रचंड पुर आला. बैलजोडीचा पाण्यात बुडून अंत झाला.

वणी (यवतमाळ) : तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाºया डोर्ली गावालगतच्या नाल्याला आलेल्या पुरात तीन बैलबंड्या अचानक वाहून गेल्या. यात बैलबंडीमध्ये बसून असलेले तिघेजण वाहून गेले. त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला, तर दोघे अद्यापही बेपत्ता आहे. बैलबंडीला जुंपून असलेली एक बैलजोडीही या दुर्घटनेत मरण पावली. ही घटना गुरूवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.

मिना मारोती कुडमेथे (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. विनायक झोलबा उपरे (४७) व हरिदास रामा खाडे (४८) हे पुरात वाहून गेले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. याच पुरात मनीषा प्रशांत सिडाम आणि मीना मनोहर सिडाम या दोन महिला वाहून गेल्या होत्या. मात्र काही अंतरावर त्या सुखरूप आढळल्या. त्यांना उपचाराकरिता दवाखान्यात भरती केले आहे. 

गुरूवारी सायंकाळी अचानक डोर्ली परिसरात धुव्वादार पाऊस बरसला. त्यामुळे डोर्ली गावालगत असलेल्या नाल्याला प्रचंड पुर आला. याचदरम्यान शेतातून चार बैलबंड्या गावाकडे परत येत असताना त्या नाल्यात उतरल्या. पुराचा अंदाज न आल्याने तीन बैलबंड्या अचानक प्रवाहात उलटल्या. नाल्याला ओढा अधिक असल्याने बैलबंडीतील मिना कुडमेथे, विनायक उपरे व हरिदास खाडे हे तिघेहीजण प्रवाहात वाहून गेले. यापैकी शोध मोहिमेदरम्यान मिना कुडमेथेचा मृतदेह हाती लागला, तर विनायक उपरे व हरिदास खाडे या दोघांचा शोध सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता, अशी माहिती सरपंच विजय दादाजी टोंगे यांनी ‘लोकमत’ला दिली. या दुर्दैवी घटनेत विनायक उपरे यांची मालकीच्या बैलजोडीचाही पाण्यात बुडून करूण अंत झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे, तहसीलदार श्याम धनमने, गटविकास अधिकारी राजेश गायनर, शिरपूरचे ठाणेदार अनिल राऊत व पोलीस ताफा डोर्लीत दाखल झाला. मात्र घटनास्थळ गावापासून काही अंतरावर व अतिशय दुर्गम असल्याने रात्रीच्या अंधारात बेपत्ता लोकांचा शोध घेणे अवघड होऊन बसले होते.

टॅग्स :Rainपाऊस