शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

ग्रामीण नळयोजनेचे तीनतेरा

By admin | Updated: January 11, 2015 22:57 IST

डोंगरदऱ्यात वसलेल्या उमरखेड तालुक्यातील नागरिकांना शुद्ध आणि मुबकल पाणी मिळावे यासाठी ११ कोटींची नळ योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र या योजनेचे तीन-तेरा वाजले

उमरखेड : डोंगरदऱ्यात वसलेल्या उमरखेड तालुक्यातील नागरिकांना शुद्ध आणि मुबकल पाणी मिळावे यासाठी ११ कोटींची नळ योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र या योजनेचे तीन-तेरा वाजले असून १४ गावातील नळ योजना कायमस्वरूपी बंद आहे. तर ७० लाख रुपयांच्या नळ योजनेचे काम अपूर्ण आहे. ७१ गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दीड लाख नागरिकांना आजही आपली तहान हातपंपावर भागवावी लागत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेअंतर्गत कोट्यवधी रुपयांची नळ योजना राबविण्यात आली. परंतु पंचायत समितीच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील अकोली, अंबाळी, बाळदी, बेलखेड, भवानी, बिटरगाव, भोजनगर, बोरगाव, बोरी, चातारी, बोथा, बिटरगाव बु., ब्राम्हणगाव, चिखली, चिंचोली तांडा यासह अनेक गावात नळ योजना कार्यान्वित करण्यासाठी ११ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र पंचायत समितीने देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने ही योजना कुचकामी ठरली आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्ती अभावी कोट्यवधी रुपयांच्या नळ योजनेचा बोजवारा उडाला आहे.बेलखेड, चिल्ली, देवसरी, पार्डी, पोफाळी, सावळेश्वर, बिटरगाव, भवानी, मुरली, पळशी, बाळदी, भोखरखेडा, सोनदाबी, हातला या गावातील सुमारे तीन कोटी रुपयांची नळ योजना बंद आहे. त्याच प्रमाणे ढाणकी येथील योजनाही बंद पडली आहे. कारखेडा येथील ४० लाखांची योजना, भांबरखेडा येथील आठ लाख, गोविंदपूर आठ लाख, मरसूळ आठ लाख, मुरली आठ लाख अशा ७२ लाखांच्या योजना अर्धवट स्थितीत आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अनेक गावात हातपंपाचा आधार घ्यावा लागत आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उदासीनतेने उमरखेड तालुक्यात नळ योजनेची कामे रखडल्याचा आरोप गावकरी करीत आहे. (शहर प्रतिनिधी)