शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
5
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
6
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
7
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
8
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
9
बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे
10
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
11
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
12
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
13
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
14
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
16
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
17
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
18
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
19
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
20
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन

पुसदला अखेर तीन आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 10:05 PM

विधान परिषदेसाठी काँग्रेसचे डॉ. वजाहत मिर्झा आणि भाजपाचे अ‍ॅड. निलय नाईक बिनविरोध निवडले गेले असून त्याच्या घोषणेची औपचारिकता तेवढी बाकी आहे. या निमित्ताने पुसदला पहिल्यांदाच एक नव्हे तर तीन आमदारांची लॉटरी लागली आहे.

ठळक मुद्देविधान परिषद : मिर्झा, नाईक बिनविरोध

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधान परिषदेसाठी काँग्रेसचे डॉ. वजाहत मिर्झा आणि भाजपाचे अ‍ॅड. निलय नाईक बिनविरोध निवडले गेले असून त्याच्या घोषणेची औपचारिकता तेवढी बाकी आहे. या निमित्ताने पुसदला पहिल्यांदाच एक नव्हे तर तीन आमदारांची लॉटरी लागली आहे.जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांना काँग्रेसने विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्या पाठोपाठ दुसऱ्याच दिवशी भाजपानेही पुसदवर लक्ष केंद्रीत करीत बंगल्याला सुरुंग लावताना अ‍ॅड. निलय नाईक यांना उमेदवारी दिली. एकापाठोपाठ दोन उमेदवार एकट्या पुसदमधून दिले गेल्याने राज्याच्या राजकारणात पुसदची चर्चा होऊ लागली. अपेक्षेनुसार मिर्झा व नाईक हे विधान परिषदेवर बिनविरोध निवडले गेले. कारण ११ जागा व ११ उमेदवार आहेत. १२ व्या उमेदवाराने अखेरच्या दिवशी माघार घेतल्याने प्रत्यक्ष मतदानाची वेळ न येता उमेदवार बिनविरोध झाले.पुसदला राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते मनोहरराव नाईक हे विधानसभेचे आमदार आहेत. त्यात आता वजाहत मिर्झा व निलय नाईक यांच्या रुपाने आणखी दोघांची भर पडली आहे. या तीन आमदारांवर आता आपला पक्ष गावखेड्यापर्यंत वाढविणे, तो सर्व अंगांनी बळकट करणे व पुसदचा सर्वांगिण विकास साधण्याची जबाबदारी आली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पुसदमधून त्या-त्या पक्षाला मिळणाºया मतांवर या दोन्ही नव्या आमदारांची राजकीय उपयोगिता मोजली जाणार एवढे निश्चित.पुसद जिल्हा निर्मीती जबाबदारी वाढलीगेली कित्येक वर्ष पुसद जिल्हा होणार याची चर्चा आहे. मात्र अद्याप पुसदकरांचे हे स्वप्न प्रत्यक्षात साकार झालेले नाहीत. पुसदकरांची ही स्वप्नपूर्ती करण्याची जबाबदारी आता या तीन आमदारांवर आली आहे. त्यातही निलय नाईक सत्ताधारी भाजपाचे असल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी अधिक प्रमाणात आल्याचे मानले जाते.काँग्रेसमध्ये नव्या जिल्हाध्यक्षांची चर्चा!सुमारे वर्षभरापूर्वी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनलेल्या डॉ. वजाहत मिर्झा यांना अल्पावधीतच थेट आमदारकी दिली गेली. एक व्यक्ती एक पद या न्यायाने आता डॉ. मिर्झा यांच्या जागी काँग्रेसमध्ये नवा जिल्हाध्यक्ष नेमला जाईल का याची चर्चा जिल्हा काँग्रेसच्या गोटात सुरू झाली आहे. त्यासाठी अनेक जण इच्छुकही आहेत. मात्र लोकसभा तोंडावर आल्याने जिल्हाध्यक्ष बदलतील की नाही याबाबत नेते मंडळी साशंकता व्यक्त करीत आहेत.