शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

तिघांच्या मृत्यूने आजंतीत आसवांचा आर्त आकांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 23:24 IST

गावातील पाणीटंचाईची समस्या सोडवून समाधानाने गावाकडे परतणाºया तरुणांवर काळाने झडप घातली.

ठळक मुद्देट्रकने दुचाकीला चिरडले : पाणी समस्या मिटवून येत होते गावाकडे, कोहळा पुनर्वसित गावाजवळ

गुरुवारी अपघातकिशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : गावातील पाणीटंचाईची समस्या सोडवून समाधानाने गावाकडे परतणाºया तरुणांवर काळाने झडप घातली. नेर-कारंजा मार्गावर कोहळा पुनर्वसनजवळ काळरुपी ट्रकने दुचाकीस्वार तिघांनाही गुरुवारी रात्री चिरडले. या तिघांच्या मृत्यूची वार्ता येताच गावात स्मशानशांतता पसरली. शुक्रवारी दुपारी अख्या गावाने या तीन तरुणांना अखेरचा निरोप दिला. तेव्हा आजंतीत आसवांचा आर्त आकांत सुरू होता.अंकुश वसंता जुनघरे (२६), घनश्याम श्रृंगारे (३२) आणि राहुल रमेश काळे (२७) असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहे. तालुक्यातील आजंती (खाकी) येथे कायम पाणी टंचाई असते. गावातील ही पाणीटंचाई मिटविण्यासाठी हे तिघेही धडपडत होते. नेर येथे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना पाणीटंचाई विषयावर भेटण्यासाठी हे तिघेही दुचाकीने आलेत. महसूल राज्यमंत्र्यांची भेट घेऊन पाणी समस्या निकाली काढली. समाधानी चेहºयाने दुचाकीने ते गावाकडे निघाले होते. परंतु कोहळा पुनर्वसन जवळ समोरुन येणाºया आणि एकच लाईट सुरू असलेल्या ट्रकने या तिघांनाही चिरडले. त्यात अंकुश आणि घनश्यामचा जागीच मृत्यू झाला. तर राहूलला उपचारासाठी यवतमाळला नेताना वाटेतच मृत्यू झाला.या घटनेची माहिती गावात होताच अनेकांनी अपघात स्थळी धाव घेतली. गावची पाणीटंचाई मिटवून येताना अपघात झाल्याने प्रत्येक जण हळहळत होता. शुक्रवारी तिघांचीही उत्तरीय तपासणी करून प्रेत गावात आणले. तेव्हा गावात आकांत झाला. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूच्या धारा लागल्या. कुटुंबीयांचा आक्रोश तर हृदय चिरणारा होता. दुपारी या तिघांचीही सामूहिक अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत गावातील आबालवृद्ध सहभागी झाले होते. प्रत्येक जण हळहळत होता.गावात चूल पेटली नाहीतीन तरुणांच्या अपघाती निधनाने चिमुकले आजंती गाव हादरले. शुक्रवारी कुणाच्याही घरी चूल पेटली नाही. गावाच्या पाणीटंचाईसाठी धडपडणाºया तरुणांचा असा बळी जावा याचीच प्रत्येकाला हळहळ लागली होती. या तिघांपैकी घनश्याम श्रृंगारे विवाहित होता. तो आपल्या कुटुंबाचा शेतीवर उदरनिर्वाह करीत होता. त्याला आठ वर्षाची मुलगी आहे. राहुल काळे हा एका खासगी कंपनीत कामाला होता. तो आई-वडिलांचा एकुलता एक होता. अंकुशची स्थितीही तीच आहे. वृद्ध आई-वडिलांचा एकमेव आधार होता.महसूल राज्यमंत्र्यांकडून कुटुंबीयांचे सांत्वनपाणीटंचाईचा प्रश्न घेऊन आलेल्या तीन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती या भागाचे आमदार आणि महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना मिळाली. त्यांनी शुक्रवारी आजंती गाठून तिघांच्याही कुटुंबियांचे सांत्वन केले. अंत्ययात्रेला माजी राज्यमंत्री संजय देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, जिल्हा परिषद सदस्य निखील जैत, भरत मसराम, उमेश गोडे, पंजाबराव शिरभाते यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.