शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
5
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
6
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
7
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
8
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
9
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
11
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
12
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
13
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
14
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
15
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
16
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
17
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
18
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
19
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
20
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा

तिघांच्या मृत्यूने आजंतीत आसवांचा आर्त आकांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 23:24 IST

गावातील पाणीटंचाईची समस्या सोडवून समाधानाने गावाकडे परतणाºया तरुणांवर काळाने झडप घातली.

ठळक मुद्देट्रकने दुचाकीला चिरडले : पाणी समस्या मिटवून येत होते गावाकडे, कोहळा पुनर्वसित गावाजवळ

गुरुवारी अपघातकिशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : गावातील पाणीटंचाईची समस्या सोडवून समाधानाने गावाकडे परतणाºया तरुणांवर काळाने झडप घातली. नेर-कारंजा मार्गावर कोहळा पुनर्वसनजवळ काळरुपी ट्रकने दुचाकीस्वार तिघांनाही गुरुवारी रात्री चिरडले. या तिघांच्या मृत्यूची वार्ता येताच गावात स्मशानशांतता पसरली. शुक्रवारी दुपारी अख्या गावाने या तीन तरुणांना अखेरचा निरोप दिला. तेव्हा आजंतीत आसवांचा आर्त आकांत सुरू होता.अंकुश वसंता जुनघरे (२६), घनश्याम श्रृंगारे (३२) आणि राहुल रमेश काळे (२७) असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहे. तालुक्यातील आजंती (खाकी) येथे कायम पाणी टंचाई असते. गावातील ही पाणीटंचाई मिटविण्यासाठी हे तिघेही धडपडत होते. नेर येथे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना पाणीटंचाई विषयावर भेटण्यासाठी हे तिघेही दुचाकीने आलेत. महसूल राज्यमंत्र्यांची भेट घेऊन पाणी समस्या निकाली काढली. समाधानी चेहºयाने दुचाकीने ते गावाकडे निघाले होते. परंतु कोहळा पुनर्वसन जवळ समोरुन येणाºया आणि एकच लाईट सुरू असलेल्या ट्रकने या तिघांनाही चिरडले. त्यात अंकुश आणि घनश्यामचा जागीच मृत्यू झाला. तर राहूलला उपचारासाठी यवतमाळला नेताना वाटेतच मृत्यू झाला.या घटनेची माहिती गावात होताच अनेकांनी अपघात स्थळी धाव घेतली. गावची पाणीटंचाई मिटवून येताना अपघात झाल्याने प्रत्येक जण हळहळत होता. शुक्रवारी तिघांचीही उत्तरीय तपासणी करून प्रेत गावात आणले. तेव्हा गावात आकांत झाला. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूच्या धारा लागल्या. कुटुंबीयांचा आक्रोश तर हृदय चिरणारा होता. दुपारी या तिघांचीही सामूहिक अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत गावातील आबालवृद्ध सहभागी झाले होते. प्रत्येक जण हळहळत होता.गावात चूल पेटली नाहीतीन तरुणांच्या अपघाती निधनाने चिमुकले आजंती गाव हादरले. शुक्रवारी कुणाच्याही घरी चूल पेटली नाही. गावाच्या पाणीटंचाईसाठी धडपडणाºया तरुणांचा असा बळी जावा याचीच प्रत्येकाला हळहळ लागली होती. या तिघांपैकी घनश्याम श्रृंगारे विवाहित होता. तो आपल्या कुटुंबाचा शेतीवर उदरनिर्वाह करीत होता. त्याला आठ वर्षाची मुलगी आहे. राहुल काळे हा एका खासगी कंपनीत कामाला होता. तो आई-वडिलांचा एकुलता एक होता. अंकुशची स्थितीही तीच आहे. वृद्ध आई-वडिलांचा एकमेव आधार होता.महसूल राज्यमंत्र्यांकडून कुटुंबीयांचे सांत्वनपाणीटंचाईचा प्रश्न घेऊन आलेल्या तीन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती या भागाचे आमदार आणि महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना मिळाली. त्यांनी शुक्रवारी आजंती गाठून तिघांच्याही कुटुंबियांचे सांत्वन केले. अंत्ययात्रेला माजी राज्यमंत्री संजय देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, जिल्हा परिषद सदस्य निखील जैत, भरत मसराम, उमेश गोडे, पंजाबराव शिरभाते यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.