शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

आर्णी तालुक्यात मनरेगा योजनेचे तीनतेरा

By admin | Updated: May 20, 2014 23:58 IST

शासनाच्यावतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मजुरांना हमखास रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो.

आर्णी : शासनाच्यावतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मजुरांना हमखास रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो. या महत्त्वाकांक्षी योजनेला काही ठिकाणी ठेकेदारांनीच सुरुंग लावल्याचे दिसून येते. मजुरांना काम देण्याऐवजी ठेकेदारांना काम वाटप केल्यामुळे या योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आर्णी तालुक्यात या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून झालेल्या कामांच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. तालुक्यामध्ये या योजनेंतर्गत विविध कामे मशीनच्या माध्यमातून करण्यात आली आहे. कंत्राटदारांनी अधिकार्‍यांना हाताशी धरून ही कामे केली आहे. या योजनेंतर्गत पंचायत समिती आर्णी, वन विभाग आर्णीच्या माध्यमातून मागील सत्रात माती नाला बांध, सिमेंट प्लग, पांदण रस्ते, भूमिगत बांध, शोषखड्डे, नाला सरळीकरण आदी कामे करण्यात आली. वास्तविक पाहता ही कामे मजुरांच्या माध्यमातून करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता काही ठेकेदारांनी ही कामे करीत असताना मशीनचा वापर करण्यात आला आहे. यामुळे मजुरांचा हक्काचा रोजगार मात्र हिरावला गेला आहे. या योजनेंतर्गत वर्षातील १०० दिवस मजुरांना रोजगार द्यावाच लागतो. यासाठी शासनाच्यावतीने जॉब कार्डही तयार करण्यात आले. मात्र हे जॉबकार्ड कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे. मजुरांना काही मोबदला देवून त्यांचे जॉबकार्ड ठेकेदार स्वत:कडे ठेवतात. या प्रकारे मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करण्यात आला आहे. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमतातून सुरुंग लागला आहे. ग्रामपातळीवर सरपंच व सचिवाला हाताशी धरून या योजनेचा पुरता बट्ट्याबोळ केला आहे. लाखो रुपयांची कामे मशीनने उरकविल्यानंतर याची देयके मात्र ठेकेदारांनी लाटली आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी बोगस व कंत्राटदाराच्या परिवारातील नातेवाईकांची नावे मजूर म्हणून नोंदविण्यात आली आहे. विशेषत: वन विभागामध्ये हा गैरप्रकार मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. राजकीय पाठबळाचा वापर करून कामाचे कंत्राट घेण्यात आल्यामुळे याकडे अधिकार्‍यांनी पाहिजे तसे लक्ष दिले नाही. विविध विभागातून करण्यात आलेल्या या कामामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून याची चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. तालुक्यामध्ये ठेकेदाराची एक विशिष्ट चेन निर्माण झाली असून ही ठेकेदारमंडळी अधिकार्‍यांना मॅनेज करून कामाचा पुरता बट्ट्याबोळ करीत आहे. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला ठेकेदारांनी सुरुंग लावल्यामुळे मजुरांचा रोजगार मात्र हिरावल्या गेला आहे. त्यामुळे आता तालुक्यातील मजुरांनी रोजगार भत्त्याची मागणी केली आहे. याची निष्पक्षपातीपणे चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व त्यांचे बँक अकाऊंट तपासावे, अशीसुद्धा मागणी जोर धरू लागली आहे. (तालुका प्रतिनिधी)