शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कोरोनाच्या धास्तीने महाराष्ट्रात वनपर्यटन रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 13:09 IST

राज्यात कोव्हीड-१९ या व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध उपाययोजना केल्या जात आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत विविध क्षेत्रातील पर्यटन क्षेत्रे बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहे.

ठळक मुद्देप्रधान मुख्य वनसंरक्षकाचे आदेश राज्यभरातील व्याघ्र प्रकल्प, अभयारण्ये ३१ मार्चपर्यंत बंद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणूचा महाराष्ट्रात शिरकाव झाला असून दररोज रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील वनपर्यटनावरही आता प्रतिबंध लावण्यात आला आहे. राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांमध्ये ३१ मार्चपर्यंत पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.या संदर्भात सोमवारी मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी तातडीने परिपत्रक जारी केले आहे. राज्यात कोव्हीड-१९ या व्हायरसमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध उपाययोजना केल्या जात आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत विविध क्षेत्रातील पर्यटन क्षेत्रे बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहे. त्या अनुषंगाने आता व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने व अभयारण्यातील पर्यटनालाही ३१ मार्चपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.राज्यातील काही व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांमध्ये देशभरातून तसेच विदेशातील पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात भेटी देत असतात. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणारे वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १८ मार्च ते ३१ मार्चपर्यंत ही स्थळे पर्यटनासाठी बंद राहतील असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. अभयारण्यांसोबतच एरोली (नवी मुंबई) येथील किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्र व त्यातील ठाणे क्रीक फ्लेमिंगो सफारी ही ठिकाणेही बंद राहणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस