शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शेतातील हजारोंचे साहित्य जळून खाक

By admin | Updated: May 31, 2015 02:18 IST

तालुक्यातील लोणी व पेंढारा या गावांमध्ये शेतातील काडीकचरा जाळणे महाग पडले.

नेर : तालुक्यातील लोणी व पेंढारा या गावांमध्ये शेतातील काडीकचरा जाळणे महाग पडले. यामध्ये इंजीन, शेणखताचे ढिगारे व २७० झाडे जळून खाक झाली. तालुक्यात दोन विविध घटनांमध्ये शेतात लावलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी घडली. तालुक्यातील पेंढारा येथील गोविंदराव बेले यांनी याबाबत पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी रामकृष्ण कांबळे याने शेतातील केरकचरा पेटविला. कचरा पेटत गेल्याने बेले यांच्या शेतासह इतर सहा शेतकऱ्यांच्या शेतातील शेणखताचे ढिगारे या आगीत जळाले. तसेच इंजीन जळून ५० हजारांचे नुकसान झाले. दुसऱ्या एका अशाच प्रकारच्या घटनेत लोणी शिवारात अशाच प्रकारे कचरा पेटविण्यासाठी आग लावली असता रोहयो योजनेतून रस्त्याच्या बाजुलाला लवलेली २७० झाडे जळून खाक झाली. याप्रकरणी लोणीचे ग्रामसेवक विशाल कुटे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. उन्हाळ््याच्या दिवसांमध्ये आग लागण्याचे प्रमाण अधिक असते. त्यातच सध्या शेतांमध्ये उन्हाळी मशागतीची कामे सुरू आहेत. यामध्ये कचरा गोळा करून तो जाळल्या जातो. बऱ्याचदा हवेमुळे ही आग इतरत्र पसरते. त्यासाठी योग्य ती काळजी घेणे अतिशय गरजेचे असते. ती न घेतल्या गेल्यामुळे नेर तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतांमध्ये आगीच्या या घटना घडल्या. (तालुका प्रतिनिधी)