शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

यवतमाळ जिल्ह्यात रस्त्याची हजारो कोटींची कामे मंजूर - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 19:11 IST

रस्ते हे देशाच्या विकासाच्या रक्तवाहिन्या आहेत. गावखेड्यांना दळणवळणासाठी सुलभता व्हावी, या उद्देशाने रस्ते विकासाची कामे सुरू करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात वर्धा ते यवतमाळ रस्त्यासाठी 1 हजार 43 कोटी रुपये, यवतमाळ ते महागाव रस्त्यासाठी 1 हजार 160 कोटी आणि महागाव ते वारंगा रस्त्यासाठी 1 हजार 84 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

यवतमाळ -  रस्ते हे देशाच्या विकासाच्या रक्तवाहिन्या आहेत. गावखेड्यांना दळणवळणासाठी सुलभता व्हावी, या उद्देशाने रस्ते विकासाची कामे सुरू करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात वर्धा ते यवतमाळ रस्त्यासाठी 1 हजार 43 कोटी रुपये, यवतमाळ ते महागाव रस्त्यासाठी 1 हजार 160 कोटी आणि महागाव ते वारंगा रस्त्यासाठी 1 हजार 84 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय जिल्ह्यात विविध रस्त्यांचे जाळे विणले जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.वणी येथे राष्ट्रीय महामार्ग 930, वरोरा-वणी सेक्शनचे चौपदरीकरण आणि पिंपळखुटी येथील अतिरिक्त दुपदरी रेल्वे ओव्हर ब्रिजचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रा. डॉ. अशोक उईके, राजू तोडसाम, माजी खासदार विजय दर्डा, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र चोपणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे विभागीय व्यवस्थापक एम. चंद्रशेखर, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे आदी उपस्थित होते.यवतमाळ आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यात 10 हजार कोटी रुपये रस्त्यांसाठी मंजूर करण्यात आले आहेत, असे सांगून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी म्हणाले, वणी शहरातील दोन किलोमीटरच्या सिमेंट रस्त्यासाठी 20 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. शेतक-यांना सिंचनाची सोय आणि अधिक उत्पादन मिळण्यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील आहे. शेतीमध्ये नवनवीन संशोधनाची गरज आहे. शेतउत्पादनावर भविष्यात पेट्रोल, डिझेल, गॅस निर्माण करण्याचे नियोजन आहे. नागपूरमध्ये इथेनॉलवर चालणा-या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. पराट्या, तुराट्या, ज्वारीचे फड, सोयाबीनचे कुटार आदी बायोमासपासून सेकंड जनरेशन इथेनॉल आणि बायो सीएनजी तयार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.बांबूपासून शर्ट, फर्निचर, लोणचं, पेपर, प्लायवूड आणि बायो इथेनॉल तयार करता येते. त्यामुळे बांबुची लागवड करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे बांबु आता गवत या प्रकारामध्ये मोडत असल्यामुळे बांबु तोडण्यासाठी परवानगीची गरज नाही. बायोसीएनजी सारखे प्रकल्प यवतमाळ-वणी भागात सुरू करण्याचे नियोजन आहे. अमेरिकेतील कंपनीच्या सहाय्याने भद्रावतीला कोळशापासून युरिया तयार करण्याचे तंत्रज्ञान आणले आहे. वणी भागात कोळसा असल्यामुळे येथे मिथेनॉलचे उद्योग उभे राहू शकतात. राज्यातील जलसंवर्धनाबाबत गडकरी म्हणाले, सिंचनासाठी राज्याला 1 लक्ष कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यापैकी 20 हजार कोटी रुपये देण्यात आले आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील 12 प्रकल्प आहे. भविष्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने ब्रिज कम बंधा-याची काम हाती घ्यावी. यवतमाळमध्ये सेंद्रीय शेतीची कामे चांगली आहे. त्यासाठी नवनवीन संशोधन समजून घेण्याची गरज आहे. शेतीवरचा खर्च कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्यात विविध क्षेत्रात एकूण 5 लक्ष कोटींची कामे करण्याचे उद्दिष्ट आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार सुरेश धानोरकर यांनी मनोगत व्यक्त केले. यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणद्वारा जिल्ह्यातील वणी येथील राष्ट्रीय महामार्ग 930 वर वरोरा ते  वणी एकूण 18.31 किमी लांबीच्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. प्रकल्पाचा टप्पा वरोरापासून 313.850 किमी ते  332.160 किमी पर्यंतचा आहे. या महामार्गाचे कामकाज ईपीसी म्हणजेच इंजिनीअरींग खरेदी आणि बांधकाम या तत्वावर करण्यात येणार आहे. चार पदरी असणाऱ्या या महामार्गासाठी एकूण 584.58 कोटी निधी लागणार असून भुमी अधिग्रहणासाठी 312.69 कोटी असे एकूण 904.25 कोटी रुपयांची तरतुद केलेली आहे. याअंतर्गत वर्धा नदीवरील एक मोठा पुल, तीन लहान पुल, वरोरा बायपासवर एक रेल ओव्हरब्रिज, जांब ते चंद्रपुर वाहतूक अबाधित राहावी यासाठी वरोरा बायपासच्या आरंभ बिंदुजवळ एक उड्डाण पूल प्रस्तावित आहे.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीYavatmalयवतमाळMaharashtraमहाराष्ट्र