शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

ज्यांनी 'तो' प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला, त्यांना योग्य गुण देणार, बोर्डाचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 14:02 IST

दहावीच्या परीक्षेत भूगोलाचा पेपर सोडविताना हजारो विद्यार्थ्यांना आलेखच मिळाला नाही. त्यामुळे आलेखावरील प्रश्नांचे गुण वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती.

ठळक मुद्देदहावीच्या परीक्षेत भूगोलाचा पेपर सोडविताना हजारो विद्यार्थ्यांना आलेखच मिळाला नाही. त्यामुळे आलेखावरील प्रश्नांचे गुण वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. ज्यांनी हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला, त्यांना योग्य गुणदान केले जाईल, अशी स्पष्टोक्ती बोर्डाच्या सचिवांनी दिली.मार्चमध्ये दहावीची परीक्षा पार पडली. त्यात २२ मार्च रोजी भूगोलाचा (सामाजिक शास्त्र -२) पेपर होता.

यवतमाळ - दहावीच्या परीक्षेत भूगोलाचा पेपर सोडविताना हजारो विद्यार्थ्यांना आलेखच मिळाला नाही. त्यामुळे आलेखावरील प्रश्नांचे गुण वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, ज्यांनी हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला, त्यांना योग्य गुणदान केले जाईल, अशी स्पष्टोक्ती बोर्डाच्या सचिवांनी दिली आहे.

मार्चमध्ये दहावीची परीक्षा पार पडली. त्यात २२ मार्च रोजी भूगोलाचा (सामाजिक शास्त्र -२) पेपर होता. त्यात आलेखावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. मात्र अमरावती विभागातील शेकडो परीक्षा केंद्रांवरील हजारो विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेसोबत हे आलेख मिळालेच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना हे प्रश्नही सोडविता आलेले नाही. आता अभ्यास करूनही गुण मिळणार नाही, अशी भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. याबाबत शिक्षक महासंघाने २६ मार्च रोजीच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय सचिवांना पत्र देऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याची विनंती केली होती. त्याची दखल घेत मंडळाने मुख्य समीक्षकांच्या सभेत याबाबत चर्चा केली. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आलेखाबाबतचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांना योग्य गुणदान करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. 

सर्वांनाच मिळणार पूर्ण गुण

आलेखावरील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य गुणदान करण्यात येईल, असे पत्र बोर्डाच्या विभागीय सचिवांनी शिक्षक महासंघाला पाठविले होते. मात्र आपण पुन्हा विभागीय सचिवांमार्फत पुण्यातील सचिवांना विनंती केली. तेव्हा, आलेखावरील प्रश्नासाठी सर्वच विद्यार्थ्यांना पूर्ण गुण दिले जाणार असल्याचे बोर्डाने कळविल्याचे शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षाYavatmalयवतमाळ