शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

ज्यांनी 'तो' प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला, त्यांना योग्य गुण देणार, बोर्डाचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 14:02 IST

दहावीच्या परीक्षेत भूगोलाचा पेपर सोडविताना हजारो विद्यार्थ्यांना आलेखच मिळाला नाही. त्यामुळे आलेखावरील प्रश्नांचे गुण वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती.

ठळक मुद्देदहावीच्या परीक्षेत भूगोलाचा पेपर सोडविताना हजारो विद्यार्थ्यांना आलेखच मिळाला नाही. त्यामुळे आलेखावरील प्रश्नांचे गुण वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. ज्यांनी हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला, त्यांना योग्य गुणदान केले जाईल, अशी स्पष्टोक्ती बोर्डाच्या सचिवांनी दिली.मार्चमध्ये दहावीची परीक्षा पार पडली. त्यात २२ मार्च रोजी भूगोलाचा (सामाजिक शास्त्र -२) पेपर होता.

यवतमाळ - दहावीच्या परीक्षेत भूगोलाचा पेपर सोडविताना हजारो विद्यार्थ्यांना आलेखच मिळाला नाही. त्यामुळे आलेखावरील प्रश्नांचे गुण वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, ज्यांनी हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला, त्यांना योग्य गुणदान केले जाईल, अशी स्पष्टोक्ती बोर्डाच्या सचिवांनी दिली आहे.

मार्चमध्ये दहावीची परीक्षा पार पडली. त्यात २२ मार्च रोजी भूगोलाचा (सामाजिक शास्त्र -२) पेपर होता. त्यात आलेखावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. मात्र अमरावती विभागातील शेकडो परीक्षा केंद्रांवरील हजारो विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेसोबत हे आलेख मिळालेच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना हे प्रश्नही सोडविता आलेले नाही. आता अभ्यास करूनही गुण मिळणार नाही, अशी भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. याबाबत शिक्षक महासंघाने २६ मार्च रोजीच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय सचिवांना पत्र देऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याची विनंती केली होती. त्याची दखल घेत मंडळाने मुख्य समीक्षकांच्या सभेत याबाबत चर्चा केली. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आलेखाबाबतचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांना योग्य गुणदान करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. 

सर्वांनाच मिळणार पूर्ण गुण

आलेखावरील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य गुणदान करण्यात येईल, असे पत्र बोर्डाच्या विभागीय सचिवांनी शिक्षक महासंघाला पाठविले होते. मात्र आपण पुन्हा विभागीय सचिवांमार्फत पुण्यातील सचिवांना विनंती केली. तेव्हा, आलेखावरील प्रश्नासाठी सर्वच विद्यार्थ्यांना पूर्ण गुण दिले जाणार असल्याचे बोर्डाने कळविल्याचे शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षाYavatmalयवतमाळ