शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांनी 'तो' प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला, त्यांना योग्य गुण देणार, बोर्डाचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 14:02 IST

दहावीच्या परीक्षेत भूगोलाचा पेपर सोडविताना हजारो विद्यार्थ्यांना आलेखच मिळाला नाही. त्यामुळे आलेखावरील प्रश्नांचे गुण वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती.

ठळक मुद्देदहावीच्या परीक्षेत भूगोलाचा पेपर सोडविताना हजारो विद्यार्थ्यांना आलेखच मिळाला नाही. त्यामुळे आलेखावरील प्रश्नांचे गुण वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. ज्यांनी हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला, त्यांना योग्य गुणदान केले जाईल, अशी स्पष्टोक्ती बोर्डाच्या सचिवांनी दिली.मार्चमध्ये दहावीची परीक्षा पार पडली. त्यात २२ मार्च रोजी भूगोलाचा (सामाजिक शास्त्र -२) पेपर होता.

यवतमाळ - दहावीच्या परीक्षेत भूगोलाचा पेपर सोडविताना हजारो विद्यार्थ्यांना आलेखच मिळाला नाही. त्यामुळे आलेखावरील प्रश्नांचे गुण वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, ज्यांनी हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला, त्यांना योग्य गुणदान केले जाईल, अशी स्पष्टोक्ती बोर्डाच्या सचिवांनी दिली आहे.

मार्चमध्ये दहावीची परीक्षा पार पडली. त्यात २२ मार्च रोजी भूगोलाचा (सामाजिक शास्त्र -२) पेपर होता. त्यात आलेखावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. मात्र अमरावती विभागातील शेकडो परीक्षा केंद्रांवरील हजारो विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेसोबत हे आलेख मिळालेच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना हे प्रश्नही सोडविता आलेले नाही. आता अभ्यास करूनही गुण मिळणार नाही, अशी भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. याबाबत शिक्षक महासंघाने २६ मार्च रोजीच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय सचिवांना पत्र देऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याची विनंती केली होती. त्याची दखल घेत मंडळाने मुख्य समीक्षकांच्या सभेत याबाबत चर्चा केली. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आलेखाबाबतचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांना योग्य गुणदान करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. 

सर्वांनाच मिळणार पूर्ण गुण

आलेखावरील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य गुणदान करण्यात येईल, असे पत्र बोर्डाच्या विभागीय सचिवांनी शिक्षक महासंघाला पाठविले होते. मात्र आपण पुन्हा विभागीय सचिवांमार्फत पुण्यातील सचिवांना विनंती केली. तेव्हा, आलेखावरील प्रश्नासाठी सर्वच विद्यार्थ्यांना पूर्ण गुण दिले जाणार असल्याचे बोर्डाने कळविल्याचे शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षाYavatmalयवतमाळ