शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
6
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
7
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
8
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
9
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
10
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
11
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
12
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
13
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
14
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
15
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
16
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
17
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
18
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
19
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
20
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला

पावसाळ्यात चाहूल अन् अद्यापही नियोजन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:10 IST

‘तहान लागल्यावर विहीर खोदणे’ या म्हणीचा अनुभव व्याकूळ यवतमाळकर सध्या घेत आहेत. भीषण पाणीटंचाईची चाहूल पावसाळ्यातच लागली असताना कोणत्याच उपाययोजना झाल्या नाही.

ठळक मुद्देयवतमाळची पाणीटंचाई : सप्टेंबरनंतर निळोणात २४ आणि चापडोहत होते २० टक्के पाणी

ज्ञानेश्वर मुंदे ।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : ‘तहान लागल्यावर विहीर खोदणे’ या म्हणीचा अनुभव व्याकूळ यवतमाळकर सध्या घेत आहेत. भीषण पाणीटंचाईची चाहूल पावसाळ्यातच लागली असताना कोणत्याच उपाययोजना झाल्या नाही. आता संपूर्ण पाणी आटल्यानंतर विविध पर्याय पुढे आणले जात आहे. बेंबळाचे पाणी आणखी दूर असल्याने गोखीचा पर्याय पुढे आला. कोट्यवधींच्या नियोजनातून टंचाई ‘कॅश’ केली जात आहे. प्रशासनाच्या बैठकांमधून रोज नवे-नवे पर्याय पुढे येत असले तरी यवतमाळकर मात्र तहानलेलेच आहेत.यवतमाळ शहरात यंदा १९७१ पूर्वीच्या स्थितीची पुनरावृत्ती होत आहे. निळोणा धरण होण्यापूर्वी यवतमाळकरांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत होते. पाणी विकतही मिळत नव्हते, असे तो दुष्काळ अनुभवलेले वयोवृद्ध सांगतात. आता तशीच परिस्थिती पुन्हा यवतमाळात उद्भवली आहे. निसर्गाने सुरुवातीलाच पाणीटंचाईची चाहूल दिली होती. यवतमाळ तालुक्यात सरासरीच्या केवळ ४१.६५ टक्केच पाऊस झाला. संपूर्ण जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस यवतमाळात पडला. परिणामी यवतमाळला पाणीपुरवठा करणारे निळोणा आणि चापडोह प्रकल्प सप्टेंबर महिन्यापासूनच तहानलेले होते. निळोणा पावसाळ्यानंतर २४ टक्के आणि चापडोह प्रकल्पात केवळ २० टक्के जलसाठा होता. पाणी पुरणार नाही, यावर त्याचवेळी शिक्कामोर्तब झाले होते. परंतु याचा गांभीर्याने विचार ना जीवन प्राधिकरणाने केला ना प्रशासनाने. पाण्याचा अपव्यय सुरूच राहिला. परिणामी फेब्रुवारी महिन्यात जे व्हायचे तेच झाले. दोन्ही प्रकल्प तळाला लागले. मृत साठ्यावर तहान भागविण्याची वेळ आली.आॅगस्ट महिन्यातच पाणीटंचाईचे नियोजन सुरू केले असते तर आता नवनवीन पर्याय शोधण्याची गरज पडली नसती. बेंबळा प्रकल्पाचे पाणी यवतमाळकरांसाठी आरक्षित करण्यात आले होते. त्याच वेळी बेंबळा प्रकल्प ते जलशुद्धीकरण केंद्र अशी पाईपलाईन टाकली असतीतर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. मात्र सुरुवातीला पाणी आणण्याऐवजी यवतमाळ शहरातील गल्लीबोळात पाईपचे जाळे टाकण्यावर भर दिला. अख्खे यवतमाळ खोदून त्यात पाईप टाकले. मात्र या पाईपमध्ये येणारे बेंबळाचे पाणी मात्र कधी पोहोचणार हे कुणीच सांगत नाही. बेंबळा ते जलशुद्धीकरण केंद्राच्या पाईपलाईनचे काम केवळ २५ टक्केच झाले आहे. त्यामुळे आता या पाण्याची आशा प्रशासनाने सोडली. काहीही केले तरी पावसाळ्यापर्यंत पाणी येणार नाही, हे पालकमंत्र्यांच्या बैठकीतही स्पष्ट झाले. त्यामुळे दुसरा पर्याय पुढे आला. तो म्हणजे गोखी प्रकल्पाचा.दारव्हा तालुक्यातील या प्रकल्पावरून यवतमाळच्या एमआयडीसीला पाणीपुरवठा होतो. तेथून पाणी दर्डानगरच्या टाकीपर्यंत आणण्याचा प्रस्ताव आहे. जुनी पाईपलाईन भंगारात काढल्यानंतर आता नवीन पाईपलाईनसाठी सव्वा कोटी खर्चावे लागणार आहे. दररोज जलपातळी खालावत आहे. यवतमाळकर संयमाने पाणीटंचाईचा सामना करीत आहे. परंतु प्रशासनाच्या घिसडघाईने या संयमाचा बांधही फुटू शकतो.२० दिवसानंतर येणाऱ्या नळाच्या पाण्याचा अपव्यय सुरूचयवतमाळ शहरात प्रचंड खोदकाम झाल्याने जलवाहिनी ठिकठिकाणी फुटली आहे. १५ ते २० दिवसानंतर येणाऱ्या नळाचे बहुतांश पाणी वाहून जाते. शहराच्या विविध भागात पाण्याचे असे लोट वाहताना दिसतात. पाणीटंचाईच्या उपाययोजनेत वाहून जाणाऱ्या पाण्याचे कोणतेच नियोजन दिसत नाही. शहरातील गळती लागलेले पाईप दुरुस्त केले तर मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते. तर दुसरीकडे काही मंडळी थेंबन् थेंब वाचवत पाणी बचतीसाठी धडपडताना दिसतात.