शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

१५ दिवसांत कोरोनाचा नवा एकही रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST

११ मार्च रोजी कोरोना बाधित व्यक्तींचा डाटा शासकीय यंत्रणेपुढे आला. नऊ बाधित व्यक्तींचे नमुने नागपूर प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. यातील तीन व्यक्ती पॉझिटीव्ह निघाले. यानंतर १५ दिवसाचा अवधी लोटला. नव्याने कुणीही पॉझिटीव्ही रुग्ण सापडला नाही. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा कोरोना बाधितांना रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करीत आहेत.

ठळक मुद्दे५३ नागरिक होम क्वारंटाईनमधून बाहेर : संशयितांच्या संख्येत घट, आकडा आता १०१ वर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. यवतमाळ जिल्ह्यातही कोरोनाचे तीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. यानंतर १५ दिवसाचा कालावधी लोटला नव्याने एकही रुग्ण आढळला नाही. जिल्ह्याच्या दृष्टीने ही जमेची बाजू आहे. असे असले तरी धोका मात्र टळलेला नाही. खबरदारी म्हणून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.११ मार्च रोजी कोरोना बाधित व्यक्तींचा डाटा शासकीय यंत्रणेपुढे आला. नऊ बाधित व्यक्तींचे नमुने नागपूर प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. यातील तीन व्यक्ती पॉझिटीव्ह निघाले. यानंतर १५ दिवसाचा अवधी लोटला. नव्याने कुणीही पॉझिटीव्ही रुग्ण सापडला नाही.जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा कोरोना बाधितांना रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करीत आहेत. यासाठी ५३ विविध उपाययोजनांचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले. यातून १५८ लोक होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांच्यावर १४ दिवस पाळत ठेवण्यात आली. कुठलीही लक्षणे त्यांच्यामध्ये दिसली नाही. यामुळे ५३ व्यक्तींना क्वारंटाईन परिघाबाहेर काढण्यात आले. याशिवाय ज्या व्यक्तींचा निगेटीव्ह अहवाल आला होता, अशा व्यक्तींना आयसोलेशन वार्डातून बाहेर काढण्यात आले. त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. जिल्ह्यातील या सर्व व्यक्तींची प्रकृती उत्तम आहे. यामुळे क्वारंटाईन रुग्णांची संख्या १५८ वरुन १०१ वर आली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार ही जमेची बाजू आहे. पॉझिटीव्ह रुग्ण जिल्ह्यात नव्याने दिसले नाही.आता जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाच्या यंत्रणेने पुणे आणि मुंबई येथून जिल्ह्यात दाखल झालेल्या व्यक्तींकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यात परतणाऱ्या व्यक्तींचा आकडा दहा हजारांवर असण्याचा अंदाज आहे. यातील तीन हजार व्यक्ती आरोग्य विभागापुढे आले आहे. त्यांच्यावर १४ दिवस लक्ष ठेवले जाणार आहे. कोरोना विषाणूची बाधा रोखण्यासाठी शर्तीचे सर्व प्रयत्न करण्यात येत आहे. त्यात प्रशासनाला सध्या यशही आले आहे. मात्र धोका अजून टळलेला नाही.जिल्हा पहिल्याच स्टेजमध्ये असल्याचा निर्वाळा जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दिला होता. ही स्थिती अशीच कायम राखण्यासाठी यवतमाळकरांकडून नियमांचे पालन होण्याची अपेक्षा आरोग्य विभागाकडून व्यक्त केली जात आहे.मदतीसाठी पालकमंत्र्यांची हेल्पलाईनकोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने मंगळवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आहे. यामुळे गावाकडे निघालेले अनेक कामगार, प्रवासी अडकून पडले आहे. जिल्ह््याबाहेर अडकलेल्या अशा प्रवाशांना आता परत आणणे शक्य नाही ते आहे तिथेच मदत मिळावी या अनुषंगाने पालकमंत्री संजय राठोड यांनी समन्वयाकरिता हेल्पलाईन सुरू करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहे. मुंबई, पुणे, गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश आदी राज्यात रोजमजुरीकरिता गेलेले कामगार, शिक्षणाकरिता गेलेले विद्यार्थी, नोकरदार अडकून पडलेले आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस