शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
4
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
5
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
6
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
7
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
8
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
9
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
10
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
11
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
12
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
13
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
14
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
15
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
16
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
17
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
18
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
19
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
20
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

रोजगार योजनेत ‘हमी’च मिळेना

By admin | Updated: March 1, 2016 02:02 IST

महाराष्ट्र शासनाने काम नसलेल्या हातांना कामाची हमी देण्याच्या उद्देशाने मोठा गाजावाजा करीत रोजगार हमी योजना सुरू केली.

मजुरांना काम नाही : पुसद तालुक्यात कागदोपत्री वाटचालपुसद : महाराष्ट्र शासनाने काम नसलेल्या हातांना कामाची हमी देण्याच्या उद्देशाने मोठा गाजावाजा करीत रोजगार हमी योजना सुरू केली. जॉबकार्ड काढून वर्ष लोटले तरीही रोजगार नाही. या योजनेंतर्गत करण्यात येणारी धरणे, चर, सिंचन कालवे, बांध, शेततळी, खोद विहिरी यासारखी कामे ठप्प आहेत. त्यामुळे गावाचा विकास खुंटला आहे. पंचायतराज संस्था बळकट करणे हा योजनेचा मूलभूत उद्देश असला तरी त्याला आता तडे जाताना दिसत आहे.रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून बेरोजगारांना १५० दिवसांचा रोजगार मिळवून देण्याची हमी देण्याच्या उद्देशाने गावोगावच्या ग्रामपंचायतीद्वारे गावाच्या विकासासाठी ही योजना राबविण्याची शासनाची केवळ वल्गनाच ठरत आहे. या योजनेसंदर्भात कोणत्याही शासकीय कार्यालयाकडे कामाची ठोस रूपरेषाच नाही. गावाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीद्वारे कागदोपत्री योजना चालू असल्याचे सांगितले जात आहे. परंतु ही योजना तळागळापर्यंत पोहोचलीच नाही. रोजगाराची हमी देणाऱ्या या योजनेचे जॉबकार्ड काढूनदेखील बरेच मजूर बेरोजगार असल्याची सद्यपरिस्थिती आहे. या योजनेचा मुख्य हेतूने जरी रोजगारनिर्मिती असली तरी गावाच्या विकासासाठी कामगारांची उपलब्धता केल्यास या योजनेतून कोट्यवधी रुपयांची कामे करता येवू शकतात. परंतु काही ठिकाणी शासनाची उदासिनता, चालढकलपणा यामुळे या योजनेचे अक्षरश: तीनतेरा वाजले आहेत. या योजनेनुसार कामाची रूपरेषा ६०-४० या प्रमाणात असून ३० टक्के अकुशल म्हणजे मजूर व ४० टक्के कुशल म्हणजे यांत्रिकीकरणाचा वापर करणे अशी पद्धतीची आहे. मात्र गावातील सिमेंट रस्ते, पेव्हिंग ब्लॉक, अंतर्गत गटार बांधणी यासाठी कामाची रूपरेषा ८०-२० या प्रमाणात आहे. यामध्ये ८० टक्के यांत्रिकीकरणास मुभा आहे. या योजनेतून पांदण रस्ते करता येतात. मात्र पांदण रस्त्यांचे अंदाजपत्रक तयार करणे, तांत्रिक मान्यता देणे, प्रशासकीय मान्यता देणे व कामाचा आदेश देणे आदी शासकीय यंत्रणेवर अवलंबून असणाऱ्या बाबी शासकीय अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे रखडतात. (तालुका प्रतिनिधी)दुष्काळी परिस्थितीतही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष योजना राबवत असताना चौकशीचा ससेमिरा मागे लागून नोकरीवर गदा येईल, अशी मानसिकता येथील शासकीय अधिकाऱ्यांची बनली आहे. या योजनेतून हातात काम मिळत नसल्याने शेतमजुरांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. मजुरांच्या हाताला काम नाही, त्यात दुष्काळी परिस्थिती. मजूर कामासाठी बनवत भटकत फिरत आहेत, तर महाराष्ट्र रोजगार हमी योजनेची चालू असलेली कामे लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न प्रशासन करीत असल्याचे चित्र दिसत आहे.