शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

जिल्हा बँक संचालकांमध्ये पडले दोन गट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST

उच्च न्यायालयाने बँकेतील १०५ जागांची भरतीप्रक्रिया पूर्ण करण्याचे आणि आरक्षणातील ४२ जागांची नव्याने प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत. आचारसंहिता काळात ही भरती घ्यावी का याबाबत संचालक प्राधिकरणाला तर प्राधिकरण न्यायालयाला मार्गदर्शन मागणार आहे. दरम्यान न्यायालयातून भरतीसाठी ग्रीन सिग्नल मिळताच उमेदवार व त्यांचे पालक सक्रिय झाले आहेत.

ठळक मुद्देनोकरभरतीचा वाद, कुणी भरतीच्या बाजूने तर कुणी विरोधात, चौकशी झाल्यास फौजदारीची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील लिपिक व शिपायाच्या जागांच्या भरतीवरून बँकेच्या संचालकांमध्येच आता दोन गट पडले आहेत. त्यातही बहुतेकांना भरतीची चौकशी झाल्यास फौजदारी कारवाईचा ससेमिरा मागे लागण्याची हूरहूर आहे.उच्च न्यायालयाने बँकेतील १०५ जागांची भरतीप्रक्रिया पूर्ण करण्याचे आणि आरक्षणातील ४२ जागांची नव्याने प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत. आचारसंहिता काळात ही भरती घ्यावी का याबाबत संचालक प्राधिकरणाला तर प्राधिकरण न्यायालयाला मार्गदर्शन मागणार आहे. दरम्यान न्यायालयातून भरतीसाठी ग्रीन सिग्नल मिळताच उमेदवार व त्यांचे पालक सक्रिय झाले आहेत. कुणी परताव्यासाठी तर कुणी आपला दावा आणखी भक्कम करण्यासाठी संचालकांकडे येरझारा मारणे सुरू केले आहे. संचालकही त्यांना आणखी काही दिवस परतावा मागू नये, शांत रहावे म्हणून वेगवेगळे चॉकलेट देताना दिसत आहे.इकडे संचालकांमध्ये भरतीवरून वेगवेगळे मतप्रवाह आहेत. निवडून येण्याची हमखास गॅरंटी असलेले संचालक ही भरती निवडणुकीनंतर नव्या संचालक मंडळाच्या कार्यकाळात व्हावी अशा मानसिकतेत आहे. तर उमेदवार नसलेले आणि रिंगणात असूनही निवडून येण्याची हमी नसलेले संचालक कोणत्याही परिस्थितीत आत्ताच ही भरती व्हावी या दृष्टीने प्रयत्नरत दिसत आहेत.या नोकरभरतीवर निवड समितीची (स्टाफ कमिटी) भूमिका महत्वाची ठरली. मात्र कुण्या उमेदवाराला किती गुण याचा कागद त्यांच्यापुढे आलाच नाही, केवळ त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या गेल्या. एवढेच नव्हे तर संचालक मंडळाच्या बैठकीपुढेही कुणाला किती गुण हा विषय आतापर्यंत आला नाही. कुण्या उमेदवाराला किती गुण टाकले जाणार हे स्पष्ट नाही. स्वाक्षऱ्या तर केल्या आहेत. ही भरती सहजासहजी होईल, अशी चिन्हे नाहीत. अनेकांनी उच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. त्यातही पुसद विभागातून अधिक जोर दिसतो आहे. त्यामुळे भविष्यात या भरतीची सखोल चौकशी झाल्यास संपूर्ण पोलखोल होणार आहे. वेळप्रसंगी फौजदारी कारवाईलाही संचालकांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे काही मिळाले नाही तरी चालेल, मात्र पोलीस ठाणे आणि कोर्ट-कचेरीच्या भानगडी नको अशी अनेक संचालकांची मानसिकता आहे. एकूणच नोकरभरतीचा हा विषय गुंतागुंतीचा ठरला आहे.अमरावतीच्या महाराष्ट्र इन्स्टिट्युटचे गॉडफादर कोण?अमरावतीमधील सचिन वानखडे यांच्या ‘महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ हार्डवेअर अ‍ॅन्ड सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा.लि.’ या कंपनीला जिल्हा बँक नोकरभरतीचे हे कंत्राट मिळाले आहे. ही एजंसी तत्कालीन सरकारमध्ये स्थानिक नेतृत्वाच्या संमतीने मुंबईतूनच सहकार विभागाने निश्चित केली होती. त्यामुळे एजंसीचे राजकीय ‘लागेबांधे’ उघड होते. त्यामुळेच की काय या एजंसीची संपूर्ण कार्यपद्धती संशयाच्या भोवऱ्यात आहे. सोईने गुणांकन करणे, खोडतोड करणे असे प्रकार या एजंसीकडून होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :bankबँक