शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

खाईत दडलेल्या उकंडा पोडमध्ये शिक्षणाचा डोंगराएवढा प्रश्न; १६ विद्यार्थ्यांनी जायचे कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2022 21:50 IST

प्रशासनाने २० पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली चालविल्या आहेत. त्यात जिल्ह्यातील ३५० शाळांचा समावेश असून उकंडा पोडची शाळाही त्यात आहे. तब्बल दोन किलोमीटर किर्र जंगलातून जाणारा घाट उतरल्यावरच या गावाचे दर्शन होते. चारही बाजूंनी उंच डोंगर असलेल्या या गावात झोपडीवजा घरे याशिवाय दुसऱ्या सुविधा नाहीत. अवघी ३०० लोकसंख्या आहे. पहिली ते पाचव्या वर्गात जाणारी १६ मुले-मुली आहेत.

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : या गावाचे नाव उकंडा पोड... उकंडा म्हणजे केरकचरा साठविण्याची गावाबाहेरची जागा. नावाप्रमाणेच व्यवस्थेने या गावाचाही कचरा करून टाकलेला आहे. यवतमाळ शहराच्या काठावर असूनही एका जंगली खाईत वसलेल्या या दुर्लक्षित गावात विकासाची गंगा पोहाेचवू शकणारी चिटुकली शाळा आहे. पण गावच छोटे असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांची संख्याही छोटीच आहे. अन् या छोट्या संख्येचे निमित्त करून प्रशासनाने मोठे संकट आणले आहे. ते संकट आहे शाळा बंदीचे. कमी पटाच्या नावाखाली ही शाळा बंद झाली तर येथील १६ गरीब विद्यार्थ्यांचा सामना जंगलातल्या खऱ्या हिंस्र प्राण्याशी होणार आहे. कारण त्यांचे समायोजन झाले तर दोन किलोमीटरचा जंगल व्याप्त डोंगर ओलांडण्याशिवाय गत्यंतर नाही. प्रशासनाने २० पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली चालविल्या आहेत. त्यात जिल्ह्यातील ३५० शाळांचा समावेश असून उकंडा पोडची शाळाही त्यात आहे. तब्बल दोन किलोमीटर किर्र जंगलातून जाणारा घाट उतरल्यावरच या गावाचे दर्शन होते. चारही बाजूंनी उंच डोंगर असलेल्या या गावात झोपडीवजा घरे याशिवाय दुसऱ्या सुविधा नाहीत. अवघी ३०० लोकसंख्या आहे. पहिली ते पाचव्या वर्गात जाणारी १६ मुले-मुली आहेत. पूर्वी मोहा गट ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेले उकंडा पोड आता मोहासोबतच यवतमाळ नगरपालिकेत विलीन झाले आहे पण यवतमाळ शहरातील ८० टक्के नागरिकांना उकंडा पोड नावाचे गाव आपल्या शेजारी असल्याची खबरबात नाही. या गावात उतरल्यावर बाहेरच्या दुनियेपासून पूर्णत: संपर्क तुटतो. गावात केवळ २०-२५ जणांकडे थोडीबहुत शेती आहे. त्यातील अर्धी शेती डोंगरात असल्याने पडित आहे. आता येथील शाळा कमी पटामुळे बंद (किंवा प्रशासनाच्या भाषेत समायोजित) केल्यास येथील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना परगावात जाताना प्रचंड यातना भोगाव्या लागणार आहेत. 

विद्यार्थ्यांचा निरासग प्रश्न- इशानी रवी देवकर (पहिला वर्ग), मोरेश्वर केशव शिवणकर (पाचवा वर्ग), शिवा गजानन कुमरे (दुसरा वर्ग) साहील सुरेश डेबूर (दुसरा वर्ग), अंजना श्रीराम मादापुरे (पहिला वर्ग), विराट रवी देवकर (पाचवा वर्ग) हे उकंडा पोडचे विद्यार्थी मंगळवारी शाळेला सुटी असल्याने गावात खेळताना आढळले. त्यांना दुसऱ्या गावात शाळा गेली तर तुम्ही जाल का, असे विचारताच त्यांचे निरागस उत्तर नवा प्रश्न घेऊन आले... कितीक दूर अशीन थे शाळा? 

आमच्या गावात शाळा सुरू राहणे अत्यंत आवश्यक आहे. शाळा बंद झाली तर दुसरी शाळाच नाही अन् यवतमाळच्या किंवा मोहाच्या शाळेत पाठविण्याची पालकांची परिस्थिती नाही.- बजरंग घोटेकर, गावकरी

गावाच्या चारही बाजूने असलेल्या जंगलात बिबटे, वाघ, हरिण, रानडुक्कर, रोही आहेत. अशा मार्गाने दररोज मुले दुसऱ्या गावातील शाळेत कसे जाणार? - राजू बोरकर, गावकरी

शासनाने या गावातील परिस्थितीचा विचार करावा. ही शाळा बंद झाली तर आमचे विद्यार्थी दुसऱ्या गावात जाणे अशक्य आहे. शाळेत जाता-येताना मलाच तर बिबट्या, रोही दर्शन देत असतात. मग मुलांच्या सुरक्षेचे काय? - अविनाश बनसोड, मुख्याध्यापक, उकंडा पोड

 

टॅग्स :Schoolशाळा