शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

खाईत दडलेल्या उकंडा पोडमध्ये शिक्षणाचा डोंगराएवढा प्रश्न; १६ विद्यार्थ्यांनी जायचे कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2022 21:50 IST

प्रशासनाने २० पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली चालविल्या आहेत. त्यात जिल्ह्यातील ३५० शाळांचा समावेश असून उकंडा पोडची शाळाही त्यात आहे. तब्बल दोन किलोमीटर किर्र जंगलातून जाणारा घाट उतरल्यावरच या गावाचे दर्शन होते. चारही बाजूंनी उंच डोंगर असलेल्या या गावात झोपडीवजा घरे याशिवाय दुसऱ्या सुविधा नाहीत. अवघी ३०० लोकसंख्या आहे. पहिली ते पाचव्या वर्गात जाणारी १६ मुले-मुली आहेत.

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : या गावाचे नाव उकंडा पोड... उकंडा म्हणजे केरकचरा साठविण्याची गावाबाहेरची जागा. नावाप्रमाणेच व्यवस्थेने या गावाचाही कचरा करून टाकलेला आहे. यवतमाळ शहराच्या काठावर असूनही एका जंगली खाईत वसलेल्या या दुर्लक्षित गावात विकासाची गंगा पोहाेचवू शकणारी चिटुकली शाळा आहे. पण गावच छोटे असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांची संख्याही छोटीच आहे. अन् या छोट्या संख्येचे निमित्त करून प्रशासनाने मोठे संकट आणले आहे. ते संकट आहे शाळा बंदीचे. कमी पटाच्या नावाखाली ही शाळा बंद झाली तर येथील १६ गरीब विद्यार्थ्यांचा सामना जंगलातल्या खऱ्या हिंस्र प्राण्याशी होणार आहे. कारण त्यांचे समायोजन झाले तर दोन किलोमीटरचा जंगल व्याप्त डोंगर ओलांडण्याशिवाय गत्यंतर नाही. प्रशासनाने २० पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली चालविल्या आहेत. त्यात जिल्ह्यातील ३५० शाळांचा समावेश असून उकंडा पोडची शाळाही त्यात आहे. तब्बल दोन किलोमीटर किर्र जंगलातून जाणारा घाट उतरल्यावरच या गावाचे दर्शन होते. चारही बाजूंनी उंच डोंगर असलेल्या या गावात झोपडीवजा घरे याशिवाय दुसऱ्या सुविधा नाहीत. अवघी ३०० लोकसंख्या आहे. पहिली ते पाचव्या वर्गात जाणारी १६ मुले-मुली आहेत. पूर्वी मोहा गट ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेले उकंडा पोड आता मोहासोबतच यवतमाळ नगरपालिकेत विलीन झाले आहे पण यवतमाळ शहरातील ८० टक्के नागरिकांना उकंडा पोड नावाचे गाव आपल्या शेजारी असल्याची खबरबात नाही. या गावात उतरल्यावर बाहेरच्या दुनियेपासून पूर्णत: संपर्क तुटतो. गावात केवळ २०-२५ जणांकडे थोडीबहुत शेती आहे. त्यातील अर्धी शेती डोंगरात असल्याने पडित आहे. आता येथील शाळा कमी पटामुळे बंद (किंवा प्रशासनाच्या भाषेत समायोजित) केल्यास येथील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना परगावात जाताना प्रचंड यातना भोगाव्या लागणार आहेत. 

विद्यार्थ्यांचा निरासग प्रश्न- इशानी रवी देवकर (पहिला वर्ग), मोरेश्वर केशव शिवणकर (पाचवा वर्ग), शिवा गजानन कुमरे (दुसरा वर्ग) साहील सुरेश डेबूर (दुसरा वर्ग), अंजना श्रीराम मादापुरे (पहिला वर्ग), विराट रवी देवकर (पाचवा वर्ग) हे उकंडा पोडचे विद्यार्थी मंगळवारी शाळेला सुटी असल्याने गावात खेळताना आढळले. त्यांना दुसऱ्या गावात शाळा गेली तर तुम्ही जाल का, असे विचारताच त्यांचे निरागस उत्तर नवा प्रश्न घेऊन आले... कितीक दूर अशीन थे शाळा? 

आमच्या गावात शाळा सुरू राहणे अत्यंत आवश्यक आहे. शाळा बंद झाली तर दुसरी शाळाच नाही अन् यवतमाळच्या किंवा मोहाच्या शाळेत पाठविण्याची पालकांची परिस्थिती नाही.- बजरंग घोटेकर, गावकरी

गावाच्या चारही बाजूने असलेल्या जंगलात बिबटे, वाघ, हरिण, रानडुक्कर, रोही आहेत. अशा मार्गाने दररोज मुले दुसऱ्या गावातील शाळेत कसे जाणार? - राजू बोरकर, गावकरी

शासनाने या गावातील परिस्थितीचा विचार करावा. ही शाळा बंद झाली तर आमचे विद्यार्थी दुसऱ्या गावात जाणे अशक्य आहे. शाळेत जाता-येताना मलाच तर बिबट्या, रोही दर्शन देत असतात. मग मुलांच्या सुरक्षेचे काय? - अविनाश बनसोड, मुख्याध्यापक, उकंडा पोड

 

टॅग्स :Schoolशाळा