शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

अखेर आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात आली 'स्वयम' अनुदानाची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 11:24 IST

पांढरकवड्यात ५७० विद्यार्थ्यांचे अर्ज आले असून त्यातील ५०८ अर्जांना प्रकल्प अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली, तर सध्या केवळ ४९७ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे टाकण्यात आले. फोटो : 22ytph01 (कॅप्शन : ‘लोकमत’ने १८ फेब्रुवारी रोजी प्रकाशित केलेले वृत्त)

ठळक मुद्दे‘स्वयम’ गाजले सभागृहात ‘लोकमत’च्या वृत्तानंतर डीबीटीला वेग

अविनाश साबापुरे

यवतमाळ : शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांकरिता शासनाने ‘स्वयम’ योजनेतून १२ कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, २०२०-२१ हे शैक्षणिक सत्र संपल्यानंतरही एकाही विद्यार्थ्याला पैसे दिले गेले नाहीत. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी हा प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करताच विद्यार्थ्यांच्या खात्यात रकमा जमा करण्यात आल्या.

बारावीनंतरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाने पंडित दीनदयाळ स्वयम योजना सुरू केली आहे. वसतिगृहात राहू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेतून निवास, भोजन व शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी थेट पैसे दिले जातात. २०२०-२१ या सत्रासाठी निधी मंजूर झाल्यानंतरही २०२२ च्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत एकाही विद्यार्थ्याच्या बँक खात्यात पैसे टाकण्यात आले नाहीत. अखेर या संदर्भात ‘लोकमत’ने १८ फेब्रुवारी रोजी ‘शैक्षणिक सत्र संपूनही स्वयम योजनेचे पैसे मिळेना’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर ट्रायबल फोरम तसेच ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनने याबाबत आयुक्त स्तरापर्यंत पाठपुरावा सुरू केला.

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी स्वयम योजनेसाठी २०२०-२१ या सत्रात १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आदिवासी विकास आयुक्तांना वितरित केल्याची माहिती दिली. संबंधित प्रकल्प कार्यालयाकडे आलेल्या अर्जानुसार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात रकमा जमा करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली.

पांढरकवडातील ४९७ विद्यार्थ्यांना पैसे मिळाले

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत जवळपास ९०० विद्यार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित असल्याची बाब ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणली होती. या संदर्भात ना. के. सी. पावडी यांनी सांगितले की, पांढरकवड्यात ५७० विद्यार्थ्यांचे अर्ज आले असून त्यातील ५०८ अर्जांना प्रकल्प अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली, तर सध्या केवळ ४९७ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे टाकण्यात आले.

कोविडमुळे कापल्या रकमा

जिल्हास्तरावर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वयम याेजनेतून वार्षिक ४३ हजार रुपये दिले जातात. मात्र, सध्या काही विद्यार्थ्यांना केवळ १२ हजार रुपये तर कुणाला केवळ नऊ हजार रुपये देण्यात आले. २०२०-२१ या सत्रात कोविडमुळे शासकीय वसतिगृहे अनेक दिवस बंद होती. जेवढे दिवस वसतिगृहे सुरू असतील तेवढ्याच कालावधीकरिता स्वयम योजनेचा लाभ देण्याचे निर्देश वित्त विभागाने दिले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या रकमांमध्ये कपात झाल्याची माहितीही पाडवी यांनी दिली.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीScholarshipशिष्यवृत्ती