शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

झोपेत असलेल्या पत्नीचा गळा आवळून पतीनेच केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2022 05:00 IST

श्रीकांतने स्वत:च्या पत्नीचा गळा आवळून खून केला. नंतर ती मृत झाली की नाही याची खात्री करण्यासाठी उशीने तोंड दाबले, त्यानंतर घरातच शेळ्या बांधण्यासाठी ठेवलेल्या दोराने तिचा गळा आवळला. पत्नी मरण पावल्याची पूर्ण खात्री झाल्यावर श्रीकांत स्वत:हूनच शहर पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून खात्री केली व श्रीकांतला ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एक मुलगा, एक मुलगी, याचा भाजीचा व्यवसाय, ती सौदर्य प्रसाधनाच्या दुकानात नोकर असा सुखी संसार सुरू असतानाच त्याच्या डोक्यात संशयाचे भूत शिरले. गुरुवारी पहाटे त्याने स्वत:च्या पत्नीचाच झोपेत गळा आवळून खून केला. पत्नी ठार झाल्याची खात्री केल्यानंतर तो थेट यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात पोहोचला. ही थरारक घटना माळीपुरा परिसरात घडली. उर्मिला श्रीकांत श्रीरामे (३०) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा खून श्रीकांत उर्फ नागो तुकाराम श्रीरामे (३८) यानेच गळा आवळून केला. उर्मिला व श्रीकांतला पाच वर्षाची तनश्री व तीन वर्षाचा वंश अशी दोन मुले आहे. त्यांची दोन्ही मुले आत्याकडे नागपूर येथे शिकायला आहे. घरी उर्मिला व श्रीकांत हे दोघे व श्रीकांतचे वडील तुकाराम राहत होते. घरात कष्टाने आलेल्या पैशांतून आलबेल होते. मात्र का कुणास ठाकून श्रीकांत उर्मिलावर संशय घेऊ लागला. उर्मिलाचे माहेर बाभूळगाव तालुक्यातील. ती पतीसह २० मे रोजी लग्नाला जाऊन आली. तेव्हापासूनच श्रीकांतचा जाच वाढला. श्रीकांतने स्वत:च्या पत्नीचा गळा आवळून खून केला. नंतर ती मृत झाली की नाही याची खात्री करण्यासाठी उशीने तोंड दाबले, त्यानंतर घरातच शेळ्या बांधण्यासाठी ठेवलेल्या दोराने तिचा गळा आवळला. पत्नी मरण पावल्याची पूर्ण खात्री झाल्यावर श्रीकांत स्वत:हूनच शहर पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून खात्री केली व श्रीकांतला ताब्यात घेतले. या प्रकरणी उर्मिलाचा भाऊ होमराज नारनवरे रा. बाभूळगाव याच्या तक्रारीवरून श्रीकांतविरुद्ध कलम ३०२ भादंविनुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

कौटुंबिक वादातून दुसरा खून - माळीपुरा परिसरात एकाच महिन्यात कौटुंबिक वादातून खुनाच्या दोन घटना झाल्या आहे. यापूर्वी मद्यपी मोठ्या भावाने स्वत:च्या आईवर हात उगारला हे पाहून लहान भावाला संताप अनावर झाला. त्याने चाकूने भोसकून भावाचा खून केला.  त्या पाठोपाठ नवभारत चौकात संशयातून पतीने पत्नीचा गळा आवळला, अशा दोन घटना येथे झाल्या आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी