शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
6
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
7
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
8
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
9
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
10
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
11
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
12
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
13
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
14
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
15
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
16
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
17
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
18
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
19
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
20
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल

दोन वर्षांत तब्बल १४ हजारवेळा पेटले जंगल; कोटींची वनसंपदा खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2022 07:00 IST

Yawatmal News वनविभागाची जंगल सुरक्षेच्यादृष्टीने होणारी चालढकल, काही लोकांचा बेजबाबदारपणा यामुळे दोन वर्षांत १३ हजार ८४६ वेळा आगीच्या घटना घडल्या.

ठळक मुद्दे११ वनवृत्त, तीन वन्यजीवक्षेत्र

विलास गावंडे

यवतमाळ : वनविभागाची जंगल सुरक्षेच्यादृष्टीने होणारी चालढकल, काही लोकांचा बेजबाबदारपणा यामुळे दोन वर्षांत १३ हजार ८४६ वेळा आगीच्या घटना घडल्या. जंगल पेटल्याने एक कोटी रुपयांपेक्षा अधिक वनसंपदेची राखरांगोळी झाली. ११ वनवृत्त आणि तीन वन्यजीव क्षेत्रात हे प्रकार घडले आहे. सर्वाधिक ४६८९ वेळा गडचिरोली वनवृत्तामध्ये जंगलाला आग लागली आहे.

वनातील गवत न काढणे, फायर लाईन काढण्याकडे दुर्लक्ष, यासोबतच लागलेला वनवा आगीच्या घटनांसाठी कारणीभूत ठरला आहे. जंगलालगतच्या शेतात पेटविलेला काडीकचरा, वनक्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी पेटविलेल्या काड्यांनीही जंगल खाक झाले आहे. दरवर्षी अशा प्रकारच्या घटना घडत असतानाही प्रभावी उपाययोजना वनविभागाकडून होताना दिसत नाही.

माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी आगीच्या घटनांसंदर्भात माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेली माहिती ‘लोकमत’ला उपलब्ध करून दिली आहे. यातून आगीच्या घटनांचे वास्तव पुढे आले आहे. विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ वनवृत्ताशिवाय औरंगाबाद, धुळे, कोल्हापूर, नाशिक, पुणे, ठाणे, तसेच नागपूर, नाशिक आणि मुंबई वन्यजीव क्षेत्राला या आगीची झळ पोहोचली आहे. विदर्भातील गडचिरोलीनंतर आधीच्या सर्वाधिक घटनांत ठाणे वनवृत्तात १७९३ इतक्या घडल्या आहेत.

२०१९ या वर्षात सात हजार ६१८ घटना घडल्या असून ६६ लाख १९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. २०२० मध्ये ६२२८ घटनांमुळे वनविभागाला ४२ लाख १८ हजार रुपयांपेक्षा अधिक नुकसानीची झळ पोहोचली आहे.

टॅग्स :forestजंगलfireआग