शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

दोन वर्षांत तब्बल १४ हजारवेळा पेटले जंगल; कोटींची वनसंपदा खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2022 07:00 IST

Yawatmal News वनविभागाची जंगल सुरक्षेच्यादृष्टीने होणारी चालढकल, काही लोकांचा बेजबाबदारपणा यामुळे दोन वर्षांत १३ हजार ८४६ वेळा आगीच्या घटना घडल्या.

ठळक मुद्दे११ वनवृत्त, तीन वन्यजीवक्षेत्र

विलास गावंडे

यवतमाळ : वनविभागाची जंगल सुरक्षेच्यादृष्टीने होणारी चालढकल, काही लोकांचा बेजबाबदारपणा यामुळे दोन वर्षांत १३ हजार ८४६ वेळा आगीच्या घटना घडल्या. जंगल पेटल्याने एक कोटी रुपयांपेक्षा अधिक वनसंपदेची राखरांगोळी झाली. ११ वनवृत्त आणि तीन वन्यजीव क्षेत्रात हे प्रकार घडले आहे. सर्वाधिक ४६८९ वेळा गडचिरोली वनवृत्तामध्ये जंगलाला आग लागली आहे.

वनातील गवत न काढणे, फायर लाईन काढण्याकडे दुर्लक्ष, यासोबतच लागलेला वनवा आगीच्या घटनांसाठी कारणीभूत ठरला आहे. जंगलालगतच्या शेतात पेटविलेला काडीकचरा, वनक्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी पेटविलेल्या काड्यांनीही जंगल खाक झाले आहे. दरवर्षी अशा प्रकारच्या घटना घडत असतानाही प्रभावी उपाययोजना वनविभागाकडून होताना दिसत नाही.

माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी आगीच्या घटनांसंदर्भात माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेली माहिती ‘लोकमत’ला उपलब्ध करून दिली आहे. यातून आगीच्या घटनांचे वास्तव पुढे आले आहे. विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ वनवृत्ताशिवाय औरंगाबाद, धुळे, कोल्हापूर, नाशिक, पुणे, ठाणे, तसेच नागपूर, नाशिक आणि मुंबई वन्यजीव क्षेत्राला या आगीची झळ पोहोचली आहे. विदर्भातील गडचिरोलीनंतर आधीच्या सर्वाधिक घटनांत ठाणे वनवृत्तात १७९३ इतक्या घडल्या आहेत.

२०१९ या वर्षात सात हजार ६१८ घटना घडल्या असून ६६ लाख १९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. २०२० मध्ये ६२२८ घटनांमुळे वनविभागाला ४२ लाख १८ हजार रुपयांपेक्षा अधिक नुकसानीची झळ पोहोचली आहे.

टॅग्स :forestजंगलfireआग