शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

पोलीस उपमहानिरीक्षकांपुढे मांडली कर्मचाऱ्यांनी कैफीयत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 05:00 IST

पाेलीस मुख्यालयातील प्रेरणा हाॅलमध्ये हे संमेलन पार पडले. संमेलनात पाेलीस मुख्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांचीच संख्या सर्वाधिक हाेती. परेड संपल्यानंतर हे कर्मचारी संमेलनात सहभागी झाले़. या सर्वांनी पाेलीस मुख्यालयात वापराच्या व पिण्याच्या शुद्ध पाण्याची समस्या गंभीर असल्याचे सांगितले. विकासकामासाठी येथील आरओ प्लांट हटविण्यात आला. त्यामुळे ही अडचण निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. पाण्याची समस्या निकाली काढण्याचे निर्देश मीना यांनी दिले. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात पाेलीस दलाचे वार्षिक निरीक्षण सुरू आहे. शुक्रवार या निवेदनाचा शेवटचा दिवस हाेता. त्यानिमित्त पाेलीस संमेलन घेण्यात आले. यावेळी पाेलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडीअडचणी थेट उपमहानिरीक्षक चंद्रकिशाेर मीना यांच्यापुढे मांडल्या. समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. पाेलीस मुख्यालयातील प्रेरणा हाॅलमध्ये हे संमेलन पार पडले. संमेलनात पाेलीस मुख्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांचीच संख्या सर्वाधिक हाेती. परेड संपल्यानंतर हे कर्मचारी संमेलनात सहभागी झाले़. या सर्वांनी पाेलीस मुख्यालयात वापराच्या व पिण्याच्या शुद्ध पाण्याची समस्या गंभीर असल्याचे सांगितले. विकासकामासाठी येथील आरओ प्लांट हटविण्यात आला. त्यामुळे ही अडचण निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. पाण्याची समस्या निकाली काढण्याचे निर्देश मीना यांनी दिले. उपचारावर झालेल्या खर्चाची देयके वेळेत निकाली काढली जात नाही. सहा ते १२ महिने वाट पाहावी लागते. अनेक महिन्यापासून उपचार खर्च मिळत नसल्याने अडचणी येतात, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावर महानिरीक्षकांनी संबंधितांकडून रखडलेल्या देयकांचा आढावा घेतला. ही देयके तातडीने प्रक्रिया पूर्ण करून निकाली काढण्यास सांगण्यात आले. जिल्हा पाेलीस दलात विनंती व प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. विनंती अर्ज करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. काैटुंबिक व इतर याेग्य कारण असूनसुद्धा दिलासा मिळत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. बदली प्रक्रियेत याेग्य कारणे ग्राह्य मानून दिलासा द्यावा, अशी मागणी उपमहानिरीक्षकांकडे केली. यावर याेग्य प्रस्तावाची पुनर्पडताळणी करून फेरबदलाचा निर्णय घेतला जाईल, असे उपमहानिरिक्षकांनी सांगितले. पाेलीस संमेलनात मुख्यालयातीलच कर्मचाऱ्यांची संख्या अधिक हाेती. त्यामुळे पाेलीस ठाणे स्तरावर काम करणाऱ्या अनेकांना सभागृहात बसता आले नाही. दाराबाहेर उभे राहून ते बाेलण्याची संधी मिळेल याची वाट पाहत हाेते. पाेलीस संमेलनापूर्वी उपमहानिरीक्षकांनी परेड निरीक्षण केले. शस्त्रागाराची, वाहन विभागाची पाहणी केली.  इतरही शाखांना भेट दिली. 

खुनाच्या घटना थांबवा : उपमहानिरीक्षकांचे निर्देश - जिल्ह्यात २०२० व २०२१ च्या दाेन वर्षाच्या तुलनेत खुनाच्या घटना अधिक वाढत आहेत. यावर अंकुश लावण्याचे निर्देश पाेलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशाेर मीना यांनी दिले. खून झाल्यानंतर आराेपींना अटक करण्यापेक्षा ताे हाेऊच नये याची दक्षता घेण्यास सांगितले. पाेलीस संमेलनानंतर  सर्व ठाणेदार, एसडीपीओ यांची आढावा बैठक घेतली. त्यामध्ये विविध सूचना दिल्या. व्हिजिबल पाेलिसिंग करा, अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. ही बाब घातक असून अपघात हाेणार नाही यासाठी उपाययाेजना करा, असे सांगितले. प्रतिबंधक कारवाया वाढवाव्यात, न्यायालयात गुन्हा सिद्ध हाेईल, असाच तपास केला जावा, दाेषाराेपपत्र सादर करण्यापूर्वी वरिष्ठांनी त्याची पडताळणी करावी, असेही मीना यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :Policeपोलिस