शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

नेत्यांच्या पुत्रप्रेमाने काँग्रेस कार्यकर्त्यांचा सावध पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2022 05:00 IST

काँग्रेसची नेतेमंडळी अजूनही कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या मानसिकतेत नाहीत. नगरपंचायत निवडणूक ही खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची निवडणूक होती. या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य काँग्रेसचे निवडून आले. मात्र सत्तेच्या समीकरणात नेत्यांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे संख्याबळ असूनही चार ठिकाणी विरोधी बाकावर बसावे लागले. नेत्यांना कार्यकर्त्यांच्या भवितव्याची नव्हे तर आपल्याच  घरातील व्यक्तीला काँग्रेसमध्ये नेतेपदी बसविण्याची आस लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांच्या कुटुंबापुरतीच मर्यादित झाली आहे. कोणत्याच नेत्याला माजी झाल्यानंतरही पुत्रप्रेमाचा मोह सोडवत नाही. यामुळे अनेक वर्षे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांनी आता सावध पवित्रा घेतला आहे. याचा परिणाम पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहिमेवर झाला आहे. आतापर्यंत २८ हजार सदस्य नोंदणी झाली असून त्यासाठीही १५ दिवसांची मुदतवाढ घ्यावी लागली आहे. काँग्रेसची नेतेमंडळी अजूनही कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या मानसिकतेत नाहीत. नगरपंचायत निवडणूक ही खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची निवडणूक होती. या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य काँग्रेसचे निवडून आले. मात्र सत्तेच्या समीकरणात नेत्यांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे संख्याबळ असूनही चार ठिकाणी विरोधी बाकावर बसावे लागले. नेत्यांना कार्यकर्त्यांच्या भवितव्याची नव्हे तर आपल्याच  घरातील व्यक्तीला काँग्रेसमध्ये नेतेपदी बसविण्याची आस लागली आहे. त्यामुळेच १६ तालुके असलेल्या २७ लाख लोकसंख्येच्या जिल्ह्यात जेमतेम २८ हजारांवर सदस्य नोंदणी झाली. पक्षवाढीसाठी सदस्य नोंदणी अभियान राबविण्याचे ठरले. त्यासाठी मोबाईल लिंक देण्यात आली. मात्र नेत्याने पक्षाच्या कामात कधीच रस दाखविला नाही. याउलट युवक काँग्रेसच्या निवडणुकीत नेत्यांचे पुत्र उमेदवार म्हणून रिंगणात होते. त्यावेळी सामदामदंड भेद वापरून आपल्याच पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पराभव कसा होईल यासाठी जंगजंग पछाडले. परिणामी नेत्यांचे पुत्रच पक्षांतर्गत निवडणुकीत विजयी      झाले. सामान्य कार्यकर्त्याला अपवादाने संधी मिळत असल्याने आता त्यांनीही पक्षकार्यातून आपले लक्ष कमी केल्याचे दिसून येते. त्यामुळेच सदस्य नोंदणीत काँग्रेस माघारली. यवतमाळ विधानसभेत तर जेमतेम १४०० सदस्य नोंदविता आले. हे पक्षाचे होत चाललेले अध:पतन  मानले जात आहे. खासगीत कार्यकर्ते उघड नाराजी व्यक्त करीत आहे. 

 कार्यकर्ते घडविणाऱ्या लाेकनेत्याची वानवा - जिल्ह्यातील काँग्रेसने राज्याला व देशाला अनेक प्रतिभावान नेते दिले आहेत. या नेत्यांनी खऱ्या अर्थाने लोकनेत्याची भूमिका बजावत पक्षातील कार्यकर्त्यांनाही वेळोवेळी संधी दिली. त्यामुळेच पक्ष सतत सत्तेत होता. मात्र, नंतरच्या काळात पक्षात साठमारी होऊ लागली. आमदार, मंत्री असलेल्यांनी कार्यकर्त्यांऐवजी स्वत:च्या मुलांनाच पद मिळावे यासाठी परिश्रम घेणे सुरू केले. परिणाम सामान्य कार्यकर्ता पक्ष कार्यातून अलिप्त राहू लागला. याचा फटका विधानसभा, लोकसभा निवडणुकीत सातत्याने बसला आहे. आताही कार्यकर्त्यांना बळ देणाऱ्या लोकनेत्याची काँग्रेसला व जिल्ह्याला गरज भासत आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेस