शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

शहरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यावरचा हल्ला निंदनीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 18:17 IST

आमदारांनी खुलासा करावा : संदीप बाजोरिया यांची पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : महाविकास आघाडीतील घटक असलेल्या काँग्रेसच्या तालुकाध्यक्षावर भाजप आमदाराच्या घराजवळ चाकूहल्ला झाला. यवतमाळ शहरातील गुन्हेगारी ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. आघाडीच्या कार्यकर्त्यावर चाकूहल्ला कुणी व का केला, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. पालकमंत्री, स्थानिक आमदार यांच्यासोबतच पोलिस अधीक्षकही याबाबत मौन बाळगून आहेत. आपण आमदार झाल्यास यवतमाळातील गुन्हेगारीचा बीमोड यास प्रथम प्राधान्य दिले जाईल, असे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी मंगळवारी झालेल्या पत्रपरिषदेत सांगितले.

यवतमाळ शहर व विधानसभा क्षेत्रात अनेक गंभीर समस्या आहेत. स्थानिक आमदारांचे कुठलेही नियोजन नाही. त्यामुळे गाव पूर्णतः बकाल झाले आहे. चांगले अधिकारी येथे टिकू दिले जात नाही. सोयीचे अधिकारी आणून भ्रष्टाचार केला जातो. यवतमाळ नगरपालिकेत प्रशासन शिल्लक नाही. कचऱ्याचे कंत्राट घेऊन वर्षाला दहा ते बारा कोटी रुपये हडपले जात आहेत. स्वच्छता कुठेच नाही. अ दर्जाची पालिका असतानाही फॉगिंग मशीन उपलब्ध नाही. शहरात १५-१५ दिवस नळाचे पाणी येत नाही. निळोणा व चापडोह या प्रकल्पात तुडुंब पाणीसाठा आहे. तरीही नियोजन केले जात नाही. अनेक भागात रस्तेच नाहीत. सर्वत्र खड्डे तयार झाले आहेत. अशी स्थिती असतानाही ठराविक भागात मात्र सुस्थितीत असलेल्या रस्त्यांवर नवीन रस्ते बांधले जात आहेत. 

यवतमाळ शहरात विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार केला जात आहे. अमृत योजना ही विषयोजना झाली आहे. यात निकृष्ट दर्जाचे पाईप वापरले आता, भूमिगत गटारासाठी रस्ते खोदले जात आहेत. एकूणच सरकारी पैशाची लूट शहरात सुरू आहे, असा आरोप संदीप बाजोरिया यांनी केला. 

आठ दिवसात प्रशासन काम कसे करणार ?विकास निधी कित्येक वर्षे खर्च केला जात नाही. आता आचारसंहिता लागणार असताना जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराला ८० लाख रुपयांचा निधी दिला आहे, या निधीच्या खर्चाचे आठ दिवसात नियोजन कसे करणार, हा प्रश्न आहे. डिनर सेटचे वाटप थेट कार्यकर्त्यांच्या घरून केले जात आहे. स्थानिक अधिकारी व प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे, असाही आरोप त्यांनी केला.

भाविकांच्या वाहनांना शहरात पार्किंग द्यायवतमाळात सुप्रसिद्ध असा नवरात्रोत्सव साजरा होतो. राज्यातील विविध ठिकाणांवरून भाविक येथे येतात. ९ दिवस अनेकांना उपवासाचे असतात. कुणी पायात चप्पलही वापरत नाही. अशा भाविकांची वाहने शहराबाहेर उभी ठेवणे चुकीचे आहे. भाविकांच्या वाहनांना शहरात पार्किंग सुविधा द्यावी, जेणे करून त्यांना त्रास होणार नाही, अशी मागणी संदीप बाजोरिया यांनी यावेळी केली.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाYavatmalयवतमाळ