शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

शहरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यावरचा हल्ला निंदनीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 18:17 IST

आमदारांनी खुलासा करावा : संदीप बाजोरिया यांची पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : महाविकास आघाडीतील घटक असलेल्या काँग्रेसच्या तालुकाध्यक्षावर भाजप आमदाराच्या घराजवळ चाकूहल्ला झाला. यवतमाळ शहरातील गुन्हेगारी ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. आघाडीच्या कार्यकर्त्यावर चाकूहल्ला कुणी व का केला, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. पालकमंत्री, स्थानिक आमदार यांच्यासोबतच पोलिस अधीक्षकही याबाबत मौन बाळगून आहेत. आपण आमदार झाल्यास यवतमाळातील गुन्हेगारीचा बीमोड यास प्रथम प्राधान्य दिले जाईल, असे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी मंगळवारी झालेल्या पत्रपरिषदेत सांगितले.

यवतमाळ शहर व विधानसभा क्षेत्रात अनेक गंभीर समस्या आहेत. स्थानिक आमदारांचे कुठलेही नियोजन नाही. त्यामुळे गाव पूर्णतः बकाल झाले आहे. चांगले अधिकारी येथे टिकू दिले जात नाही. सोयीचे अधिकारी आणून भ्रष्टाचार केला जातो. यवतमाळ नगरपालिकेत प्रशासन शिल्लक नाही. कचऱ्याचे कंत्राट घेऊन वर्षाला दहा ते बारा कोटी रुपये हडपले जात आहेत. स्वच्छता कुठेच नाही. अ दर्जाची पालिका असतानाही फॉगिंग मशीन उपलब्ध नाही. शहरात १५-१५ दिवस नळाचे पाणी येत नाही. निळोणा व चापडोह या प्रकल्पात तुडुंब पाणीसाठा आहे. तरीही नियोजन केले जात नाही. अनेक भागात रस्तेच नाहीत. सर्वत्र खड्डे तयार झाले आहेत. अशी स्थिती असतानाही ठराविक भागात मात्र सुस्थितीत असलेल्या रस्त्यांवर नवीन रस्ते बांधले जात आहेत. 

यवतमाळ शहरात विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार केला जात आहे. अमृत योजना ही विषयोजना झाली आहे. यात निकृष्ट दर्जाचे पाईप वापरले आता, भूमिगत गटारासाठी रस्ते खोदले जात आहेत. एकूणच सरकारी पैशाची लूट शहरात सुरू आहे, असा आरोप संदीप बाजोरिया यांनी केला. 

आठ दिवसात प्रशासन काम कसे करणार ?विकास निधी कित्येक वर्षे खर्च केला जात नाही. आता आचारसंहिता लागणार असताना जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराला ८० लाख रुपयांचा निधी दिला आहे, या निधीच्या खर्चाचे आठ दिवसात नियोजन कसे करणार, हा प्रश्न आहे. डिनर सेटचे वाटप थेट कार्यकर्त्यांच्या घरून केले जात आहे. स्थानिक अधिकारी व प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे, असाही आरोप त्यांनी केला.

भाविकांच्या वाहनांना शहरात पार्किंग द्यायवतमाळात सुप्रसिद्ध असा नवरात्रोत्सव साजरा होतो. राज्यातील विविध ठिकाणांवरून भाविक येथे येतात. ९ दिवस अनेकांना उपवासाचे असतात. कुणी पायात चप्पलही वापरत नाही. अशा भाविकांची वाहने शहराबाहेर उभी ठेवणे चुकीचे आहे. भाविकांच्या वाहनांना शहरात पार्किंग सुविधा द्यावी, जेणे करून त्यांना त्रास होणार नाही, अशी मागणी संदीप बाजोरिया यांनी यावेळी केली.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाYavatmalयवतमाळ