शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

तहसीलदारांच्या कारने दुचाकीला चिरडले, दोघांचा मृत्यू

By सुरेंद्र राऊत | Updated: May 5, 2024 15:52 IST

रात्री दीड वाजताची घटना : बोरी-दारव्हा मार्गावर झाला अपघात

यवतमाळ :  दारव्हा तालुक्यातील दोन तरुण दुचाकीने बोरी येथून मोबाईल टॉवर दुरूस्तीचे काम आटोपून गावी परत जात असताना तहसीलदारांच्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला चिरडले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री दीड वाजता घडली. एकाचवेळी दाेन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

अंकुश देवराव भजणे (२५, रा. रामगाव रामेश्वर), श्रीकांत प्रमोद ठाकरे (२४, रा. तोरनाळा) असे मृतांची नावे आहेत. हे दोघेही मोबाईल टॉवरच्या देखभाल दुरूस्तीचे काम करत होते. शनिवारी बोरी येथे आले होते. त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर दोघेही दुचाकी क्रमांक (एमएच २९, एबी ३७०८)ने जात असताना यवतमाळकडून दारव्हा जाणाऱ्या कार क्रमांक (एमएच २९, बीव्ही ४१३७)ने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. 

भरधाव कारने दुचाकीला काही फुटांपर्यंत फरफटत नेले. यात अंकुश देवराव भजणे याचा जागीच मृत्यू झाला तर श्रीकांत ठाकरे हा अत्यवस्थ हाेता. त्याला तातडीने दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या भीषण अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर, दारव्हा ठाणेदार विलास कुलकर्णी यांनी घटनास्थळाला भेट दिली. 

अपघाताला कारणीभूत असलेली कार ही तहसीलदार परसराम भोसले यांच्या मालकीचे असल्याचे प्राथमिक पोलिस तपासातून पुढे आले आहे. कार कोण चालवत होते? याचा शोध घेतला जात आहे. तूर्त या प्रकरणी पोलिसांनी कारच्या अज्ञात चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक धनंजय रत्नपारखी करत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात