शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

तहसीलदारांच्या कारने दुचाकीला चिरडले, दोघांचा मृत्यू

By सुरेंद्र राऊत | Updated: May 5, 2024 15:52 IST

रात्री दीड वाजताची घटना : बोरी-दारव्हा मार्गावर झाला अपघात

यवतमाळ :  दारव्हा तालुक्यातील दोन तरुण दुचाकीने बोरी येथून मोबाईल टॉवर दुरूस्तीचे काम आटोपून गावी परत जात असताना तहसीलदारांच्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला चिरडले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री दीड वाजता घडली. एकाचवेळी दाेन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

अंकुश देवराव भजणे (२५, रा. रामगाव रामेश्वर), श्रीकांत प्रमोद ठाकरे (२४, रा. तोरनाळा) असे मृतांची नावे आहेत. हे दोघेही मोबाईल टॉवरच्या देखभाल दुरूस्तीचे काम करत होते. शनिवारी बोरी येथे आले होते. त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर दोघेही दुचाकी क्रमांक (एमएच २९, एबी ३७०८)ने जात असताना यवतमाळकडून दारव्हा जाणाऱ्या कार क्रमांक (एमएच २९, बीव्ही ४१३७)ने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. 

भरधाव कारने दुचाकीला काही फुटांपर्यंत फरफटत नेले. यात अंकुश देवराव भजणे याचा जागीच मृत्यू झाला तर श्रीकांत ठाकरे हा अत्यवस्थ हाेता. त्याला तातडीने दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या भीषण अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर, दारव्हा ठाणेदार विलास कुलकर्णी यांनी घटनास्थळाला भेट दिली. 

अपघाताला कारणीभूत असलेली कार ही तहसीलदार परसराम भोसले यांच्या मालकीचे असल्याचे प्राथमिक पोलिस तपासातून पुढे आले आहे. कार कोण चालवत होते? याचा शोध घेतला जात आहे. तूर्त या प्रकरणी पोलिसांनी कारच्या अज्ञात चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक धनंजय रत्नपारखी करत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात