शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
3
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
4
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
5
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
6
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
7
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
8
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
9
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
10
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
11
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
13
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
14
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
15
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
17
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
18
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
19
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
20
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

खेड्यांसाठी तरुणांची ‘टीम राष्ट्रनिर्माण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 11:18 PM

शिकून चांगल्या नोकरीला लागलेल्या लोकांकडे समाजासाठी वेळच नसतो. पण अशा बहुतांश सुशिक्षित नोकरदारांच्या मनात ‘गावा’ने घर केलेले असते. गावाची आठवण येते, पण जाता येत नाही अशा द्विधामनोवस्थेत ते अडकतात.

ठळक मुद्देशहरी नोकरदार २३ जणांचा उपक्रम : पाच तालुक्यात वैचारिक साफसफाई

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिकून चांगल्या नोकरीला लागलेल्या लोकांकडे समाजासाठी वेळच नसतो. पण अशा बहुतांश सुशिक्षित नोकरदारांच्या मनात ‘गावा’ने घर केलेले असते. गावाची आठवण येते, पण जाता येत नाही अशा द्विधामनोवस्थेत ते अडकतात. पण राष्ट्रसंतांच्या विचारांचा पगडा असलेल्या २३ तरुणांनी मात्र ही मानसिक घालमेल संपवून स्वत:चेच नव्हे, तर पाच तालुक्यांतील गावांची भौतिक आणि वैचारिक साफसफाई सुरू केली आहे.टीम राष्ट्रनिर्माण विचारधारा अशा नावासह हे तरुण गेल्या चार महिन्यांपासून गावखेड्यांमध्ये काम करीत आहे. घाटंजी, यवतमाळ, पांढरकवडा, आर्णी, दारव्हा या तालुक्यांतील गावे बदलण्याचा विडा या टीमने उचलला आहे. विशेष म्हणजे, आपापल्या नोकऱ्या सांभाळून ही टीम काम करते.प्रत्येक शनिवारी एका खेड्याची निवड करून सर्व तरुण तेथे पोहोचतात. सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत हाती खराटा घेऊन ग्रामसफाई करतात. रात्री ७.३० पर्यंत भजनसंमेलन घेऊन गावकºयांपुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार ठेवतात. रात्री आठ वाजता सामुदायिक प्रार्थना झाल्यावर हे तरुण कीर्तनकारांची भूमिका पत्करतात. रात्री ११ वाजेपर्यंत हे कीर्तनरुपी प्रबोधन सुरू असते. यात जीवनविकासासाठी शिक्षणाचे महत्त्व, व्यसनांमुळे जीवनात अंध:कार, कृषीतंत्र अशा विषयांवर हे तरुण गावकऱ्यांना मार्गदर्शन करतात. गावातून शिकून शहरात स्थायिक झालेले नोकरदार पुन्हा गावात येऊन आपल्यासोबत संवाद साधतात, हे बघून गावकºयांच्या मनात सकारात्मक उर्जा निर्माण होते, असा या तरुणांचा विश्वास आहे.गेल्या फेब्रुवारीपासून या उपक्रमाची सुरूवात घाटंजी तालुक्यातून करण्यात आली. आतापर्यंत डांगरगाव, पाटापांगरा, तिवसाळा, पंगडी, सायतखर्डा, पहापळ, वरझडी, सायखेडा, पांढुर्णा, मांजरी, कवठा, तळणी, वडगाव, कारेगाव, जरूर, कामठवाडा, शिवणी, करमना आदी गावांमध्ये हे तरुण पोहोचले आहेत.टीम आपल्यासाठी ग्रामसफाई करीत असल्याचे पाहून गावकरीही या उपक्रमात सहभागी होतात, हे विशेष. तर शेजारच्या खेड्यातील नागरिक ‘आमच्याही गावात या’ अशी गळ घालतात. नुकताच घाटंजी येथे झालेल्या प्रबोधन कार्यक्रमात यवतमाळचे खुशाल ठाकरे, डॉ. ताराचंद कंठाळे, डॉ. कोठारी, ललित काळे आदींनी या टीमची भेट घेतली.ही आहे ‘टीम राष्ट्रनिर्माण विचारधारा’शिवाजी सोयाम, मधुकर गेडाम, अविनाश राऊत, पांडुरंग किरणापुरे, कैलास बगमारे, विलास कोरांगे, गजानन चव्हाण, राजू विरदंडे, छगन पेंदोर, राजू कुंटलवार, सुरेश चौधरी, दिवाकर गेडाम, घनश्याम काटकर, गोवर्धन मेश्राम, प्रदीप जाधव, माणिकदास टोंगे, सुरेश बोपटे, श्रीराम तोडसाम, मोहन शेंडे, चंद्रकांत आडे, गणेश साबापुरे, विष्णू नेवारे, गजेंद्र ढवळे आदी या टीमचे सदस्य आहेत.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ