शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

आचारसंहितेतून निसटल्या शिक्षकांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 21:42 IST

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर विविध कामांना ‘ब्रेक’ लागलेला असला, तरी जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया मात्र आचारसंहितेच्या काळातच राबविली जाणार आहे. गेल्या वर्षी एका क्लिकवर जम्बो बदल्या करून चुका पदरात पाडून घेणारे प्रशासन यंदाही सहाशे ते सातशे शिक्षकांच्या बदल्या करण्याच्या तयारीत आहे.

ठळक मुद्दे२५ मार्चपासून प्रक्रिया : गेल्या वर्षी जम्बो बदल्या, यंदाही सहाशेपेक्षा अधिक गुरुजी बदलणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर विविध कामांना ‘ब्रेक’ लागलेला असला, तरी जिल्हा परिषदशिक्षकांची बदली प्रक्रिया मात्र आचारसंहितेच्या काळातच राबविली जाणार आहे. गेल्या वर्षी एका क्लिकवर जम्बो बदल्या करून चुका पदरात पाडून घेणारे प्रशासन यंदाही सहाशे ते सातशे शिक्षकांच्या बदल्या करण्याच्या तयारीत आहे.अचारसंहितेची घोषणा कोणत्याही क्षणी होणार हे लक्षात घेऊनच ग्रामविकास विभागाने जिल्हापरिषदेला ८ मार्च रोजीच बदली प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश दिला. १० मार्चपासून निवडणूक आचारसंहिता लागू झाली असली, तरी आता २५ मार्चपासून शिक्षकांना बदलीसाठी अर्ज दाखल करता येणार आहेत. तर तत्पूर्वी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग बदलीपात्र शिक्षक, बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची यादी (मॅपिंग) तयार करण्यात गुंतलेला आहे.यंदाही चार संवर्ग पाडून शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. मागील वर्षी दीर्घ प्रतीक्षेनंतर साडेतीन हजार शिक्षकांच्या बदल्या झाल्या. यंदा मात्र ही संख्या घटून सहाशे ते सातशे शिक्षकांच्या बदल्या होतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. सेवेला दहा वर्ष झालेले शिक्षक आणि एकाच शाळेत सलग तीन वर्षे असलेले शिक्षक बदलीसाठी पात्र ठरणार आहेत.मात्र बहुतांश शिक्षकांना गेल्यावर्षीच नवी शाळा मिळाल्याने अनेक जण तीन वर्षांचा निकष पूर्ण करीत नाही. तर ज्यांच्या सेवेला दहा वर्षे झाली, अशीही मंडळी गेल्या वर्षीच बदलीच्या ठिकाणी रुजू झाली. यामुळे यंदा बदलीपात्र शिक्षकांची संख्या हजाराच्या आतच राहण्याची शक्यता आहे.परीक्षेच्या काळात बदल्या नकोबदलीसाठी अर्च भरण्याची प्रक्रिया २५ मार्चपासून सुरू होत आहे. मात्र याच काळात विविध शाळांमध्ये परीक्षा सुरू होणार आहेत. शिवाय, अनेक शिक्षकही निवडणुकीच्या कामात गुंतणार आहेत. या धावपळीत बदली प्रक्रिया राबवू नये. आचारसंहिता संपल्यानंतरच बदली प्रक्रिया पार पाडावी, अशी मागणी शिक्षण समितीचे निमंत्रित सदस्य मधुकर काठोळे यांनी केली आहे. तर गेल्या वर्षी रॅण्डम राऊंडमध्ये जे विस्थापित झाले, अशा शिक्षकांना यंदाच्या बदली प्रक्रियेत न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी प्राथमिक शिक्षक परिषदेचे गजानन पोयाम यांनी केली आहे.आचारसंहितेच्या आधी आणि नंतरशिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश आचारसंहितेपूर्वी देण्यात आले. तर प्रत्यक्ष बदलीचे आदेश मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला काढले जाणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेची ही बदली प्रक्रिया आचारसंहितेच्या कचाट्यातून सहिसलामत सुटणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदTeacherशिक्षक