शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग पुन्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 12:11 IST

राज्यात २४ हजार जागा येत्या सहा महिन्यात भरणार, असा दावा एकीकडे शिक्षणमंत्र्यांनी केलेला आहे. तर दुसरीकडे ग्रामविकास विभागाने नव्या शिक्षक भरतीचा मार्ग खडतर केला आहे.

ठळक मुद्दे‘कम्पलसरी व्हॅकन्सी’चा खोडाअतिरिक्त शिक्षकांच्या जागा रिक्त ठेवण्याचे आदेश

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात २४ हजार जागा येत्या सहा महिन्यात भरणार, असा दावा एकीकडे शिक्षणमंत्र्यांनी केलेला आहे. तर दुसरीकडे ग्रामविकास विभागाने नव्या शिक्षक भरतीचा मार्ग खडतर केला आहे. जिल्हा परिषद शाळेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या जागा ‘कम्पलसरी व्हॅकन्सी’ म्हणून नोंदविण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने शनिवारी दिल्यामुळे आता नव्या भरतीसाठी जागा कुठून उपलब्ध होतील, हा प्रश्न डीएडधारकांपुढे उभा ठाकला आहे.तब्बल पाच वर्षानंतर शिक्षक भरतीचे सुतोवाच शिक्षण विभागाने केले आहे. त्यासाठी नुकतीच डिसेंबर महिन्यात बुद्धीमत्ता आणि अभियोग्यता चाचणीही घेण्यात आली. ही परीक्षा देणारे पावणे दोन लाख विद्यार्थी अडीच महिन्यानंतरही ‘रिझल्ट’च्याच प्रतीक्षेत आहेत. तर दुसरीकडे फेब्रुवारीमध्ये शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी २४ हजार शिक्षक पदे सहा महिन्यात भरणार असल्याचे जाहीर केले. सध्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया ‘पाईपलाईन’मध्ये आहे. ती पूर्ण होताच रिक्त जागा भरल्या जातील, असा दावा केला जात आहे.१ जानेवारी रोजीच्या पटसंख्येनुसार जिल्हा परिषद शाळांची संचमान्यता पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात सहायक शिक्षक, पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापक आदींची तब्बल १४ हजार पदे अतिरिक्त ठरली आहेत. तर हजारो शाळांमध्ये पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षकांची उपलब्धता नाही. त्यामुळे बदली प्रक्रियेनंतर रिक्त जागांवर नवी भरती केली जाईल, अशी आशा ‘टेट’च्या परीक्षार्थ्यांना होती. त्यात आता ग्रामविकास विभागाच्या ‘कम्पलसरी व्हॅकन्सी’च्या आदेशाने खोडा घातला आहे.या आदेशानुसार, संचमान्यतेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना बदलीसाठी अर्ज करता येणार आहे. परंतु, ते ज्या शाळेत अतिरिक्त ठरले आहेत, तेथील जागांवर यापुढे कोणत्याही शिक्षकांची बदली करू नये, असे आदेशात म्हटले आहे. बदली प्रक्रियेसाठी त्या जागांचे मॅपिंग करताना तेथे ‘कम्पलसरी व्हॅकन्सी’ (अनिवार्य रिक्त जागा) दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील १४ हजार शिक्षक पदे व्यपगत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.बंद होणाऱ्या शाळांची संख्या वाढणारशिक्षण विभागाने आधीच १० पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद केल्या आहेत. तर आता ३० पेक्षा कमी पटांच्या शाळांची आकडेवारी गोळा करणे सुरू केले आहे. ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक हे संचमान्यतेचे सूत्र आहे. आता संचमान्यतेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या जागाच कायमच्या रिक्त ठेवण्याचे आदेश ग्रामविकासने दिले. त्यामुळे ३० पेक्षा कमी पटाच्या शाळाही येत्या सत्रात बंद होण्याचा धोका स्पष्ट झाला आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक