शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

मुलांशी बोला, त्यांना बोलते करा आणि बोलतच राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 21:54 IST

शरीरात होणारे बदल, त्याबाबत मुला-मुलींच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याची योग्य उत्तरे पालकांनी दिली पाहिजे. मुळात लैंगिकतेविषयी कोणताही प्रश्न विचारताना मुलांना भीती वाटू नये, याची काळजी पालकांनीच घेतली पाहिजे.

ठळक मुद्देइंद्रजित खांडेकर : ‘वायपीएस’मध्ये ‘मुलांमधील लैंगिक बदला’वर पालकांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शरीरात होणारे बदल, त्याबाबत मुला-मुलींच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याची योग्य उत्तरे पालकांनी दिली पाहिजे. मुळात लैंगिकतेविषयी कोणताही प्रश्न विचारताना मुलांना भीती वाटू नये, याची काळजी पालकांनीच घेतली पाहिजे. त्यासाठी मुलांशी बोला, त्यांनाही बोलते करा आणि सतत बोलत राहा, असा गुरुमंत्री डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी दिला.‘किशोरवयीन मुले, लैंगिक बदल आणि शारीरिक शिक्षण - पालकांची भूमिका’ या विषयावर शनिवारी यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये (वायपीएस) कार्यशाळा पार पडली. त्यावेळी सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्समधील फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. इंद्रजित खांडेकर मार्गदर्शक म्हणून बोलत होते. डॉ. खांडेकर यांनी मुलांच्या लैंगिक बदलबाबत विविध पुस्तके लिहिली आहेत. बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या तपासाबाबत त्यांनी मार्गदर्शक पुस्तिका तयार केली आहे. विशेष म्हणजे, भारतात सध्या अशा गुन्ह्यांच्या तपासाबाबत याच पुस्तिकेचा आधार घेतला जात आहे.मुलांना कार दिली, चालवणे कोण शिकवणार?आजचे जग हे माहितीने भरलेले आहे. चोहोबाजूंनी मुलांपर्यंत माहितीचा भडीमार होत आहे. त्यांच्या हाती इंटरनेट आहे. पण ते कसे वापरावे, त्यातून कोणती माहिती घेतली पाहिजे, ती कशी घेतली पाहिजे, हे मुलांना कोणीही शिकवत नाही. मुलांच्या हाती कार दिली, पण कार चालविणे शिकवलेच नाही, तर अपघात होणारच. म्हणूनच पोर्नोग्राफीसारख्या साईटवर बंदी घालणे हा पयार्य नाही. तर पोर्नोग्राफी कशी वाईट आहे, हे मुलांना पालकांनीच योग्य वयात, योग्य शब्दात समजावून सांगणे आवश्यक आहे, असे डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी स्पष्ट केले.या गोष्टींची घ्या तातडीने नोंदपाठलाग - मुलांकडून होणाºया पाठलागामुळे मुलींमध्ये निराशा वाढते. पाठलागाला कंटाळून महाराष्ट्रात ७ हजार १३२ आत्महत्या झाल्याची नोंद आहे. याबाबत मुलांना योग्य मार्गदर्शन करा.छळवणूक - मुला-मुलींचा शाळेत अनेकदा छळ होतो. बºयाचदा हा छळ मित्रांकडून, सिनिअर मुलांकडूनही होतो. त्यामुळे मुल शाळेत जाण्यास नकार देते. त्याची कारणे पालकांनी जाणून घेतली पाहिजे.प्रेम तुटणे - आठवी, नववीतील मुला-मुलींमध्ये प्रेम तुटणे या कारणावरूनही निराशा वाढत आहे. याबाबत पालकांनी त्यांच्याशी मोकळा संवाद साधल्यास अनर्थ टळू शकतो.

टॅग्स :SchoolशाळाYavatmalयवतमाळ