शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

ताईबाई अक्का, विचार करा पक्का..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 22:36 IST

ताईबाई अक्का विचार करा पक्का... मतदानाच्या मोसमात ही टॅगलाईन सर्रास वापरली जाते. प्रत्यक्षात ग्रामीण भागात मोलमजुरी करणाऱ्या लाखो आयाबायांची मते कुणाला मिळावी, हे पुरुषच ठरवितात.

ठळक मुद्देग्रामीण आयाबायांच्या मतांवर पुरुषी पगडा : मतदान यंत्राला दाबलेली बटन कळते, महिलेचे मन नाही

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ताईबाई अक्का विचार करा पक्का... मतदानाच्या मोसमात ही टॅगलाईन सर्रास वापरली जाते. प्रत्यक्षात ग्रामीण भागात मोलमजुरी करणाऱ्या लाखो आयाबायांची मते कुणाला मिळावी, हे पुरुषच ठरवितात. कोणत्या तरी राजकीय आॅटोरिक्षात कोंबून महिलांना मतदान केंद्रावर नेऊन पुरुषी हुकमानुसारच त्यांची मते वाटेल तशी वळविली जातात. एकीकडे स्त्री-पुरुष समानता, राजकारणात महिलांना आरक्षण हे विषय चर्चेत असताना दुसरीकडे लाखो महिलांच्या मतस्वातंत्र्यावर खुलेआम घाला घातला जात आहे. ८ मार्च रोजी साजऱ्या होणाºया जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील खेडूत महिलांच्या मतपारतंत्र्याचा हा धांडोळा...मतदान केंद्रावर प्रत्येकाने स्वमर्जीने जावे, स्वत:च्या विवेकबुद्धीनेच उमेदवार निवडावा हा लोकशाहीचा आत्मा. पण महिलांच्या बाबतीत असे घडत नाही. विशेषत: जिल्ह्यातील खेड्यापाड्यांमध्ये आजही महिलांची गठ्ठा मते कोणत्याही एकाच उमेदवाराकडे ‘वळविण्या’ची कारस्थानी व्यवस्था कार्यरत असते. शेतात घाम गाळणाºया, जंगलात गुरं चारणाऱ्या, वय झालेल्या अनेक महिलांची मते त्यांची स्वत:ची उरतच नाही, त्यांच्या स्वत:च्या मताने पडतच नाही. गावपुढाऱ्याच्या हुकमानुसार दुसरे ‘मत’ महिलांवर लादले जाते अन् महिला मन मारून पुरुष सांगेल त्याच बटनावर बोट ठेवते. चार दोन महिला आरक्षणातून निवडून आल्या म्हणजे, राजकीय पटलावर महिलांना न्याय मिळाला असा अर्थ होत नाही. प्रत्यक्ष मतदान करणाºया ग्रामीण महिलांचे मतस्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आयोगाने ‘वॉच’ ठेवण्याची गरज आहे. मुळात ताईबाई अक्कानेच याचा पक्का विचार करण्याची गरज आहे.गलंग म्हतारीले मद्दानाले नेते, पन दवाखान्यात नाईपिंपळगावच्या कविता वाढई म्हणाल्या, बायायची मतं कोणीबी येऊन फिसकवून टाकते. म्हून मंग कोणीतरी जिम्मेदार मानूस यॅटो करून सर्व्या बायायले एकखट्टा मद्दानाले घेऊन जाते. आसं नेयमीच होते... कविता वाढई यांच्या या विधानातून ग्रामीण स्त्रियांच्या मतदानातील ‘दबावतंत्र’ उघड होते. पण कवितासारख्या काही महिला आता हुशार झाल्या आहेत. त्या म्हणतात, ‘तू नेतं का? तं ने. पण मत मी माया मतानं देईन गड्या! येकांदी म्हतारी पार गलंग होऊन राह्यते. बाजीले चिकटून मरणाची वाट पाह्यत राह्यते, तरीबी यॅटो करून लोकं तिले मतदानाले नेते. पण त्याच्या पह्यले तिले कोणी दवाखान्यात नेत नाई.’ कविता वाढई यांनी वर्षानुवर्षे गावात पाहिलेली ही महिलांच्या मतदानाची वास्तव स्थिती आहे.आॅटो सुविधा म्हणजे आमिषचमतदानाच्या दिवशी गावात येणारे आॅटो ही एक सोय असली तरी त्या सुविधेआडून महिलांची मते बळकावली जात आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक