शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

जलयुक्त शिवार अभियानाला सुरुंग

By admin | Updated: March 17, 2015 01:13 IST

मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाला जिल्ह्यात सुरुंग लावण्याचे प्रयत्न सुरू आहे.

यवतमाळ : मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाला जिल्ह्यात सुरुंग लावण्याचे प्रयत्न सुरू आहे. पाणलोटमधून गब्बर झालेल्या कंत्राटदार, अधिकाऱ्यांनी यावर ताबा मिळविला असून या अभियानात टंचाईयुक्त गावे वगळल्याचे दिसत आहे. तर सिमेंट बांधावर अधिक भर दिला जात असल्याने या योजनेला प्रारंभीच नख लागण्याची भीती व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणीटंचाई असलेल्या गावात तातडीने उपाययोजनेसाठी जलयुक्त शिवार अभियानातील कामे पूर्ण करण्यासाठी जून महिन्याचा अल्टीमेटम दिला. इतकेच नव्हे तर तातडीने २८ कोटींचा निधीही उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्यातील ४११ गावे या योजनेत समाविष्ठ करण्यात आली आहे. मुळात जलयुक्त शिवार अभियानाचा उद्देश हा गावातील पाणीपातळी वाढविणे आहे. पहिल्या टप्प्यात टंचाईग्रस्त गावांची या उपाययोजनेसाठी निवड करणे अपेक्षित होते. मात्र कंत्राटदार व अधिकाऱ्यांसाठी सोयीचे ठरेल अशीच गावे निवडण्यात आली. त्यातही सिमेंट बंधारा बांधण्यावरच अधिक भर देण्यात आला. सिमेंट बंधाऱ्याच्या कामात फार मोठी मार्जीन रहात असल्याने अधिकाऱ्यांचे यावर विशेष प्रेम आहे. जिल्ह्यातील १९० कामांचा सर्वे करण्यात आला असून, ७३ गावात सिमेंट नाला बांध टाकण्यात येणार आहे. यासाठी यवतमाळ तालुक्यातील १०, दिग्रस ६, नेर ५, कळंब ४, राळेगाव ३, घाटंजी ७, आर्णी ६, वणी २, केळापूर ४, मारेगाव ३, झरी २, पुसद ७, दारव्हा ६, बाभूळगाव २, उमरखेड ४, महागाव २ अशी कामे वितरित करण्यात आली आहे. पुसद तालुक्यातील पन्हाळा, म्हैसमाड ही तीव्र पाणीटंचाई असलेली गावे उपाययोजनेसाठी न निवडता ज्या गावात पाणी उपलब्ध आहे अशा मारवाडी बु., हर्षी यांची निवड करण्यात आली आहे. यावरून जलयुक्त शिवार अभियानही पाणलोट कार्यक्रमाप्रमाणेच सपशेल अपयशी ठरणार असे दिसून येते. (कार्यालय प्रतिनिधी)मार्चपूर्वी कामांना मंजुरीची धडपडमुख्यमंत्र्यानी तीन लाखांवरचे कोणतेही काम करण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया सक्तीची केली आहे. आर्थिक वर्ष संपल्यानंतर या कायद्याची कठोर अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे कृषी अधिकाऱ्याच्या मर्जीनेच सध्या जलयुक्त शिवाराचे काम दिले जात आहे. त्यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया केली जात नाही. १० ते २५ लाखांपर्यंतचा बंधारा केवळ कमिशनचे फिक्ंिसग करूनच वाटला जातो.