शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जलयुक्त शिवार अभियानाला सुरुंग

By admin | Updated: March 17, 2015 01:13 IST

मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाला जिल्ह्यात सुरुंग लावण्याचे प्रयत्न सुरू आहे.

यवतमाळ : मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाला जिल्ह्यात सुरुंग लावण्याचे प्रयत्न सुरू आहे. पाणलोटमधून गब्बर झालेल्या कंत्राटदार, अधिकाऱ्यांनी यावर ताबा मिळविला असून या अभियानात टंचाईयुक्त गावे वगळल्याचे दिसत आहे. तर सिमेंट बांधावर अधिक भर दिला जात असल्याने या योजनेला प्रारंभीच नख लागण्याची भीती व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणीटंचाई असलेल्या गावात तातडीने उपाययोजनेसाठी जलयुक्त शिवार अभियानातील कामे पूर्ण करण्यासाठी जून महिन्याचा अल्टीमेटम दिला. इतकेच नव्हे तर तातडीने २८ कोटींचा निधीही उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्यातील ४११ गावे या योजनेत समाविष्ठ करण्यात आली आहे. मुळात जलयुक्त शिवार अभियानाचा उद्देश हा गावातील पाणीपातळी वाढविणे आहे. पहिल्या टप्प्यात टंचाईग्रस्त गावांची या उपाययोजनेसाठी निवड करणे अपेक्षित होते. मात्र कंत्राटदार व अधिकाऱ्यांसाठी सोयीचे ठरेल अशीच गावे निवडण्यात आली. त्यातही सिमेंट बंधारा बांधण्यावरच अधिक भर देण्यात आला. सिमेंट बंधाऱ्याच्या कामात फार मोठी मार्जीन रहात असल्याने अधिकाऱ्यांचे यावर विशेष प्रेम आहे. जिल्ह्यातील १९० कामांचा सर्वे करण्यात आला असून, ७३ गावात सिमेंट नाला बांध टाकण्यात येणार आहे. यासाठी यवतमाळ तालुक्यातील १०, दिग्रस ६, नेर ५, कळंब ४, राळेगाव ३, घाटंजी ७, आर्णी ६, वणी २, केळापूर ४, मारेगाव ३, झरी २, पुसद ७, दारव्हा ६, बाभूळगाव २, उमरखेड ४, महागाव २ अशी कामे वितरित करण्यात आली आहे. पुसद तालुक्यातील पन्हाळा, म्हैसमाड ही तीव्र पाणीटंचाई असलेली गावे उपाययोजनेसाठी न निवडता ज्या गावात पाणी उपलब्ध आहे अशा मारवाडी बु., हर्षी यांची निवड करण्यात आली आहे. यावरून जलयुक्त शिवार अभियानही पाणलोट कार्यक्रमाप्रमाणेच सपशेल अपयशी ठरणार असे दिसून येते. (कार्यालय प्रतिनिधी)मार्चपूर्वी कामांना मंजुरीची धडपडमुख्यमंत्र्यानी तीन लाखांवरचे कोणतेही काम करण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया सक्तीची केली आहे. आर्थिक वर्ष संपल्यानंतर या कायद्याची कठोर अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे कृषी अधिकाऱ्याच्या मर्जीनेच सध्या जलयुक्त शिवाराचे काम दिले जात आहे. त्यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया केली जात नाही. १० ते २५ लाखांपर्यंतचा बंधारा केवळ कमिशनचे फिक्ंिसग करूनच वाटला जातो.