शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

विजेचा शॉक घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या; उद्ध्वस्त कापसाच्या शेतातच सोडला प्राण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2020 15:53 IST

Yavatmal : पंजाबराव महादेवराव गावंडे (६०) रा.उटी असे आत्महत्या करणा-या शेतक-याचे नाव आहे.

महागाव (यवतमाळ) : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम उद्ध्वस्त केला आहे. यामुळे हादरलेल्या एका शेतकऱ्यांने उटी येथे स्वत:च्या शेतातच विजेची तार पायाला गुंडाळून आत्महत्या केली. अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना रविवारी सकाळी ८ वाजता घडली. 

पंजाबराव महादेवराव गावंडे (६०) रा.उटी असे आत्महत्या करणा-या शेतक-याचे नाव आहे. गावंडे यांच्याकडे अडीच एकर शेती असून ते स्वत: शेतात राबत होते. यावर्षी त्यांनी कापसाची लागवड केली. गावंडे यांची पत्नी दुर्धर आजाराने दोन वर्षांपासून अंथरूनाला खिळली आहे. तिच्या उपचारासाठी गावंडे यांच्यावर अनेकांचे कर्ज झाले आहे. अशाही स्थितीत ते कुटुंबाचा गाडा हाकत होते. यावर्षी पावसाने त्यांची कापसाची शेती उद्ध्वस्त केली. यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून विवंचनेत होते.

रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते शेतात गेले. तेथे त्यांनी मोटरपंपाच्या पेटीजवळ विजेची वायर पायाला गुंडाळून घेतली व वीज प्रवाह सुरू केला. हा प्रकार शेजारच्या शेतातील शेतक-यांनी पाहिला. धाव घेईपर्यंत गावंडे यांची प्राणज्योत मावळली होती. ही थरारक घटना कुटुंबीयांना सांगितली. मुलगा विश्वास याने शेताकडे धाव घेतली. वडिलांना लगतच्या सवना येथील रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी मृत् घोषित केले. या प्रकरणी संतोष दत्तराव गावंडे यांच्या फिर्यादीवरून महागाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे. गावंडे यांना तीन विवाहित मुली व एक विवाहित मुलगा आहे. 

टॅग्स :YavatmalयवतमाळFarmerशेतकरी