शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

कृष्णेच्या तीरी साखर विरघळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 13:18 IST

राज्यात साखरेसोबत गुळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी साखर व गुळाचे दर कडाडले आहेत.

ठळक मुद्देराज्यभरात साखरेचे दर कडाडले सण उत्सवाच्या तोंडावर महागाईचे संकट

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कृष्णा, कोयना, पंचगंगा नदीला आलेल्या पुराने कोल्हापूर, सांगली आणि कराडला मोठा फटका बसला. या ठिकाणावरून राज्यभरात साखर आणि गुळ पोहचविला जातो. परंतु, पुरामुळे मोठ्या प्रमाणात साखर आणि गुळाचे पाणी झाले. यातून राज्यात साखरेसोबत गुळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी साखर व गुळाचे दर कडाडले आहेत.गतवर्षी साखरेचे विक्रमी उत्पादन झाले. यामुळे साखरेची निर्यात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली झाल्या. यानंतरही पुरेशा प्रमाणात निर्यात झाली नाही. अखेरीस साखरेचा कोटा राज्यातील कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात कायम राहिला. साखर कारखान्यातील साखर ठोक विक्रेत्यांकडे जाते. त्यातून चिल्लर विक्रेते साखरेची खरेदी करतात. त्यानंतर ती इतर दुकानामध्ये पोहचते. साखर मुबलक प्रमाणात असल्याने वर्षभरापासून साखरेचे दर स्थिर होते.आणखी वर्षभर ही स्थिती कायम राहणार असल्याची शक्यता होती. मात्र कृष्णा, कोयना, पंचगंगा नदीला आलेल्या पुराने साखर आणि गुळ साठ्याचे संपूर्ण गणितच बिघडविले आहे. कोल्हापूर, सांगली आणि कराडमधील साखर आणि गुळाच्या ठोक विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. पुराचे पाणी गोदामामध्ये शिरले. साखर आणि गुळाचे पाणी झाले. हे नुकसान इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की, त्यातून तुटवड्याची स्थिती निर्माण झाली आहे.यामुळे राज्यभरात साखरेच्या किमती वाढल्या आहेत. पूर्वी ३३ ते ३४ रूपये किलो असलेली साखर ३६ रूपयांवर पोहोचली आहे. तर गुळाचे दर ३६ ते ३८ रूपये किलोवरून ४२ ते ४३ रूपये किलोवर पोहचले आहेत. पुढे हे दर आणखी वाढतील, असा अंदाज व्यापारी वर्तवित आहे. यामुळे व्यापाऱ्यांकडून साखरेचा आणि गुळाचा मोठ्या प्रमाणात उठाव वाढला आहे. गत १५ दिवसांपासून राज्यात होणारा साखरेचा पुरवठाही थांबला आहे. यातून साखरेचा आणि गुळाचा गोडवा सण उत्सवात कडू होण्याचा धोका आहे.

ऐन सण उत्सवातच झळसण उत्सवाला सुरूवात होतानाच साखर आणि गुळाचे मोठे संकट उभे झाले आहे. यामुळे येणाºया काळात पोळा, गणपती, गौरीपूजन, दसरा आणि दिवाळीच्या सणात नागरिकांना महागाईचा सामना करावा लागणार आहे. यातून सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.

ऊसाचे केवळ १० टक्के क्षेत्रयावर्षी मराठवाड्यात पाऊस पडलाच नाही. यामुळे या पट्ट्यातील ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात घटली आहे. सध्या १० टक्के क्षेत्रातच ही लागवड नोंदविली गेली आहे. ९० टक्के क्षेत्र इतर पिकाच्या लागवडीखाली आले आहे. यामुळे येणाºया काळात उत्पादनावर परिणाम होणार आहे.पूरपरिस्थितीमुळे साखरेचा कोटा घटला. परंतु यावर्षी ऊसाची लागवड न झाल्याने पुढच्या वर्षी आणखी गंभीर स्थिती निर्माण होण्याची व दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.- दत्तात्रय गायकवाड, उपायुक्त (साखर), पुणेपुरामुळे साखर उत्पादक जिल्ह्यात ४० टक्के साखरेचे नुकसान झाले आहे. यावेळी १९ लाख क्विंटल साखर पाठविण्यात आली. यामध्ये दोन लाख क्विंटलची तफावत आहे. यामुळे दीड वर्षांपासून स्थिर असलेली साखर क्विंटलमागे २०० रुपयांनी वाढली आहे.- रोहित सिंघानिया, साखरेचे ठोक विक्रेता, यवतमाळ

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने