शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

कृष्णेच्या तीरी साखर विरघळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 13:18 IST

राज्यात साखरेसोबत गुळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी साखर व गुळाचे दर कडाडले आहेत.

ठळक मुद्देराज्यभरात साखरेचे दर कडाडले सण उत्सवाच्या तोंडावर महागाईचे संकट

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कृष्णा, कोयना, पंचगंगा नदीला आलेल्या पुराने कोल्हापूर, सांगली आणि कराडला मोठा फटका बसला. या ठिकाणावरून राज्यभरात साखर आणि गुळ पोहचविला जातो. परंतु, पुरामुळे मोठ्या प्रमाणात साखर आणि गुळाचे पाणी झाले. यातून राज्यात साखरेसोबत गुळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी साखर व गुळाचे दर कडाडले आहेत.गतवर्षी साखरेचे विक्रमी उत्पादन झाले. यामुळे साखरेची निर्यात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली झाल्या. यानंतरही पुरेशा प्रमाणात निर्यात झाली नाही. अखेरीस साखरेचा कोटा राज्यातील कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात कायम राहिला. साखर कारखान्यातील साखर ठोक विक्रेत्यांकडे जाते. त्यातून चिल्लर विक्रेते साखरेची खरेदी करतात. त्यानंतर ती इतर दुकानामध्ये पोहचते. साखर मुबलक प्रमाणात असल्याने वर्षभरापासून साखरेचे दर स्थिर होते.आणखी वर्षभर ही स्थिती कायम राहणार असल्याची शक्यता होती. मात्र कृष्णा, कोयना, पंचगंगा नदीला आलेल्या पुराने साखर आणि गुळ साठ्याचे संपूर्ण गणितच बिघडविले आहे. कोल्हापूर, सांगली आणि कराडमधील साखर आणि गुळाच्या ठोक विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. पुराचे पाणी गोदामामध्ये शिरले. साखर आणि गुळाचे पाणी झाले. हे नुकसान इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की, त्यातून तुटवड्याची स्थिती निर्माण झाली आहे.यामुळे राज्यभरात साखरेच्या किमती वाढल्या आहेत. पूर्वी ३३ ते ३४ रूपये किलो असलेली साखर ३६ रूपयांवर पोहोचली आहे. तर गुळाचे दर ३६ ते ३८ रूपये किलोवरून ४२ ते ४३ रूपये किलोवर पोहचले आहेत. पुढे हे दर आणखी वाढतील, असा अंदाज व्यापारी वर्तवित आहे. यामुळे व्यापाऱ्यांकडून साखरेचा आणि गुळाचा मोठ्या प्रमाणात उठाव वाढला आहे. गत १५ दिवसांपासून राज्यात होणारा साखरेचा पुरवठाही थांबला आहे. यातून साखरेचा आणि गुळाचा गोडवा सण उत्सवात कडू होण्याचा धोका आहे.

ऐन सण उत्सवातच झळसण उत्सवाला सुरूवात होतानाच साखर आणि गुळाचे मोठे संकट उभे झाले आहे. यामुळे येणाºया काळात पोळा, गणपती, गौरीपूजन, दसरा आणि दिवाळीच्या सणात नागरिकांना महागाईचा सामना करावा लागणार आहे. यातून सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.

ऊसाचे केवळ १० टक्के क्षेत्रयावर्षी मराठवाड्यात पाऊस पडलाच नाही. यामुळे या पट्ट्यातील ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात घटली आहे. सध्या १० टक्के क्षेत्रातच ही लागवड नोंदविली गेली आहे. ९० टक्के क्षेत्र इतर पिकाच्या लागवडीखाली आले आहे. यामुळे येणाºया काळात उत्पादनावर परिणाम होणार आहे.पूरपरिस्थितीमुळे साखरेचा कोटा घटला. परंतु यावर्षी ऊसाची लागवड न झाल्याने पुढच्या वर्षी आणखी गंभीर स्थिती निर्माण होण्याची व दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.- दत्तात्रय गायकवाड, उपायुक्त (साखर), पुणेपुरामुळे साखर उत्पादक जिल्ह्यात ४० टक्के साखरेचे नुकसान झाले आहे. यावेळी १९ लाख क्विंटल साखर पाठविण्यात आली. यामध्ये दोन लाख क्विंटलची तफावत आहे. यामुळे दीड वर्षांपासून स्थिर असलेली साखर क्विंटलमागे २०० रुपयांनी वाढली आहे.- रोहित सिंघानिया, साखरेचे ठोक विक्रेता, यवतमाळ

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने