शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
4
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
6
यशस्वी जैस्वालने पुन्हा घातला घोळ! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
7
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
8
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
9
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
10
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
11
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
12
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
13
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
14
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
15
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
16
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
17
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
18
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
19
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
20
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  

पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने विदर्भातील उसावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 12:23 IST

विदर्भात उसाचे वाढलेले क्षेत्र पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी मोठा दिलासा देणारे आहे. तथापि आवश्यक तेवढा ऊस या भागातून जाणार नसल्याने कारखान्यांसाठी धोक्याची घंटा आहे.

ठळक मुद्देटंचाईची चिन्हे लागवड घटल्याने उद्योग संकटात

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पश्चिम महाराष्ट्रात उसाचे लागवड क्षेत्र ९० टक्केपर्यंत खाली आले आहे. याचा परिणाम या भागातील साखर कारखान्यावर होत आहे. मात्र विदर्भात उसाचे वाढलेले क्षेत्र पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी मोठा दिलासा देणारे आहे. तथापि आवश्यक तेवढा ऊस या भागातून जाणार नसल्याने कारखान्यांसाठी धोक्याची घंटा आहे.एकेकाळी विदर्भातील साखर कारखाने पश्चिम महाराष्ट्रातील उसाच्या भरवशावर चालत होते. आता विरोधाभासी चित्र आहे. आता कारखान्यांची गर्दी असलेल्या भागानेच ऊसाच्या लागवडीकडे पाठ फिरविली आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील ऊसाचे आज क्षेत्र ९० टक्के घटले आहे. विदर्भातील उसही पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांची आवश्यक तेवढी गरज भागवू शकणार नाही. या कारणांमुळे ६० टक्के कारखाने बंद पडण्याचा धोका आहे.विदर्भातील ऊस लागवडीने आज औरंगाबाद विभागालाही मागे टाकले आहे. विदर्भात सहा हजार ३२७ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. औरंगाबाद विभागात ६९ हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लागवडीचे नियोजन होते. प्रत्यक्षात सहा हजार हेक्टरातच लागवड थांबली. नियोजनाच्या केवळ १० टक्के क्षेत्रातच ही लागवड झाली आहे.कोल्हापूर विभागात दोन लाख ७२ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवडीचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात लागवड क्षेत्र ३१ हजार हेक्टर आहे. यातही पूर परिस्थितीने ८० टक्के क्षेत्र बाधित झाले आहे. यामुळे कोल्हापुरातून कारखान्यांना ऊस मिळणार नाही. पुणे विभागात तीन लाख ७३ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड होते. आज प्रत्यक्षात ३५ हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लावला गेला. नाशिक विभागात २५ हजार हेक्टर, तर कोकणात २८५ हेक्टरवर उसाचे पीक घेण्यात आले आहे.संपूर्ण राज्यात नऊ लाख चार हजार हेक्टरवर ऊसाची लागवड होते. यावर्षी एक लाख चार हजार हेक्टर क्षेत्रातच ऊस उभा आहे. हे क्षेत्र निर्धारित क्षेत्रापेक्षा ९० टक्क्यांने कमी आहे. दहा टक्के उसावर कारखाने चालविण्याची कसरत करावी लागणार आहे.यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रयवतमाळ जिल्ह्यात चार हजार २४२ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. नागपुरात १५४४ हेक्टर क्षेत्रात ऊस लावण्यात आला. बुलडाणा, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीतही ऊस उत्पादकांची संख्या वाढली आहे.धान पट्ट्यातही ऊसउसाला अधिक पाण्याची गरज आहे. यामुळे शेतकऱ्यांनी धान उत्पादक पट्ट्यातही ऊस लागवडीचा प्रयोग करण्यास प्रारंभ केला आहे. याचे मोठे बदल पाहायला मिळत आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र पाणी टंचाईने उसाची लागवड घटली आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने