शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

आयुर्वेद पदव्युत्तर प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांना आता गुजरात, मध्य प्रदेशात जावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 07:00 IST

Yawatmal News आयुर्वेद पदव्युत्तर (पीजी) प्रवेशाकरिता घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर राज्याची सीमा ओलांडण्याची वेळ आली आहे.

विलास गावंडे

यवतमाळ : आयुर्वेद पदव्युत्तर (पीजी) प्रवेशाकरिता घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर राज्याची सीमा ओलांडण्याची वेळ आली आहे. त्यातही ‘रात्र थोडी आणि साेंग फार’ अशी परिस्थिती असल्याने या परीक्षेपासून वंचित तर राहावे लागणार नाही ना, अशी भीती विद्यार्थी व पालकांमध्ये निर्माण झाली आहे. अवघे दोन दिवस हाती असल्याने प्रामुख्याने विदर्भातील विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. (Students will now have to go to Gujarat, Madhya Pradesh for postgraduate admission in Ayurveda)

आयुष मंत्रालय आणि नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसीनच्या वतीने (एनसीआयएसएम) अखिल भारतीय स्तरावर ही परीक्षा १८ सप्टेंबर रोजी घेण्यात येत आहे. याकरिता नोंदणी केलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातीलच चार केंद्रे निवडली होती. या विद्यार्थ्यांना दोन दिवसांपूर्वी परीक्षेचे हॉल तिकीट प्राप्त झाले. त्यातील केंद्र पाहून त्यांना धक्का बसला.

नागपूर, मुंबई, पुणे, अकोला, चंद्रपूर, नाशिक, कोल्हापूर, आदी ठिकाणांपैकी कुठलेही चार केंद्रे निवडलेली असताना काही विद्यार्थ्यांना गुजरात, मध्य प्रदेश राज्यांतील परीक्षा केंद्र मिळाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून दहा हजारांवर विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. यातील तीन हजारांहून अधिक, प्रामुख्याने विदर्भ आणि मुंबई भागातील विद्यार्थ्यांना अन्य राज्यांतील केंद्र देण्यात आले आहे.

परीक्षेसाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. इतक्या कमी कालावधीत परीक्षा केंद्राच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. रेल्वेचे आरक्षण मिळविणे किंवा इतर साधनांद्वारे पोहोचण्यासाठी अवधी लागणार आहे. यात त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागणार आहे. आर्थिक भुर्दंड बसणार आहे. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्राचा पर्याय दिला असताना इतर राज्यांतील परीक्षा केंद्र का, असा या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. दरम्यान, या संदर्भात नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने परीक्षा घेत असलेल्या एजन्सीकडे पत्रव्यवहार केला आहे. इतर राज्यांतील केंद्र मिळालेल्या विद्यार्थ्यांना सोयीचे असलेले महाराष्ट्रातील केंद्र द्यावे, अशी मागणी केली आहे.

विदर्भात आठ महाविद्यालये

पदव्युत्तर शिक्षण देणारी विदर्भात आठ आयुर्वेद महाविद्यालये आहेत. यामध्ये एक शासकीय, चार अनुदानित आणि तीन खासगी महाविद्यालयांचा समावेश आहे. आयुर्वेद शाखेतील विविध विषयांचे शिक्षण या महाविद्यालयांत दिले जाते.

विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र निवडले असताना अन्य राज्यांतील केंद्र देण्यात आले. यामुळे त्यांना आजच्या कोविड स्थितीत अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी निवडलेलेच परीक्षा केंद्र देण्यात यावे. शिवाय केंद्र बदलाची चौकशी करावी.

- डॉ. मोहन येंडे, महाराष्ट्र संघटक, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र