शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

आयुर्वेद पदव्युत्तर प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांना आता गुजरात, मध्य प्रदेशात जावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 07:00 IST

Yawatmal News आयुर्वेद पदव्युत्तर (पीजी) प्रवेशाकरिता घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर राज्याची सीमा ओलांडण्याची वेळ आली आहे.

विलास गावंडे

यवतमाळ : आयुर्वेद पदव्युत्तर (पीजी) प्रवेशाकरिता घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर राज्याची सीमा ओलांडण्याची वेळ आली आहे. त्यातही ‘रात्र थोडी आणि साेंग फार’ अशी परिस्थिती असल्याने या परीक्षेपासून वंचित तर राहावे लागणार नाही ना, अशी भीती विद्यार्थी व पालकांमध्ये निर्माण झाली आहे. अवघे दोन दिवस हाती असल्याने प्रामुख्याने विदर्भातील विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. (Students will now have to go to Gujarat, Madhya Pradesh for postgraduate admission in Ayurveda)

आयुष मंत्रालय आणि नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसीनच्या वतीने (एनसीआयएसएम) अखिल भारतीय स्तरावर ही परीक्षा १८ सप्टेंबर रोजी घेण्यात येत आहे. याकरिता नोंदणी केलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातीलच चार केंद्रे निवडली होती. या विद्यार्थ्यांना दोन दिवसांपूर्वी परीक्षेचे हॉल तिकीट प्राप्त झाले. त्यातील केंद्र पाहून त्यांना धक्का बसला.

नागपूर, मुंबई, पुणे, अकोला, चंद्रपूर, नाशिक, कोल्हापूर, आदी ठिकाणांपैकी कुठलेही चार केंद्रे निवडलेली असताना काही विद्यार्थ्यांना गुजरात, मध्य प्रदेश राज्यांतील परीक्षा केंद्र मिळाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून दहा हजारांवर विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. यातील तीन हजारांहून अधिक, प्रामुख्याने विदर्भ आणि मुंबई भागातील विद्यार्थ्यांना अन्य राज्यांतील केंद्र देण्यात आले आहे.

परीक्षेसाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. इतक्या कमी कालावधीत परीक्षा केंद्राच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. रेल्वेचे आरक्षण मिळविणे किंवा इतर साधनांद्वारे पोहोचण्यासाठी अवधी लागणार आहे. यात त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागणार आहे. आर्थिक भुर्दंड बसणार आहे. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्राचा पर्याय दिला असताना इतर राज्यांतील परीक्षा केंद्र का, असा या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. दरम्यान, या संदर्भात नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने परीक्षा घेत असलेल्या एजन्सीकडे पत्रव्यवहार केला आहे. इतर राज्यांतील केंद्र मिळालेल्या विद्यार्थ्यांना सोयीचे असलेले महाराष्ट्रातील केंद्र द्यावे, अशी मागणी केली आहे.

विदर्भात आठ महाविद्यालये

पदव्युत्तर शिक्षण देणारी विदर्भात आठ आयुर्वेद महाविद्यालये आहेत. यामध्ये एक शासकीय, चार अनुदानित आणि तीन खासगी महाविद्यालयांचा समावेश आहे. आयुर्वेद शाखेतील विविध विषयांचे शिक्षण या महाविद्यालयांत दिले जाते.

विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र निवडले असताना अन्य राज्यांतील केंद्र देण्यात आले. यामुळे त्यांना आजच्या कोविड स्थितीत अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी निवडलेलेच परीक्षा केंद्र देण्यात यावे. शिवाय केंद्र बदलाची चौकशी करावी.

- डॉ. मोहन येंडे, महाराष्ट्र संघटक, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र