शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
2
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
3
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
4
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
5
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
6
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
7
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
8
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
9
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
10
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
11
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
12
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
13
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
14
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
15
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
16
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
17
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
18
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
19
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
20
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली

विद्यार्थ्यांचा एसटीच्या टपावरून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 21:44 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाच्या अनियमित बसफेऱ्यांमुळे त्रास सहन करावा लागतो. शाळा, महाविद्यालयासाठी पासेस दिल्या जातात. मात्र बसेस कधीच वेळेत येत नाही.

ठळक मुद्देशैक्षणिक भवितव्य धोक्यात : महामंडळाच्या कारभारापुढे विद्यार्थी हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाच्या अनियमित बसफेऱ्यांमुळे त्रास सहन करावा लागतो. शाळा, महाविद्यालयासाठी पासेस दिल्या जातात. मात्र बसेस कधीच वेळेत येत नाही. दैनंदिन वेळापत्रक पाळले जात नसल्याने विद्यार्थ्यांना चक्क एसटीच्या टपावर बसून प्रवास करावा लागतो.मंगळवारी सकाळी ११.३० वाजता दारव्हा येथून निघालेल्या एसटी बसच्या टपावरून तिवसा येथील विद्यार्थ्यांनी प्रवास केला. शाळा, महाविद्यालयात येण्यासाठी बसफेरी वेळेवर न आल्याने विद्यार्थ्यांना हा जीवघेणा पवित्रा घ्यावा लागला. शाळा सुटल्यानंतरही विद्यार्थी कित्येक तास बसस्थानकावरच असतात. सायंकाळची बसही कधीच वेळेवर येत नाही. मंगळवारीसुद्धा बसस्थानकावर घाटंजी मार्गावरील एसटी बसची वाट पाहात विद्यार्थिनी बसून होत्या. सायंकाळचे ७ वाजले तरी ५ वाजता येणारी बस लागलीच नाही. यामुळे विद्यार्थिनींचाही संयम सुटला. त्यांनी याची विचारणा स्थानिक व्यवस्थापकाकडे केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. बसफेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांना कधीच वेळेवर शाळा, महाविद्यालयात जाता येत नाही. किमान दोन ते तीन तासिका नियमित चुकतात. यामुळे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आले आहे.एसटीच्या टपावरून प्रवास करत विद्यार्थी आल्याची माहिती मिळताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बसस्थानकात धाव घेतली. तेथील अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचे काम परिवहनमधील काही अधिकारी करतात, सुरक्षा रक्षकांना समोर करून विद्यार्थ्यांची बाजूही ऐकून घेतली जात नाही.परिवहन महामंडळाला चिंता नाहीज्या मार्गावर विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणाहून शाळा, महाविद्यालयाच्या वेळेत जाणीवपूर्वक एक्सप्रेस गाड्या सोडल्या जातात. या गाड्यांना थांबा नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण होते. बहुतांश मार्गावरून सर्वसाधारण बसफेºया बंदच झाल्या आहेत. जलद गाड्यांचे थांबे असल्याचे सांगितले जाते मात्र चालक व वाहक बस थांबविण्यास तयार होत नाही. टप्पा नसल्याचे सांगून बस सरळ नेली जाते. अनेकदा विद्यार्थ्यांना परत जातानाही याच समस्यांना सामोरे जावे लागते. अर्धाअधिक वेळ त्यांचा बसस्थानकावरच निघून जातो.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळStudentविद्यार्थी