शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचा एसटीच्या टपावरून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 21:44 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाच्या अनियमित बसफेऱ्यांमुळे त्रास सहन करावा लागतो. शाळा, महाविद्यालयासाठी पासेस दिल्या जातात. मात्र बसेस कधीच वेळेत येत नाही.

ठळक मुद्देशैक्षणिक भवितव्य धोक्यात : महामंडळाच्या कारभारापुढे विद्यार्थी हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाच्या अनियमित बसफेऱ्यांमुळे त्रास सहन करावा लागतो. शाळा, महाविद्यालयासाठी पासेस दिल्या जातात. मात्र बसेस कधीच वेळेत येत नाही. दैनंदिन वेळापत्रक पाळले जात नसल्याने विद्यार्थ्यांना चक्क एसटीच्या टपावर बसून प्रवास करावा लागतो.मंगळवारी सकाळी ११.३० वाजता दारव्हा येथून निघालेल्या एसटी बसच्या टपावरून तिवसा येथील विद्यार्थ्यांनी प्रवास केला. शाळा, महाविद्यालयात येण्यासाठी बसफेरी वेळेवर न आल्याने विद्यार्थ्यांना हा जीवघेणा पवित्रा घ्यावा लागला. शाळा सुटल्यानंतरही विद्यार्थी कित्येक तास बसस्थानकावरच असतात. सायंकाळची बसही कधीच वेळेवर येत नाही. मंगळवारीसुद्धा बसस्थानकावर घाटंजी मार्गावरील एसटी बसची वाट पाहात विद्यार्थिनी बसून होत्या. सायंकाळचे ७ वाजले तरी ५ वाजता येणारी बस लागलीच नाही. यामुळे विद्यार्थिनींचाही संयम सुटला. त्यांनी याची विचारणा स्थानिक व्यवस्थापकाकडे केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. बसफेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांना कधीच वेळेवर शाळा, महाविद्यालयात जाता येत नाही. किमान दोन ते तीन तासिका नियमित चुकतात. यामुळे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आले आहे.एसटीच्या टपावरून प्रवास करत विद्यार्थी आल्याची माहिती मिळताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बसस्थानकात धाव घेतली. तेथील अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचे काम परिवहनमधील काही अधिकारी करतात, सुरक्षा रक्षकांना समोर करून विद्यार्थ्यांची बाजूही ऐकून घेतली जात नाही.परिवहन महामंडळाला चिंता नाहीज्या मार्गावर विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणाहून शाळा, महाविद्यालयाच्या वेळेत जाणीवपूर्वक एक्सप्रेस गाड्या सोडल्या जातात. या गाड्यांना थांबा नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण होते. बहुतांश मार्गावरून सर्वसाधारण बसफेºया बंदच झाल्या आहेत. जलद गाड्यांचे थांबे असल्याचे सांगितले जाते मात्र चालक व वाहक बस थांबविण्यास तयार होत नाही. टप्पा नसल्याचे सांगून बस सरळ नेली जाते. अनेकदा विद्यार्थ्यांना परत जातानाही याच समस्यांना सामोरे जावे लागते. अर्धाअधिक वेळ त्यांचा बसस्थानकावरच निघून जातो.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळStudentविद्यार्थी