शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

पांढरकवडा आदिवासी प्रकल्पातील विद्यार्थी माघारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 15:54 IST

आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. मात्र त्यानंतरही जिल्ह्यातील पांढरकवडा आदिवासी विकास प्रकल्प शैक्षणिक गुणवत्तेत माघारल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देशैक्षणिक गुणवत्ता ऐरणीवरअभियांत्रिकी, वैद्यकीयसाठी एकही विद्यार्थी पात्र नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. मात्र त्यानंतरही जिल्ह्यातील पांढरकवडा आदिवासी विकास प्रकल्प शैक्षणिक गुणवत्तेत माघारल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.राज्यातील शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांसाठी खास ‘स्क्रिनींग टेस्ट’ घेण्यात आली. यातून ५० विद्यार्थी ‘आयआयटी’साठी तर ५० वैद्यकीय शिक्षणासाठी निवडले जाणार आहे. ‘पेस’ या संस्थेला महाराष्ट्र शासनाने या परीक्षेचा कंत्राट दिला आहे. २८ जून रोजी राज्यभर ही परीक्षा घेतली गेली. यवतमाळ जिल्ह्यात शासकीय आदिवासी आमश्रशाळा चिचघाट हे परीक्षा केंद्र होते. या परीक्षेचा नुकताच निकाल लागला. त्यात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ३१३ तर अभियांत्रिकीसाठी ३०४ विद्यार्थी राज्यभरातून पात्र ठरले. या विद्यार्थ्यांमधून आता पुन्हा मेरिटवर छाननी करून वैद्यकीय व अभियांत्रिकीसाठी प्रत्येकी ५० विद्यार्थी निवडले जाणार आहेत. परंतु या पात्र विद्यार्थ्यांमध्ये जिल्ह्यातील पांढरकवडा आदिवासी प्रकल्पाचा एकही विद्यार्थी स्थान मिळवू शकलेला नाही. यावरून या प्रकल्पातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता कशी असेल याची कल्पना येते. या उलट राज्याच्या बहुतांश प्रकल्पातील विद्यार्थी ‘पेस’ने घेतलेल्या परीक्षेत पात्र ठरले आहे. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील पुसद आदिवासी विकास प्रकल्पाच्या विद्यार्थ्यांनीही यात स्थान मिळविले.‘आयएएस’ पीओ असलेल्या पांढरकवडा प्रकल्पाची शैक्षणिक प्रगती मात्र खुंटल्याचे दिसते. पांढरकवडा प्रकल्प अधिकाऱ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेऊनही दहावीचा निकाल चांगला आला नाही. याच कारणावरून पांढरकवडा आदिवासी प्रकल्पातील ४० शिक्षकांवर कारवाईही केली गेली.विषय शिक्षकांकडून अल्प प्रतिसादपांढरकवडा प्रकल्प अधिकाऱ्याकडून शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातात. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांवर त्यांचा अधिक ‘फोकस’ असतो. परंतु त्यांना अधिनस्त आश्रमशाळांच्या अनेक विषय शिक्षकांकडून तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. ‘पीओं’कडून राबविले जाणारे उपक्रम या शिक्षकांना जाचक वाटतात. पीओंची विद्यार्थ्यांच्या मेरिटसाठी तळमळ असली तरी शिक्षक तेवढे परिश्रम घेत नसल्याचे विसंगत चित्र आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी