शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

पांढरकवडा आदिवासी प्रकल्पातील विद्यार्थी माघारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 15:54 IST

आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. मात्र त्यानंतरही जिल्ह्यातील पांढरकवडा आदिवासी विकास प्रकल्प शैक्षणिक गुणवत्तेत माघारल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देशैक्षणिक गुणवत्ता ऐरणीवरअभियांत्रिकी, वैद्यकीयसाठी एकही विद्यार्थी पात्र नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. मात्र त्यानंतरही जिल्ह्यातील पांढरकवडा आदिवासी विकास प्रकल्प शैक्षणिक गुणवत्तेत माघारल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.राज्यातील शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांसाठी खास ‘स्क्रिनींग टेस्ट’ घेण्यात आली. यातून ५० विद्यार्थी ‘आयआयटी’साठी तर ५० वैद्यकीय शिक्षणासाठी निवडले जाणार आहे. ‘पेस’ या संस्थेला महाराष्ट्र शासनाने या परीक्षेचा कंत्राट दिला आहे. २८ जून रोजी राज्यभर ही परीक्षा घेतली गेली. यवतमाळ जिल्ह्यात शासकीय आदिवासी आमश्रशाळा चिचघाट हे परीक्षा केंद्र होते. या परीक्षेचा नुकताच निकाल लागला. त्यात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ३१३ तर अभियांत्रिकीसाठी ३०४ विद्यार्थी राज्यभरातून पात्र ठरले. या विद्यार्थ्यांमधून आता पुन्हा मेरिटवर छाननी करून वैद्यकीय व अभियांत्रिकीसाठी प्रत्येकी ५० विद्यार्थी निवडले जाणार आहेत. परंतु या पात्र विद्यार्थ्यांमध्ये जिल्ह्यातील पांढरकवडा आदिवासी प्रकल्पाचा एकही विद्यार्थी स्थान मिळवू शकलेला नाही. यावरून या प्रकल्पातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता कशी असेल याची कल्पना येते. या उलट राज्याच्या बहुतांश प्रकल्पातील विद्यार्थी ‘पेस’ने घेतलेल्या परीक्षेत पात्र ठरले आहे. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील पुसद आदिवासी विकास प्रकल्पाच्या विद्यार्थ्यांनीही यात स्थान मिळविले.‘आयएएस’ पीओ असलेल्या पांढरकवडा प्रकल्पाची शैक्षणिक प्रगती मात्र खुंटल्याचे दिसते. पांढरकवडा प्रकल्प अधिकाऱ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेऊनही दहावीचा निकाल चांगला आला नाही. याच कारणावरून पांढरकवडा आदिवासी प्रकल्पातील ४० शिक्षकांवर कारवाईही केली गेली.विषय शिक्षकांकडून अल्प प्रतिसादपांढरकवडा प्रकल्प अधिकाऱ्याकडून शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातात. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांवर त्यांचा अधिक ‘फोकस’ असतो. परंतु त्यांना अधिनस्त आश्रमशाळांच्या अनेक विषय शिक्षकांकडून तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. ‘पीओं’कडून राबविले जाणारे उपक्रम या शिक्षकांना जाचक वाटतात. पीओंची विद्यार्थ्यांच्या मेरिटसाठी तळमळ असली तरी शिक्षक तेवढे परिश्रम घेत नसल्याचे विसंगत चित्र आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी