शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या अन्नत्यागाने वसतिगृहाचे धिंडवडे

By admin | Updated: December 7, 2015 06:13 IST

येथील शासकीय मागासवर्गीय वसतिगृहामध्ये जेवण, निवास, शैक्षणिक साहित्य यासह अनेक मागण्या घेऊन

उमरखेड : येथील शासकीय मागासवर्गीय वसतिगृहामध्ये जेवण, निवास, शैक्षणिक साहित्य यासह अनेक मागण्या घेऊन वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. उमरखेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात एकूण ७५ विद्यार्थी आहेत. त्यांना झोपण्यासाठी गाद्या नाहीत. यावर्षी शैक्षणिक साहित्य मिळालेले नाही. त्यांना रोज निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत आहे, रात्री विद्युत पुरवठा खंडीत होतो, त्यामुळे विद्यार्थ्यांना अंधारातच राहावे लागत आहे. अंधारामुळे अभ्यास करणे कठीण झाले आहे. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणीही मिळत नाही. संगणकसंच पूर्णपणे बंद आहेत. शौचालय ना दुरूस्त आहेत. यासह अनेक समस्यांचा डोंगर वसतिगृहातील विद्यार्थ्यांपुढे उभा आहे. या संदर्भात त्यांनी अनेक वेळा लेखी निवेदने दिली, परंतु त्यांच्या मागण्यांकडे समाज कल्याण विभागाकडून सतत दुर्लक्ष करण्यात येत आहे. शेवटी रविवारी सकाळपासून वसतिगृहाच्या सर्व विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या अन्नत्याग आंदोलनाची माहिती मिळताच अनिल काळबांडे, सुधाकर लोमटे, प्रेम हनवते, रवी रुडे यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला. परंतु विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले नाही. ज्ञानेश्वर साकळे, अंकुश गायकवाड, मंगेश शिरपुडवार, कपिल वाघमारे, अभय खानझोडे, सुधीर जाधव, वैभव आडे, चंद्रकांत पायकोटे, प्रकाश जोगदंड, आशीष मोरे, कपिल भुसाळे, अतुल पवार, राहुल चिरंगे यासह वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन सुरू केले. वसतिगृहातील खराब गाद्या बाहेर आणून टाकल्या. त्याचबरोबर मिळत असलेली खराब फळे विद्यार्थ्यांनी बाहेर आणून फेकूण दिली. वसतिगृह अधीक्षकांसह जेवणाच्या कंत्राटदाराविरुद्ध विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करीत आंदोलन सुरू ठेवले. या सर्व प्रकाराची माहिती मिळताच भीम टायगर संघटनेचे अध्यक्ष शंकर शेळके यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतील. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून समस्या प्रलंबित असल्यामुळे आंदोलन मागे घेण्यास विद्यार्थ्यांनी नकार दिला. त्यानंतर आमदार नजरधने यांनी विद्यार्थ्यांसोबत बसून, समस्या ऐकून घेतल्या. त्यावर तोडगा काढण्यासाठी समाज कल्याण अधिकाऱ्यांसोबत भ्रमणध्वनीवर संवाद साधला. समस्यांचा तत्काळ निपटारा करण्याच्या सूचना दिल्या. परंतु विद्यार्थी मात्र आक्रमक भूमिकेत होते. यावेळी आमदार राजेंद्र नजरधने, भाजपा शहराध्यक्ष नितीन भुतडा, इरफान कुंदन, अनिल शेखे, नदीम नवाब, आदेश जैन यासह समाज कल्याण विभागाचे जे.बी. धोटे, आर.बी. राऊत, पराग केळकर, एम.एम. मेंढे इत्यादी उपस्थित होते. परंतु वृत्त लिहीपर्यंत विद्यार्थ्यांच्या समस्येवर तोडगा निघाला नव्हता. (शहर प्रतिनिधी)आमदारांनी धरले धारेवर४शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनामुळे आमदार राजेंद्र नजरधने यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. ज्याठिकाणी वसतिगृहातील मुले राहतात, जेवतात त्याठिकाणपेक्षा गुरांचा गोठा चांगला आहे. विद्यार्थ्यांना जेवणाच्या कंत्राटदाराकडून धमकावले जाणे ही बाब गंभीर आहे. उमरखेडच्या शासकीय वसतिगृहातील समस्या तत्काळ निकाली काढा, अन्यथा मला कठोर कारवाई करावी लागेल असे आमदारांनी समाज कल्याण अधिकारी व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना खडसावले. विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली४वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सकाळपासूनच बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले. त्यामुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली. तीन विद्यार्थी चक्कर येऊन पडले. अभय खानझोडे (१६), भावराव मिटकर (१६), कपिल भुसारे (१८) या तिघांना तत्काळ उमरखेड शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे.