शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

विद्यार्थ्यांच्या अन्नत्यागाने वसतिगृहाचे धिंडवडे

By admin | Updated: December 7, 2015 06:13 IST

येथील शासकीय मागासवर्गीय वसतिगृहामध्ये जेवण, निवास, शैक्षणिक साहित्य यासह अनेक मागण्या घेऊन

उमरखेड : येथील शासकीय मागासवर्गीय वसतिगृहामध्ये जेवण, निवास, शैक्षणिक साहित्य यासह अनेक मागण्या घेऊन वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. उमरखेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात एकूण ७५ विद्यार्थी आहेत. त्यांना झोपण्यासाठी गाद्या नाहीत. यावर्षी शैक्षणिक साहित्य मिळालेले नाही. त्यांना रोज निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत आहे, रात्री विद्युत पुरवठा खंडीत होतो, त्यामुळे विद्यार्थ्यांना अंधारातच राहावे लागत आहे. अंधारामुळे अभ्यास करणे कठीण झाले आहे. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणीही मिळत नाही. संगणकसंच पूर्णपणे बंद आहेत. शौचालय ना दुरूस्त आहेत. यासह अनेक समस्यांचा डोंगर वसतिगृहातील विद्यार्थ्यांपुढे उभा आहे. या संदर्भात त्यांनी अनेक वेळा लेखी निवेदने दिली, परंतु त्यांच्या मागण्यांकडे समाज कल्याण विभागाकडून सतत दुर्लक्ष करण्यात येत आहे. शेवटी रविवारी सकाळपासून वसतिगृहाच्या सर्व विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या अन्नत्याग आंदोलनाची माहिती मिळताच अनिल काळबांडे, सुधाकर लोमटे, प्रेम हनवते, रवी रुडे यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला. परंतु विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले नाही. ज्ञानेश्वर साकळे, अंकुश गायकवाड, मंगेश शिरपुडवार, कपिल वाघमारे, अभय खानझोडे, सुधीर जाधव, वैभव आडे, चंद्रकांत पायकोटे, प्रकाश जोगदंड, आशीष मोरे, कपिल भुसाळे, अतुल पवार, राहुल चिरंगे यासह वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन सुरू केले. वसतिगृहातील खराब गाद्या बाहेर आणून टाकल्या. त्याचबरोबर मिळत असलेली खराब फळे विद्यार्थ्यांनी बाहेर आणून फेकूण दिली. वसतिगृह अधीक्षकांसह जेवणाच्या कंत्राटदाराविरुद्ध विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करीत आंदोलन सुरू ठेवले. या सर्व प्रकाराची माहिती मिळताच भीम टायगर संघटनेचे अध्यक्ष शंकर शेळके यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतील. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून समस्या प्रलंबित असल्यामुळे आंदोलन मागे घेण्यास विद्यार्थ्यांनी नकार दिला. त्यानंतर आमदार नजरधने यांनी विद्यार्थ्यांसोबत बसून, समस्या ऐकून घेतल्या. त्यावर तोडगा काढण्यासाठी समाज कल्याण अधिकाऱ्यांसोबत भ्रमणध्वनीवर संवाद साधला. समस्यांचा तत्काळ निपटारा करण्याच्या सूचना दिल्या. परंतु विद्यार्थी मात्र आक्रमक भूमिकेत होते. यावेळी आमदार राजेंद्र नजरधने, भाजपा शहराध्यक्ष नितीन भुतडा, इरफान कुंदन, अनिल शेखे, नदीम नवाब, आदेश जैन यासह समाज कल्याण विभागाचे जे.बी. धोटे, आर.बी. राऊत, पराग केळकर, एम.एम. मेंढे इत्यादी उपस्थित होते. परंतु वृत्त लिहीपर्यंत विद्यार्थ्यांच्या समस्येवर तोडगा निघाला नव्हता. (शहर प्रतिनिधी)आमदारांनी धरले धारेवर४शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनामुळे आमदार राजेंद्र नजरधने यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. ज्याठिकाणी वसतिगृहातील मुले राहतात, जेवतात त्याठिकाणपेक्षा गुरांचा गोठा चांगला आहे. विद्यार्थ्यांना जेवणाच्या कंत्राटदाराकडून धमकावले जाणे ही बाब गंभीर आहे. उमरखेडच्या शासकीय वसतिगृहातील समस्या तत्काळ निकाली काढा, अन्यथा मला कठोर कारवाई करावी लागेल असे आमदारांनी समाज कल्याण अधिकारी व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना खडसावले. विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली४वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सकाळपासूनच बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले. त्यामुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली. तीन विद्यार्थी चक्कर येऊन पडले. अभय खानझोडे (१६), भावराव मिटकर (१६), कपिल भुसारे (१८) या तिघांना तत्काळ उमरखेड शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे.