शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

विद्यार्थ्यांनी अनुभवले ग्रामीण जीवन

By admin | Updated: September 15, 2015 05:19 IST

आधुनिक काळात शहरी मुलांची मातीशी नाळ तुटत चालली आहे. त्यामुळे मूल्य शिक्षणाचाही अपेक्षित परिणाम

यवतमाळ : आधुनिक काळात शहरी मुलांची मातीशी नाळ तुटत चालली आहे. त्यामुळे मूल्य शिक्षणाचाही अपेक्षित परिणाम साधला जात नाही. हा धोका ओळखून यवतमाळ पब्लिक स्कूलने विद्यार्थ्यांना थेट ग्रामीण जीवनशैलीची ओळख करून दिली. बाभूळगाव तालुक्यातील महमदपूर या आदर्श गावाला भेट देण्यात आली. शैक्षणिक उपक्रमाचा भाग म्हणून या शाळेतर्फे विविध कार्यक्रम घेतले जातात. याचाच एक भाग म्हणून पॅरेन्टस् कौन्सिलतर्फे वर्ग तीन आणि सहाच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. महमदपूर येथे सुभाषचंद्र आचलिया यांनी या गावाविषयीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. हे गाव विविध दहा पुरस्कारांनी सन्मानित आहे, ही गौरवाची बाब सांगण्यात आली. ऊस, संत्रा, केळी, सोयाबीन, कापूस आदी पिकांची शेती दाखवून उत्पादन कसे घेतले जाते, त्याची विक्री कोठे केली जाते, शेतकऱ्यांचा यात किती फायदा असतो आदी बाबी सांगण्यात आल्या. शिवाय ग्रामीण भागातील लोकांचा व्यवसाय, त्यांच्या उदरनिर्वाहांची साधने या विषयीची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी दहीहांडीचा कार्यक्रमही या निमित्त घेण्यात आला. यात त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आनंद लुटला. या उपक्रमाचे आयोजन आणि नियोजन शाळेचे समन्वयक यश बोरुंदिया यांचे होते. पॅरेन्टस् कौन्सिलच्या अध्यक्ष सुरूची खरे, सहसचिव साक्षी सिंधी, सदस्य बुरटकर यांचे मोठे योगदान या उपक्रमासाठी लाभले. शाळेच्या छाया गुजर, स्मिता मिश्रा, मंजू साहू, अर्चना निनगुरकर, पूनम देशमुख, विद्या राजगिरे, अमोल क्षीरसागर यांचेही त्यांना सहकार्य लाभले. या उपक्रमाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य जेकब दास यांनी आयोजकांचे कौतुक केले. (वार्ताहर)