शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
5
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
8
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
9
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
10
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
11
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
12
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
13
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
14
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
15
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
16
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
17
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
18
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
19
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

२५ वर्षानंतरच्या भेटीने भारावले विद्यार्थी अन् शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 9:27 PM

विविध क्षेत्रात, विविध हुद्द्यांवर आणि विविध शहरांमध्ये कार्यरत असतानाही ज्या कॉलेजने आपल्या आयुष्याची दिशा ठरविली त्या कॉलेजचे दिवस विसरणे शक्यच नसते.

ठळक मुद्देस्नेहमिलन सोहळा : देशाच्या कानाकोपºयातून जमले अमोलकचंद महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विविध क्षेत्रात, विविध हुद्द्यांवर आणि विविध शहरांमध्ये कार्यरत असतानाही ज्या कॉलेजने आपल्या आयुष्याची दिशा ठरविली त्या कॉलेजचे दिवस विसरणे शक्यच नसते. याचाच प्रत्यय येथील अमोलकचंद महाविद्यालयाच्या १९९१-९२ च्या अकरावी-बारावीच्या (विज्ञान) तुकडीने आयोजित केलेल्या स्नेहमिलन सोहळ्याच्या निमित्ताने सर्वांना आला. तब्बल २५ वर्षानंतर एकमेकांना भेटलेले हे वर्गमित्र आणि त्यावेळचे गुरूजन या सोहळ्याने चांगलेच भारावून गेले.अमोलकचंद महाविद्यालयाच्या वसंतराव नाईक सभागृहात रंगलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर.ए. मिश्रा होते. प्रमुख म्हणून उपप्राचार्य वानरे, प्रा.गोपीराज पळशीकर, प्रा. ज्ञानेश्वर बोरखडे, प्रा. एस.पी. चौथाईवाले, सी.बी.देशपांडे, प्रा. देशपांडे, प्रा. नागपुरे, प्रा. सिंग, प्रा.फ्लोरा सिंग, प्रा.दुर्गे, प्रा.गुजर, प्रा.व्ही.सी.जाधव, प्रा. कावळे, प्रा.खोडे, प्रा. राजेश कळसकर उपस्थित होते.मुंबई-पुणे-नागपूरपासून तर देशातील विविध शहरांमध्ये कार्यरत असणारे जवळपास ४० माजी विद्यार्थी या सोहळ्यासाठी यवतमाळात दाखल झाले होते. महाविद्यालय सोडल्यानंतरच्या २५ वर्षात आपण कसे घडत गेलो, महाविद्यालयात असताना कोणाचे कसे मार्गदर्शन मिळाले हे या माजी विद्यार्थ्यांनी मुक्तकंठाने आपल्या मनोगतातून मांडले. दहावीपर्यंतच्या बंदिस्त वातावरणातून बाहेर येऊन महाविद्यालयीन जीवनाची सुरूवात करताना केलेल्या गमती-जमती, त्यावेळचे विविध प्रसंग तब्बल २५ वर्षानंतरही ताजेपणाने त्यांनी विषद केले. कॉलेज जीवनातील त्या आठवणींनी माजी विद्यार्थीच नाही तर तत्कालीन प्राध्यापकवृंदही भूतकाळात रममाण झाले होते. असा सोहळा गेल्या कित्येक वर्षात आपण अनुभवला नाही असे त्यांनी सांगितले.यावेळी उपस्थित प्राध्यापकवृंदांचा या माजी विद्यार्थ्यानी शाल-श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार केला. तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांनाही स्मृतिचिन्ह देऊन प्राध्यापकांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. संचालन प्रा.गाणार यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मनिष वाठ, जयेश सावला, राजा तुरक, प्रशांत गोडे आदी माजी विद्यार्थ्यांनी विशेष पुढाकार घेतला होता. या सोहळ्याला माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.