शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

दिग्रस तालुक्याला वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 21:34 IST

सतत दोन दिवस तालुक्यात वादळाने थैमान घातले. गुरूवार व शुक्रवारी वादळाने तडाखा दिला. या वादळात ग्रामीण भागासह शहरी भागात मोठे नुकसान झाले. वादळामुळे अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेले.

ठळक मुद्देमोठे नुकसान । पिंपळाचे झाड कोसळले, तीन बालके जखमी, वीजपुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : सतत दोन दिवस तालुक्यात वादळाने थैमान घातले. गुरूवार व शुक्रवारी वादळाने तडाखा दिला. या वादळात ग्रामीण भागासह शहरी भागात मोठे नुकसान झाले.वादळामुळे अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेले. येथील पशुवैद्यकीय कार्यालयाजवळील ताजनगरमधील जुने मोठे पिंपळाचे झाड मुळापासून उन्मळून पडले. हे झाड नासीर खान गफ्फार खान यांच्या घरावर कोसळले. यामुळे खान परिवार हादरून गेला. झाड घरावर कोसळल्याने ७ वर्षीय आनम फिरदोस, ५ वर्षीय नूरजहाँ आणि ६ वर्षीय सुलतान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. नासीर खान, समशादबी, आयेशा अंजुम, बिलाल हे किरकोळ जखमी झाले. मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. गंभीर जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. झाड घरावर पडल्याने घराच्या भिंती, टिनपत्रे व घरातील साहित्याचे प्रचंड नुकसान झाले.तालुक्यातील देऊरवाडी (पु.) येथील शारूक शे.महेमूद यांच्यासह ८ ते १० जणांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली. चिंचोली, कळसा, सावंगा बु, धानोरा, निंभा, विठोली, तुपटाकळी, कांदळी, महागाव, कलगाव, डेहणी, चिरकुटा, फुलवाडी, आरंभी, मोख, तिवरी, लाख रायाजी, साखरा, हरसूल, गांधीनगर, मांडवा, रोहणादेवी, आमला, खंडापूर, रामनगर, इसापूर, दत्तापूर, कोलुरा, साखरी, फेट्रीसह अनेक गावांत घरांवरील टिनपत्रे उडून गेली. अनेक झाडे कोसळली. विद्युत तारा तुटल्या. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता.येथील जुन्या बसस्थानकावरील मोठ्या पिंपळाच्या झाडाच्या फांद्या तुटल्या. दिनबाई विद्यालयातील निंबाच्या झाडाच्या फांद्या तुटल्या. दिवाणी न्यायालयातील निंब, डॉ.आंबेडकर पुतळा परिसरातील निंबाचे झाड उन्मळून पडले. तहसील व पंचायत समिती परिसरात झाडे तुटली. यामुणे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.महसूल प्रशासनाला पंचनाम्याचे आदेशतहसीलदार राजेश वझीरे यांनी वादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यासाठी महसूलचे खास पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक घटनास्थळी जाऊन पंचनामे करीत आहे. सर्व पंचनामे झाल्यानंतरच वादळाने झालेल्या नुकसानीचा खरा आकडा कळणार आहे. दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे दोन दिवस जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसामुळे मात्र नागरिकांना दिलासा मिळाला. तथापि रात्रभर वीज नसल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला.

टॅग्स :Rainपाऊस