शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

दिग्रस तालुक्याला वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 21:34 IST

सतत दोन दिवस तालुक्यात वादळाने थैमान घातले. गुरूवार व शुक्रवारी वादळाने तडाखा दिला. या वादळात ग्रामीण भागासह शहरी भागात मोठे नुकसान झाले. वादळामुळे अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेले.

ठळक मुद्देमोठे नुकसान । पिंपळाचे झाड कोसळले, तीन बालके जखमी, वीजपुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : सतत दोन दिवस तालुक्यात वादळाने थैमान घातले. गुरूवार व शुक्रवारी वादळाने तडाखा दिला. या वादळात ग्रामीण भागासह शहरी भागात मोठे नुकसान झाले.वादळामुळे अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेले. येथील पशुवैद्यकीय कार्यालयाजवळील ताजनगरमधील जुने मोठे पिंपळाचे झाड मुळापासून उन्मळून पडले. हे झाड नासीर खान गफ्फार खान यांच्या घरावर कोसळले. यामुळे खान परिवार हादरून गेला. झाड घरावर कोसळल्याने ७ वर्षीय आनम फिरदोस, ५ वर्षीय नूरजहाँ आणि ६ वर्षीय सुलतान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. नासीर खान, समशादबी, आयेशा अंजुम, बिलाल हे किरकोळ जखमी झाले. मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. गंभीर जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. झाड घरावर पडल्याने घराच्या भिंती, टिनपत्रे व घरातील साहित्याचे प्रचंड नुकसान झाले.तालुक्यातील देऊरवाडी (पु.) येथील शारूक शे.महेमूद यांच्यासह ८ ते १० जणांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली. चिंचोली, कळसा, सावंगा बु, धानोरा, निंभा, विठोली, तुपटाकळी, कांदळी, महागाव, कलगाव, डेहणी, चिरकुटा, फुलवाडी, आरंभी, मोख, तिवरी, लाख रायाजी, साखरा, हरसूल, गांधीनगर, मांडवा, रोहणादेवी, आमला, खंडापूर, रामनगर, इसापूर, दत्तापूर, कोलुरा, साखरी, फेट्रीसह अनेक गावांत घरांवरील टिनपत्रे उडून गेली. अनेक झाडे कोसळली. विद्युत तारा तुटल्या. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता.येथील जुन्या बसस्थानकावरील मोठ्या पिंपळाच्या झाडाच्या फांद्या तुटल्या. दिनबाई विद्यालयातील निंबाच्या झाडाच्या फांद्या तुटल्या. दिवाणी न्यायालयातील निंब, डॉ.आंबेडकर पुतळा परिसरातील निंबाचे झाड उन्मळून पडले. तहसील व पंचायत समिती परिसरात झाडे तुटली. यामुणे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.महसूल प्रशासनाला पंचनाम्याचे आदेशतहसीलदार राजेश वझीरे यांनी वादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यासाठी महसूलचे खास पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक घटनास्थळी जाऊन पंचनामे करीत आहे. सर्व पंचनामे झाल्यानंतरच वादळाने झालेल्या नुकसानीचा खरा आकडा कळणार आहे. दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे दोन दिवस जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसामुळे मात्र नागरिकांना दिलासा मिळाला. तथापि रात्रभर वीज नसल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला.

टॅग्स :Rainपाऊस