शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रस तालुक्याला वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 21:34 IST

सतत दोन दिवस तालुक्यात वादळाने थैमान घातले. गुरूवार व शुक्रवारी वादळाने तडाखा दिला. या वादळात ग्रामीण भागासह शहरी भागात मोठे नुकसान झाले. वादळामुळे अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेले.

ठळक मुद्देमोठे नुकसान । पिंपळाचे झाड कोसळले, तीन बालके जखमी, वीजपुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : सतत दोन दिवस तालुक्यात वादळाने थैमान घातले. गुरूवार व शुक्रवारी वादळाने तडाखा दिला. या वादळात ग्रामीण भागासह शहरी भागात मोठे नुकसान झाले.वादळामुळे अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेले. येथील पशुवैद्यकीय कार्यालयाजवळील ताजनगरमधील जुने मोठे पिंपळाचे झाड मुळापासून उन्मळून पडले. हे झाड नासीर खान गफ्फार खान यांच्या घरावर कोसळले. यामुळे खान परिवार हादरून गेला. झाड घरावर कोसळल्याने ७ वर्षीय आनम फिरदोस, ५ वर्षीय नूरजहाँ आणि ६ वर्षीय सुलतान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. नासीर खान, समशादबी, आयेशा अंजुम, बिलाल हे किरकोळ जखमी झाले. मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. गंभीर जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. झाड घरावर पडल्याने घराच्या भिंती, टिनपत्रे व घरातील साहित्याचे प्रचंड नुकसान झाले.तालुक्यातील देऊरवाडी (पु.) येथील शारूक शे.महेमूद यांच्यासह ८ ते १० जणांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली. चिंचोली, कळसा, सावंगा बु, धानोरा, निंभा, विठोली, तुपटाकळी, कांदळी, महागाव, कलगाव, डेहणी, चिरकुटा, फुलवाडी, आरंभी, मोख, तिवरी, लाख रायाजी, साखरा, हरसूल, गांधीनगर, मांडवा, रोहणादेवी, आमला, खंडापूर, रामनगर, इसापूर, दत्तापूर, कोलुरा, साखरी, फेट्रीसह अनेक गावांत घरांवरील टिनपत्रे उडून गेली. अनेक झाडे कोसळली. विद्युत तारा तुटल्या. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता.येथील जुन्या बसस्थानकावरील मोठ्या पिंपळाच्या झाडाच्या फांद्या तुटल्या. दिनबाई विद्यालयातील निंबाच्या झाडाच्या फांद्या तुटल्या. दिवाणी न्यायालयातील निंब, डॉ.आंबेडकर पुतळा परिसरातील निंबाचे झाड उन्मळून पडले. तहसील व पंचायत समिती परिसरात झाडे तुटली. यामुणे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.महसूल प्रशासनाला पंचनाम्याचे आदेशतहसीलदार राजेश वझीरे यांनी वादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यासाठी महसूलचे खास पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक घटनास्थळी जाऊन पंचनामे करीत आहे. सर्व पंचनामे झाल्यानंतरच वादळाने झालेल्या नुकसानीचा खरा आकडा कळणार आहे. दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे दोन दिवस जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसामुळे मात्र नागरिकांना दिलासा मिळाला. तथापि रात्रभर वीज नसल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला.

टॅग्स :Rainपाऊस