शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

वादळाने सहा वीज टॉवर कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 23:48 IST

वादळामुळे अतिउच्चदाब वीज वाहिनीचे सहा टॉवर मंगळवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास कोसळले. यामुळे आसेगाव-मांगूळ-मांगलादेवी मार्गावरील शेती पिकाचे नुकसान झाले.

ठळक मुद्देअतिउच्चदाब वाहिनी : आसेगाव-मांगूळ परिसर, पिकांचे नुकसान

सुरज नौकरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कआसेगावदेवी : वादळामुळे अतिउच्चदाब वीज वाहिनीचे सहा टॉवर मंगळवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास कोसळले. यामुळे आसेगाव-मांगूळ-मांगलादेवी मार्गावरील शेती पिकाचे नुकसान झाले. वीज तारा रस्त्यावर पडून असल्याने भीतीपोटी या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. शिवाय परिसरातील काही गावांमध्ये झाडे कोसळली.या भागातून देवळी येथून निघालेली उच्चदाब वीज वाहिनी गेली आहे. शेतातूनच या वाहिनीचा मार्ग आहे. काही टॉवर जमीनदोस्त झाले. तर काही वाकले आहे. या टॉवरवरील संपूर्ण तारा शेतात पडलेल्या आहेत. अतिउच्च दाबाची वीज वाहिनी असल्याने नागरिकांमध्ये मोठी भीती आहे. त्यामुळे तारा आणि टॉवर पडून असलेल्या शेतात जाण्यासही शेतकरी धजावत नाही. शेती कामाचे दिवस असताना त्यांच्यापुढे हे नवीन संकट उभे ठाकले आहे.कोसळलेल्या टॉवरवरील वीज वाहिनी ११०० केव्हीची असल्याचे सांगितले जाते. या भागातून तीन वीज वाहिन्या गेल्या आहेत. जोरदार वाऱ्यामुळे टॉवर कोसळण्याचा प्रकार घडला आहे. शिवाय या परिसरातील काही भागात झाडे उन्मळून पडली आहे. अनेकांच्या घराचेही नुकसान झाल्याचे सांगितले जाते. जोरदार वाऱ्यामुळे शेतातील मजुरांमध्येही भीती निर्माण झाली होती.घर कोसळून एक ठारआलेगाव येथे घर कोसळून एक जण ठार तर तीन जण जखमी झाले. सुधीर किसन राठोड (३५) असे मृताचे नाव आहे. घराच्या सज्याखाली दबून त्यांचा मृत्यू झाला. सायंकाळी झालेल्या चक्रीवादळामुळे घर कोसळल्याने ही घटना घडली. या गावातील बहुतांश झाडे जमीनदोस्त झाली.

टॅग्स :Rainपाऊस