शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

सारस पक्ष्याने पोखरला तलाव, तरी सिंचन विभाग झोपेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 05:00 IST

गेल्या ९ सप्टेंबरला तलावाची भिंत सारस पक्ष्याने पोखरल्याने गळती झाल्याची तक्रार गावकऱ्यांनी पुसद येथील सिंचन उपविभागाकडे केली होती. सिंचन विभागाने प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये माती भरून थातूरमातूर डागडुजी केली. मात्र मुख्य छिद्र बुजविले नाही. त्यामुळे हा अनर्थ घडल्याचे सरपंच पुरुषोत्तम कुडवे यांनी सांगितले. डागडुजीनंतर केवळ १५ दिवसांतच तलाव फुटल्याने त्याला सिंचन विभागच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रकाश सातघरेलोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : सिंचन उपविभागाच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील झिरपूरवाडी येथील पाझर तलाव शुक्रवारी फुटला.  हा तलाव काही महिन्यांपूर्वीच सारस पक्षांनी पोखरणे सुरू केल्याचे निरीक्षण शेतकऱ्यांनी नोंदविले होते. याबाबत सिंचन विभागाला लेखी सूचना देवूनही दुर्लक्ष केल्याने अखेर तलावच फुटला. तलावाच्या पाण्यामुळे अनेक शेतातील पिके वाहून गेली. शिवाय गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत गाळ साचला. गेल्या ९ सप्टेंबरला तलावाची भिंत सारस पक्ष्याने पोखरल्याने गळती झाल्याची तक्रार गावकऱ्यांनी पुसद येथील सिंचन उपविभागाकडे केली होती. सिंचन विभागाने प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये माती भरून थातूरमातूर डागडुजी केली. मात्र मुख्य छिद्र बुजविले नाही. त्यामुळे हा अनर्थ घडल्याचे सरपंच पुरुषोत्तम कुडवे यांनी सांगितले. डागडुजीनंतर केवळ १५ दिवसांतच तलाव फुटल्याने त्याला सिंचन विभागच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.झिरपूरवाडी येथे १९८४-८५ मध्ये लाखो रुपये खर्च करून पाझर तलाव बांधण्यात आला. या तलावातील पाण्यातून आजूबाजूच्या ५० ते ६० हेक्टर शेतीचे ओलित केले जात होते. जनावरांना पाण्याची साेय उपलब्ध झाली होती. तलावात बाराही महिने पाणी राहत होते. बुधवारी तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तलाव काठोकाठ भरला. पाण्याच्या दाबाने अखेर शुक्रवारी तलावाची भिंत फुटली. तलावातील पाण्यामुळे आजूबाजूच्या शेतातील कपाशी व सोयाबीनचे उभे पीक वाहून गेले. काही शेतांतील पीक आडवे झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. भविष्यातही सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला. केवळ सिंचन उपविभागाच्या हलगर्जीपणामुळे ही आपत्ती ओढवल्याचे झिरपूरवाडीचे सरपंच पुरुषोत्तम कुडवे यांनी सांगितले. प्रभारी तहसीलदार बन यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. झिरपूरवाडी परिसरात तलाव फुटल्याने पिकांचे नुकसान झाले. एवढी मोठी घटना घडल्यानंतरही सिंचन विभाग गाफील आहे. 

पाणीपुरवठ्याचे मोटारपंप गेले वाहून- भिंत फुटून आलेल्या पुरामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या विहिरीवरील तीन मोटारपंप व इतर साहित्य वाहून गेले. त्यामुळे गावाचा पुरवठा ठप्प पडला आहे. विहिरीमध्ये संपूर्ण गाळ साचला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. तक्रारीनंतरही अभियंत्याचे दुर्लक्ष- गावकऱ्यांनी तलाव पोखरल्याची तक्रार केली होती. मात्र डागडुजीनंतर तलाव फुटणार नाही, अशी ग्वाही पुसद येथील सिंचन उपविभागाच्या अभियंत्यांनी दिली होती. नंतर त्यांनी तलावाकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. गावकऱ्यांनी लेखी स्वरूपात तक्रार दिल्यानंतर अभियंत्यांनी तातडीने दखल घेतली असती तर कदाचित पाझर तलाव फुटण्याची वेळ आली नसती. 

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पfloodपूर