शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

लोणी येथे शेतकºयांचा रस्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 22:59 IST

भारनियमनामुळे रात्री ओलित करण्याची वेळ आर्णी तालुक्यातील शेतकºयांवर आली आहे. रोहित्रातील विजेच्या धक्क्याने तालुक्यातील लोणी येथे एका शेतकºयाचा मृत्यू झाल्याने बुधवारी शेतकºयांच्या संयमाचा बांध फुटला.

ठळक मुद्देरात्रीच्या वीज पुरवठ्याचा बळी: टायर पेटविले, तीन तास वाहतूक ठप्प

आर्णी : भारनियमनामुळे रात्री ओलित करण्याची वेळ आर्णी तालुक्यातील शेतकºयांवर आली आहे. रोहित्रातील विजेच्या धक्क्याने तालुक्यातील लोणी येथे एका शेतकºयाचा मृत्यू झाल्याने बुधवारी शेतकºयांच्या संयमाचा बांध फुटला. आर्णी-दारव्हा मार्गावर लोणी येथे शेतकºयांनी रस्ता रोको करून वीज वितरण कंपनीविरुद्ध आपला रोष व्यक्त केला. रस्त्यावर टायर पेटवून तब्बल तीन तास वाहतूक रोखून धरली होती.आर्णी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरू आहे. त्यातही भारनियमन दिवसा केले जात असल्याने शेतकºयांना रात्रीच ओलितासाठी जावे लागते. यामुळे शेतकºयांमध्ये असंतोष खदखदत आहे. लोणी येथील शेतकरी संतोष विष्णू होळकर (३०) याचा रोहित्रातील विजेच्या धक्क्याने बुधवारी सकाळी मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. यामुळे गावकरी संतापले. थेट लोणीच्या बसस्थानकावर येऊन दुपारी १२ वाजता चक्काजाम सुरू केला. रस्त्यावर मोठ्ठाले टायर पेटवून वाहतूक रोखून धरली. वीज वितरण कंपनीविरुद्ध शेतकरी रोष व्यक्त करीत होते. चक्काजामची माहिती आर्णी पोलिसांना होताच त्यांनी तत्काळ लोणी गाठले. तसेच वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता चेतना मोहनकर, नायब तहसीलदार आर.बी. मांडेकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. संतप्त शेतकºयांशी चर्चा केली. लेखी आश्वासन दिल्यानंतर दुपारी ३ वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी शेतकºयांनी लोणी येथील वीज कर्मचारी उर्मट वागणूक देत असल्याचा आरोप केला.रोहित्रातील विजेच्या धक्क्याने शेतकरी ठारसंतोष विष्णू होळकर याच्याकडे चार एकर शेती होती. त्याच्यावरच संपूर्ण कुटुंबाची भिस्त होती. यावर्षी त्याने आपल्या शेतात कापूस, सोयाबीन आणि हरभरा लावला होता. दिवसा भारनियमन होत असल्याने तो दररोज रात्री ओलित करण्यासाठी शेतात जात होता. शेतातील बोअरवेलवरून तो ओलित करीत होता. बोअरवेलला पाणी कमी असल्याने केवळ दोन नोझलवरच तो सिंचन करीत होता. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे दुचाकीने तो गणगाव मार्गावरील शेतात गेला. रात्री त्याच्या वडिलांनी मोबाईल लावला परंतु प्रतिसाद मिळत नव्हता. कामात असेल म्हणून वडिलांनी याकडे दुर्लक्ष केले. सकाळी ९ वाजले तरी संतोष घरी आला नाही म्हणून वडिलांनी शेत गाठले. शेतातही तो दिसत नव्हता. मात्र त्याची दुचाकी धुºयावर उभी होती. त्याचा शोध घेतला असता शेतातील रोहित्राजवळ (डीपी) त्याचा मृतदेह आढळून आला. मुलाचा मृतदेह पाहताच त्यांनी हंबरडा फोडला. ही माहिती गावात होताच गावकºयांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. संतोषच्या मागे पत्नी, मुलगी, वृद्ध आई-वडील असा परिवार आहे.