शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

राज्यात पोलीस निरीक्षकांच्या सव्वाचारशे जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 15:35 IST

राज्यात पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या तब्बल ४२४ जागा रिक्त असून त्या भरण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नतीची यादी व नियुक्त्या जारी होण्याची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक २१४ कोकण-२ विभागात नागपुरात ५५ तर अमरावतीत २७ रिक्त पदे

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या तब्बल ४२४ जागा रिक्त असून त्या भरण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नतीची यादी व नियुक्त्या जारी होण्याची प्रतीक्षा आहे.राज्यातील सहायक पोलीस निरीक्षकांना बढती देण्याच्या दृष्टीने पोलीस महासंचालक कार्यालयाने २७ जून रोजी महसूल विभाग निहाय पोलीस निरीक्षकांच्या रिक्त पदांची स्थिती जाहीर केली. त्यानुसार कोकण विभाग क्र. २ अंतर्गत निरीक्षकांच्या सर्वाधिक २१४ जागा रिक्त असल्याची नोंद आहे. नागपूर विभागात ५५, अमरावती २७, औरंगाबाद ३२, कोकण विभाग क्र. १ मध्ये ५, नाशिक २७ तर पुणे महसूल विभागांतर्गत निरीक्षकांच्या ६४ जागा रिक्त आहेत.राज्यात तालुकास्तरावरील सर्व पोलीस ठाणेप्रमुख हे निरीक्षक दर्जाचे आहे. मात्र तालुक्यांच्या तुलनेत सक्षम पोलीस निरीक्षकांची संख्या बरीच कमी आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी त्या पेक्षा कमी दर्जाच्या अधिकाºयांना ठाणेदार म्हणून नेमण्याची वेळ येते.

कनिष्ठांना ठाणेदार बनविण्याचा प्रयोगअमरावती ग्रामीणमध्ये एपीआय व पीएसआयला अनेक ठिकाणी ठाणेदार बनविण्यात आले आहे. यामागे निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची कमतरता, अकार्यक्षमता की कनिष्ठांना संधी यापैकी नेमके कोणते कारण आहे, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. परंतु कनिष्ठांना ठाणेदार बनवून प्रशासनाने निरीक्षकांच्या अकार्यक्षमतेवर मोहर उमटविल्याचे पोलीस दलात मानले जाते. यवतमाळातही पीआयऐवजी एपीआयला तालुकास्तरीय पोलीस ठाण्याचे ठाणेदार बनविण्याचा प्रयोग झाला आहे. त्यामागे मात्र राजकीय इच्छाशक्ती प्रबळ ठरल्याचेसांगण्यात येते.२९ एपीआय पदोन्नतीच्या यादीतपोलीस निरीक्षकांच्या रिक्त जागा एपीआयला पदोन्नती देऊन भरल्या जाणार आहे. परंतु राज्यात निरीक्षकांच्या ४२४ जागा रिक्त असताना पदोन्नतीसाठी केवळ २९ सहायक निरीक्षकांची यादी विचाराधीन आहे. त्यांना नेमकी कोणत्या महसुली संवर्गात नियुक्ती हवी, याबाबत पसंतीक्रम मागण्यात आला आहे. चक्राकार पद्धतीने या नियुक्त्या होणार आहेत.३९५ जागा रिक्तच राहणारकेवळ २९ एपीआयलाच बढती मिळाल्यास राज्यात निरीक्षकांच्या ३९५ जागा पुन्हा रिक्त राहणार आहे. आगामी सण-उत्सव व निवडणुका लक्षात घेता निरीक्षकांच्या एवढ्या मोठ्या संख्येने जागा रिक्त राहिल्यास उपलब्ध पोलीस अधिकाºयांवर कामाचा ताण वाढणार एवढे निश्चित.

टॅग्स :Policeपोलिस